शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वकीयांकडून जि.प. अध्यक्षांची कोंडी

By admin | Updated: June 6, 2014 13:48 IST

मागासवर्गीय वस्त्या आणि वैयक्तिक योजनांसाठी तरतूद करण्याच्या विषयांवरून स्वकीयांनीच जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे यांची सर्वसाधारण सभेत कोंडी केली.

जळगाव- अपंगांच्या योजनांसाठी अखर्चित निधीचेे पुनर्विनियोजन करण्यासह जि.प. २० टक्के उपकर निधीतून मागासवर्गीय वस्त्या आणि वैयक्तिक योजनांसाठी तरतूद करण्याच्या विषयांवरून स्वकीयांनीच जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे यांची सर्वसाधारण सभेत कोंडी केली. अशोक कांडेलकर व स्मिता वाघ यांनी तर कामे होत नसतीलतरराजीनामादेण्याचीधमकीदिली.त्यामुळेएकचखळबळउडाली.मूळ तरतूद नाही. अशात मागील अखर्चित ४१ लाख ७३ हजार रुपये निधीची तरतूद अपंगांच्या योजनांसाठी केली जाणार नाही. हा निधी पुन्हा वर्षाच्या अखेरपर्यंत अखर्चित ठेवला जाईल आणि ऐनवेळी अधिकारी आपल्याला हव्या त्या कामासाठी खर्च करतील, असा आरोप शिवसेनेचे सदस्य प्रकाश सोमवंशी यांनी केला. माजी जि.प. अध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी मागासवर्गीय वस्त्यांमध्ये नवे विद्युतीकरणाचे काम जि.प.च्या समाज कल्याण विभागाने कुठेही केलेले नसल्याचा दावा केला. या विषयावर समाज कल्याण अधिकारी राकेश महाजन निरुत्तर झाले. अतिरिक्त सीईओ सुनील गायकवाड देखील समाधानकारक खुलासा देऊ शकले नाही. नंतर समाज कल्याण समितीचे सभापती राजेंद्र राठोड यांनी स्पष्टीकरण दिले. हे स्पष्टीकरण देताना ते हे काम काही आपले खाजगी नसल्याचे म्हणत ते चिडले. शेवटी जि.प. अध्यक्ष खोडपे यांनी खुलासा देण्याचा प्रयत्न केला, पण तो कांडेलकर, सोमवंशी यांनी चुकीचा असल्याचे सांगत नाकारला. एकाही वस्तीमध्ये विद्युतीकरणाचे नवे काम झालेले असल्यास जि.प.सदस्यत्वाचा राजीनामा देईल, अशी भूमिका कांडेलकरांनी घेतली. अखेर खोडपे यांनी नसता वाद घालू नका, हवा असेल तर विषय नामंजूर करा, असे वैतागाने सांगितले. स्मिता वाघ संतापल्या...न्यायालयात जाण्याचा इशाराहा गोंधळ सुरू असतानाच माजी जि.प. अध्यक्षा स्मिता वाघ वाघ संतापल्या. वाघ म्हणाल्या, जि.प.त ठरावीक लोकांची कामे होतात. त्यांनाच न्याय मिळतो. स्वार्थाच्या लोकांना जवळ घेतले जाते. हे चालणार नाही. आम्हाला लोकांनी निवडून दिले नाही काय? तसे असेल तर न्यायालयात जाईल. आम्ही येथे फक्त नाश्ता खाऊन घरी जाण्यासाठी येत नाही. समान न्याय द्या. अन्यथा राजीनामा देऊ. संताप करून त्या सभा अर्धवट सोडून सभागृहातून निघून गेल्या.शिवसेनेचे गटनेते ज्ञानेश्वर आमले यांनी रस्ते दुरुस्तीसंबंधीच्या विशेष निधीत वशिल्याची कामे घुसविली व प्रशासकीय मान्यता दिल्या तर न्यायालयात जाऊ, असा इशारा दिला. या प्रकरणात शेवटी प्रत्येक सदस्याची शिफारस घेऊन प्रत्येक गावात विद्युतीकरणाचा लाभ देण्याचा निर्णय अध्यक्षांनी घेतला.