शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

झिंगाट पार्टी उठली वन्यजीवांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST

सरीसृपांसह पक्ष्यांचेही जीव गेल्याची शक्यता : आगीचे कारण अस्पष्ट ; मोहाडीच्या १५० हून अधिक नागरिकांनी आटोक्यात आणली आग लोकमत ...

सरीसृपांसह पक्ष्यांचेही जीव गेल्याची शक्यता : आगीचे कारण अस्पष्ट ; मोहाडीच्या १५० हून अधिक नागरिकांनी आटोक्यात आणली आग

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - तालुक्यातील मोहाडी शिवारातील रुस्तमजी इंटरनॅशनल शाळेच्या मागे वनविभागाच्या कुरण नंबर २६ च्या क्षेत्रावर बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे सुमारे २० हेक्टर क्षेत्रावरील कुरण जळून खाक झाले आहे. तर या आगीमध्ये असंख्य सरीसृपांसह अनेक पक्ष्यांचाही भाजल्याने मृत्यू झाल्याची शक्यता काही वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शिरसोली, मोहाडी या भागातील वनक्षेत्रात रात्री-बेरात्री अनेक युवकांच्या पार्ट्या होतात. याठिकाणी वाढत जाणारा मानवी वावर यामुळे या ठिकाणी ही आग लागली असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

वनक्षेत्रांना उन्हाळ्यात आगी लागण्याचा अनेक घटना घडतात. मात्र, हिवाळ्यात मोहाडी शिवारातील वनक्षेत्रावर बुधवारी रात्री अचानक आग लागली. यामध्ये २० हेक्टरवरील कुरण जळून खाक झाले आहे. तर अनेक सरीसृपांचा मृत्यू यामध्ये झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

आगीचे वेगवेगळे कारण

१. या भागात रात्रीच्या वेळेस अनेक मद्यपी युवक पार्टीला येतात. यावेळी जळालेली सिगारेट फेकून देतात. या सिगारेटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.

२. हिवाळ्याचे दिवस असल्याने पार्टीला येणाऱ्यांनी रात्री शेकोटी पेटवली असेल, मात्र जाताना ती न विझविल्याने हवेमुळे या भागात आग लागली असल्याची दुसरी शक्यताही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

३. या भागात ससे, हरीण असे वन्यजीव आढळतात. यामध्ये ससा या प्राण्याची शिकार केली जाते. अनेकदा शिकारी परिसरात ट्रॅप लावून एका बाजूला आग लावतात. त्यामुळे वन्यप्राणी दुसऱ्या बाजूला म्हणजेच ट्रॅप लावलेल्या भागाकडे पळत जातात. या शिकारीसाठी देखील ही आग लावण्यात आल्याची शक्यता काही वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली आहे.

अन्यथा शेकडो हेक्टर क्षेत्र जळून झाले असते खाक

रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास आग लागली असल्याची शक्यता आहे. ९.३० पर्यंत आगीच्या ज्वाळा दिसल्याने काही जणांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तर काही जणांनी घटनेची माहिती वनविभागासह मोहाडी ग्रामस्थांना दिली. घटनेची माहिती मिळताच मोहाडी येथील सुमारे १५० हून अधिक नागरिक व युवक धावत आले. माती, झाडाच्या फांद्याच्या सहाय्याने नागरिकांनी अवघ्या दोन तासांच्या आत ही आग आटोक्यात आणली. रात्री ११.३० पर्यंत आग बऱ्यापैकी विझविण्यात आल्याची माहिती मोहाडी ग्रामस्थांनी दिली. दरम्यान, जैन कंपनीच्या दोन अग्निशमन विभागाच्या बंबदेखील झाले. मात्र, त्याआधीच बरीच आग आटोक्यात आली होती.

सरीसृप व पक्ष्यांचा मृत्यू

या आगीमुळे सुमारे २० हेक्टर क्षेत्रावरील कुरण पूर्णपणे जळाले आहे. या भागातील मोठ्या वृक्षांचे या आगीमुळे नुकसान झाले नाही. मात्र, जमिनीवर सरपटणारे साप, सरडा, घोरपड अशा प्राण्यांसह ससे व काही पक्ष्यांचा देखील या आगीत भाजून मृत्यू झाल्याची माहिती वन्यजीवप्रेमींनी दिली. तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या आगीमुळे केवळ कुरण जळून खाक झाले असून, यामध्ये कोणत्याही प्राण्याचा किंवा पक्ष्यांचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केला आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी

वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक होशींगे यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांच्यासह वनक्षेत्रपाल आर.जे. राणे, वन अभ्यासक विवेक देसाई यांनीही झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.