शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कंटाळा, आंदोलन की व्यायाम?; माणसं पुन्हा चालायला लागली चार पायांवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 09:07 IST

आधी चार पायांवर चालणारा माणूस आता दोन पायांवर चालायला लागला आहे. दोन पायांवर चालणं हे मानवाचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं.

माणूस कधी चालायला लागला? माणसाची उत्क्रांती कशी, केव्हा झाली? असं म्हणतात, की माणूस आधी नरवानर होता. याच नरवानरापासून मानवाची उत्पत्ती झाली आहे. हा नरवानर, आपला पूर्वज आता अस्तित्वात नाही, पण आधुनिक मानवाची उत्क्रांती त्याच्यापासूनच झाली आहे. मानवही आधी चार पायांवर चालायचा. तिथून दोन पायांवर चालण्याच्या मानवाच्या प्रवासाला लाखो वर्षं लागली.  मानवाच्या उत्क्रांतीचा हा कालखंड अतिशय दीर्घ आहे. उत्क्रांतीच्या या प्रक्रियेला तब्बल साठ लाख वर्षांचा कालावधी लागला आहे. 

आधी चार पायांवर चालणारा माणूस आता दोन पायांवर चालायला लागला आहे. दोन पायांवर चालणं हे मानवाचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. यामुळे मानवाचे पुढचे दोन ‘पाय’ म्हणजेच हात इतर कामं करण्यासाठी मोकळे झाले आणि माणूस अधिकच उत्क्रांत होत गेला. एकाच वेळी दोन पाय आणि दोन हातांचा उपयोग मानवाला करता यायला लागल्यामुळे त्याच्या हालचालीत सुलभता तर आलीच, पण त्यामुळेच इतर अनेक कौशल्यंही मानवाला अवगत करता आली, जी इतर प्राण्यांना करता आली नाहीत. त्यामुळेच मानवाचा मेंदूही झपाट्यानं प्रगत होत गेला. दोन पायांवर चालण्याची ही उत्क्रांती मानवामध्ये साधारण ४० लाख वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर मानवाची इतर वैशिष्ट्ये विकसित होत गेली. 

आता मानवाच्या उत्क्रांतीचा हा इतिहास पुन्हा सांगायचं कारण काय? - तर जगात काही ठिकाणी माणसं आता पुन्हा आपल्या उत्क्रांतीपूर्व काळात जाऊ लागली आहेत की काय, अशी शंका वाटावी अशा घटना घडू लागल्या आहेत. काही ठिकाणी माणसं आपलं नेहेमीचं दोन पायांवर चालणं सोडून पुन्हा ‘चार पायांवर’ चालायला लागली आहेत. यातलं प्रमुख ठिकाण म्हणजे चीन ! 

चीनमध्ये सध्या एक नवीनच ट्रेंड आला आहे. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ! हे कॉलेजवयीन तरुण कॉलेजच्या आवारात, मैदानावर मोठ्या संख्येनं चार पायांवर चालताना, गुडघे टेकून रांगताना दिसून येत आहेत! बिजिंगमधील विद्यापीठांतील अनेक विद्यार्थी असे चार पायांवर रांगत असल्याचं पाहिल्यावर अनेकांना आश्चर्य वाटलं. पण फक्त बिजिंगमध्येच नाही, चीनमध्ये इतरही अनेक ठिकाणी, विशेषत: महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थी असे रांगताना दिसून येत आहेत. चीनमधील ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ त्याचबरोबर इतरही अनेक वृत्तपत्रं आणि माध्यमांनी या घटनेला विस्तृत प्रसिद्धी देतानाच विद्यार्थ्यांच्या या विचित्र वागणुकीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. चीनच्या सोशल मीडियावरही तरुणांमधील हा नवा ट्रेंड खूपच व्हायरल होतो आहे. ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांचे रांगतानाचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत आणि त्याला तुफान प्रसिद्धीही मिळते आहे. ‘चतुष्पाद’ किंवा ‘चार पायांची चळवळ’ म्हणून या घटनेचं वर्णन केलं जात आहे. 

मांजरी, मगरी, अस्वलं आणि इतर प्राण्यांच्या हालचालींपासून या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असावी आणि या प्राण्यांसारखं आपणही जगून पाहावं अशी स्फूर्ती त्यांनी घेतली असावी असं म्हटलं जात आहे. हजारो विद्यार्थ्यांनी असं अचानक चार पायांवर येण्याचं नक्की कारण तरी काय? केवळ मजा म्हणून, काहीतरी वेगळं करून पाहायचं म्हणून की आणखी काही?.. - त्याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या या कृतीचं कारण काहीही असलं तरी तज्ज्ञांचं म्हणणं आहे, विद्यार्थ्यांची ही ‘चतुष्पाद’ हालचाल त्यांच्या आरोग्यासाठी मात्र खूपच उपयुक्त आहे. चार पायांवर चालल्यामुळे तुमच्या शरीराचं संतुलन अधिक उत्तम पद्धतीनं होतं. तुमच्या शरीराची हालचाल वाढते. संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. रस्त्यावर रांगत जाणं आणि रांगण्याच्या स्थितीतून पुन्हा सरळ उभं राहण्याच्या स्थितीत येणं, या स्थितीतून पुन्हा रांगण्याच्या स्थितीत जाणं.. या गोष्टी तुम्ही स्वत:च थोडा वेळ करून पाहिल्या तर तुम्हाला किती तरतरी येते, हे तुमचं तुम्हालाच लक्षात येईल, असं आरोग्य अभ्यासकांचं म्हणणं आहे.

कंटाळा, आंदोलन की व्यायाम? विद्यार्थी असं का वागताहेत, याबाबत काहींचा अंदाज आहे, चीन सरकारच्या लॉकडाऊनच्या धोरणाला विरोध म्हणून विद्यार्थ्यांचं हे मूक आंदोलन आहे. काहींचं म्हणणं आहे, लॉकडाऊनमुळे सतत घरात राहावं लागलेल्या, बोअर झालेल्या तरुणांनी कंटाळा घालविण्यासाठी योजलेली ही युक्ती आहे, तर अर्थातच काहींचं म्हणणं आहे, आपलं शरीरस्वास्थ्य टिकवण्यासाठी विद्यार्थी करीत असलेला व्यायामाचा हा एक नवा प्रकार आहे ! काहीही असलं तरी चिनी विद्यार्थ्यांच्या या कृतीनं अख्ख्या जगभराचं लक्ष त्यांनी पुन्हा आपल्याकडे खेचून घेतलं आहे हे नक्की !