शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीची कंपनी विकून ४० हजार गावकऱ्यांच्या मदतीला धावल्या जयश्री राव; वाचून अभिमान वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 13:03 IST

७२ वर्षीय जयश्री राव या महाराष्ट्रातील पाचगणीत ग्रामपरी नावाची NGO चालवतात. लहानपणापासूनच जयश्री यांना समाजकार्याची आवड होती

समाजात बदल करण्याच्या गोष्टी अनेकजण करतात परंतु काही मोजकेच ते बदल घडवण्यासाठी योगदान देतात. महाराष्ट्रात राहणाऱ्या जयश्री राव याच त्याच लोकांपैकी एक आहेत. ज्यांनी स्वत:च्या सुखसुविधा, कोट्यवधीची कंपनीसोडून गावात येऊन राहिल्या. गावकऱ्यांचे आयुष्य बदलण्यासाठी जयश्री राव यांनी स्वत:चं आयुष्य खर्ची घातलं. मागील १४ वर्षापासून त्या गावकऱ्यांसाठी काम करतायेत. जयश्री राव यांनी आतापर्यंत ४० गाव दत्तक घेतले असून ४० हजारांहून अधिक लोकांना स्वच्छ पाणीपुरवठा त्यांच्याकडून होतो.

७२ वर्षीय जयश्री राव या महाराष्ट्रातील पाचगणीत ग्रामपरी नावाची NGO चालवतात. लहानपणापासूनच जयश्री यांना समाजकार्याची आवड होती. १४ वर्षाची असताना त्या इनिशिएटिव्ह ऑफ चेंज या NGO शी जोडल्या. महात्मा गांधी यांचे नातू राजमोहन गांधी यांनी त्याची स्थापना केली होती. त्यानंतर राजमोहन यांच्याकडून प्रेरणा घेत जयश्री यांनी समाजात बदल करण्याचं काम सुरु केले. पाचगणीतील गावांमध्ये त्यांनी समाजसेवा करण्यास सुरुवात केली. तेव्हा NGO ची इमारत बांधणाऱ्या मजुरांच्या मुलांना शिक्षण देत असे. NGO सोबत त्यांनी १० वर्ष काम केले. त्यानंतर त्या बंगळुरुतील एका डेंटिस्टशी लग्न करुन तिथे शिफ्ट झाल्या आणि सर्वसामान्य आयुष्य जगू लागल्या.

जयश्री सांगतात की, माझे वडील उद्योगपती होते. इंजिनिअरगिंग टूल्स बनवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. वडिलांमुळे मला त्याची माहिती मिळाली. मीदेखील या क्षेत्रात उतरले. हळूहळू उद्योग वाढू लागला. चांगली कमाई होऊ लागली. आमचे अनेक प्रॉड्क्टस लाखोमध्ये विक्री होऊ लागले. आम्ही खूप आनंदात जगत होतो. परंतु एकेदिवशी असं काही घडलं ज्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेले. २००६ मध्ये ऑफिसमधून येताना एक भाजीवाला भेटला त्याच्याकडून भाजी घेताना मी भाव करत होती. तेव्हा अनेक वेळेनंतर तो मानला आणि भाजी घेऊन घरी पोहचली. परंतु मला जाणीव झाली मी जे काही केले ते चुकीचे आहे. इतक्या कमाईनं काय फायदा? एका गरिबाकडून ५ रुपयांसाठी दर कमी करुन घेतला.

कोट्यवधीची कंपनी २५ हजारांना विकली

२००७ मध्ये जयश्रीने कर्मचाऱ्यांना कंपनी २५ हजारांनी विकली आणि पुन्हा पाचगणी परतल्या, त्यांनी ग्रामपरी नावाची NGO स्थापन करत गावकऱ्यांसाठी काम करणं सुरु केले. अनेक लोकांना सरकारी योजनांबद्दल माहिती नाही. त्यामुळे त्यांना लाभ होत नाही. जयश्री राव यांनी गावकऱ्यांना सरकारी योजनांबाबत सांगणं सुरु केले. जिल्हा अधिकाऱ्यांना भेटून लोकांना फायदा पोहचवण्यासाठी झटल्या. यात अनेकांना सरकारी योजनांचा फायदा मिळाला.

जयश्री यांचे काम हळूहळू सुरु झाले. गावातील लोकांना त्यांच्यावर विश्वास वाढला. गावात लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं. दूर पर्यंत पाण्यासाठी वणवण भटकावं लागत होते. त्यासाठी जयश्री राव यांनी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी योजना बनवली. या डोंगराळ भागात पाण्यासाठी केवळ झरा सोर्स होता. परंतु झरा सुकल्यानंतर पाण्याची समस्या प्रखरतेने जाणवतं होती. त्यानंतर याच झऱ्याचा वापर करत अमेरिकेतील एका कंपनीच्या मदतीने जयश्री राव यांनी सिमेंट क्रॉंक्रिटचा ढाचा बनवत पाणी वाचवण्यास सुरुवात केली. त्यानंतर गावकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळू लागलं.