शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पीआरसीसमोर जि.प.ची आजपासून तीन दिवस परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून नियोजन करण्यात येत असलेली पंचायत राज समिती अखेर सोमवारी जिल्ह्यात दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून नियोजन करण्यात येत असलेली पंचायत राज समिती अखेर सोमवारी जिल्ह्यात दाखल होणार असून सकाळी साडेदहा वाजेपासून जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आढावा घेणार आहे. ३१ आमदारांचा या समितीत समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर समिती दौऱ्याच्या नियोजनासाठी जि. प. प्रशासनाने ७ विविध समित्यांची नियुक्ती केली आहे. रविवारी दिवसभर या नियोजनात अधिकारी व्यस्त होते.

समिती येणार असल्याने साने गुरुजी सभागृहाच्या दुरुस्तीसह रंगरंगोटी करण्यात आली आहे. शिवाय जिल्हा परिषदेत जाणाऱ्या ओबड धोबड रस्त्यावर माती टाकून काहीसे सपाटीकरण करण्यात आले आहे. जुन्या व नव्या इमारतीच्या मधील अडथळा काढून चारचाकी जाण्याची सुविधा करण्यात आली आहे. नवीन इमारतीसमोरील रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे. समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत धावपळीचे वातावरण होते. सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी सर्व तयारीचा सायंकाळी आढावा घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून समितीच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी धावपळ सुरू असून शनिवार व रविवारीही जिल्हा परिषदेत कामकाज केले जात होते.

अशा आहे समित्या

नियंत्रण कक्ष अतिरिक्त सीईओ बाळासाहेब मोहन, स्वागत व्यवस्था डेप्युटी सीईओ डी. आर. लोखंडे, भोजन व्यवस्था कार्यकारी अभियंता सुधीर धीवरे, निवास स्थान व्यवस्था कृषी अधिकारी वैभव शिंदे, बैठक व्यवस्था डेप्युटी सीईओ के. बी. रणदिवे, वाहन व्यवस्था उपअभियंता रवींद्र मोरे, कोविड वैद्यकीय व्यवस्था डॉ. दिलीप पोटोडे.

समितीचा दौरा असा

समिती सकाळी साडेअकरा ते ११.३० दरम्यान, जिल्ह्यातील विधिमंडळ सदस्यांशी अनौपचारिक चर्चा, ११.३० वाजता जि. प. सदस्यांशी अनौपचारिक चर्चा करणार आहे. साडेअकरा वाजेपासून २०१६ ते १७ च्या लेखा परीक्षण पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदासंदर्भात सीईओंशी चर्चा

२८ ऑक्टोबर रोजी पंचायत समित्यांना भेटी

२९ सप्टेंबर २०१७ -१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालावर चर्चा

सेसमधून तरतूद

पंचायत राज समिती दौऱ्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी सेस फंडातून तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय दुरुस्तीची कामे ही नियमित नियोजनातून होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दौऱ्यापूर्वीच हे विषय गाजले

समितीच्या दौऱ्यापूर्वी जिल्हाभरात कुपोषणात १२ पटीने झालेली वाढ, आसराबारी येथील बालकाचा मृत्यू व त्यात झालेली कारवाई, आरोग्य विभागातील पदोन्नत्या, रावेर तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेतील अनियमितता, गौण खनिज गैरव्यवहार आदी विषय गाजलेले आहेत.