शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

भारतातील वाढत्या इंटरनेटची अमेरिकेला धास्ती

By admin | Updated: May 16, 2015 01:10 IST

देशातील स्मार्ट फोनच्या संख्येत दिवसाकाठी वाढ होत असून या माध्यमातून इंटरनेटचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढीस लागत आहे.

मुंबई : देशातील स्मार्ट फोनच्या संख्येत दिवसाकाठी वाढ होत असून या माध्यमातून इंटरनेटचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढीस लागत आहे. मात्र, इंटरनेट क्रांतीचा प्रसार भारतात झपाट्याने होत असला तरी नेमकी हीच अमेरिकेच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली असून पायरसी मोठ्या प्रमाणावर वाढेल अशी भीती आता अमेरिकेने व्यक्त केली आहे.इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन आॅफ इंडियाने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार, देशातील स्मार्ट फोनची संख्या झपाट्याने वाढत असून २०१५ च्या वर्षात यामध्ये २३ टक्के वाढ अपेक्षित आहे. यामुळे देशातील स्मार्ट फोनची संख्या २१ कोटी ३० लाखांचा टप्पा ओलांडेल, तर याच कालावधीत भारतातील मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या नव्या ३७ कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडेल. ज्या प्रमाणात स्मार्ट फोनची संख्या वाढत आहे, त्याच प्रमाणात त्यावरून वापरल्या जाणाऱ्या इंटरनेटच्या प्रमाणातही वाढ होताना दिसत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, याच संदर्भात आणि याच धर्तीवर अमेरिकेच्या ट्रेड रिप्रेझेन्टेटिव्ह संस्थेने ३०१ पानी अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार, पायरसी ही भारतात मोठी समस्या असून, यामुळे डिजिटल विश्वाला मोठा फटका अनेक वेळा बसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. किबंहुना, आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपट आणि गाण्यांच्या पायरेटेड पद्धतीने झालेल्या डाऊनलोडिंगची आकडेवारी सादर करताना त्यात भारतच कसा अग्रेसर आहे, हे नमूद केले आहे. पायरसी हा मुद्दा तर आहेच; पण पायरसीसंदर्भातील अनेक न्यायालयीन याचिकांची प्रक्रियाही क्लिष्ट असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)