शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

आश्वासनांवर मतदारांचा विश्वास बसेना; पेटत्या निखाऱ्यांवरून चालत उमेदवारानं दिली अग्निपरीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 16:30 IST

ग्राम पंचायतीची निवडणूक रंगात; सरपंच पदाची निवडणूक लढवणारे उमेदवार पेटत्या निखाऱ्यांवरून चालत गेले

गोपालगंज: निवडणूक म्हटली की प्रचार आला, जाहीरनामे आले, आश्वासनं आली. पण निवडणूक संपताच सत्ताधाऱ्यांना आश्वासनांचा विसर पडतो. आश्वासनं म्हणजे जुमला होता, असं सत्ताधारी मंडळी सांगू लागतात. त्यामुळेच की काय आता लोकांचा राजकारण्यांवरचा विश्वास उडू लागला आहे. बिहारच्या गोपालगंजमध्ये असाच एक प्रकार दिसून आला. आपण आश्वासनं पूर्ण करू यावर लोकांचा विश्वास बसावा यासाठी एक उमेदवार चक्क पेटत्या निखाऱ्यांवरून चालत गेला.

गोपालगंजच्या शेर ग्राम पंचायतीची निवडणूक आहे. २९ नोव्हेंबरला विविध पदांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी अनेक उमेदवारांनी सर्वस्व पणाला लावलं आहे. मुन्ना महतो त्यापैकीच एक. मुन्ना शेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी रिंगणात आहेत. ते स्वत:ला देवीचे भक्त म्हणवतात. त्यामुळेच निवडणुकीला सामोरं जाण्याआधी त्यांनी अग्निपरीक्षा दिली. 

राजकारणी लोकांना दिलेला शब्द पाळत नाहीत. त्यांना आश्वासनांचा विसर पडतो, असा सर्वसामान्यांचा समज असतो. त्यामुळेच मुन्ना महतो पेटत्या निखाऱ्यावरून चालत गेले. बाकीचे उमेदवार आश्वासनं विसरत असतील. पण मी त्यांच्यासारखा नाही. दिलेला शब्द पाळेन, आश्वासनांचा विसर पडणार नाही, असं म्हणत महतो पेटत्या निखाऱ्यांवरून चालत गेले.

मुन्ना महतो पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आपण दररोज देवी मातेची पूजा करत असल्याचं ते सांगतात. या देवस्थानावर दररोज मोठी गर्दी असते. देवीच्या सामर्थ्यावर आपल्याला पूर्ण विश्वास आहे. त्याच जोरावर आपण निवडणूक जिंकू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.