शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
2
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
3
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
4
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
5
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
6
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
9
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
10
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
11
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
12
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
13
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
14
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
15
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
16
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
17
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
18
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
19
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
20
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा

"जिल्हा बँक आता केवळ २३ कोटींच्या तोट्यात, एनपीएमुळेच दिसतोय तोटा" 

By आकाश नेवे | Published: September 17, 2022 9:02 PM

जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष गुलाबराव देवकर यांची माहिती.

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या केवळ २३ कोटी ६० लाख रुपयांच्या तोट्यात आहे. त्यात एनपीए हा ११९ कोटी रुपयांचा आहे. तर सध्याचा नफा ९५ कोटी ७० लाख रुपयांचा आहे. एनपीएतून नफा वजा केला जात असल्यानेच हा तोटा दिसत असल्याची माहिती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिली. जिल्हा बँकेची सर्वसाधारण बैठक शनिवारी बँकेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

देवकर यांनी सांगितले की, बँकेत सध्या ३५२० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. शेतकरी सभासदांच्या पीक कर्ज योजनांसाठी राज्य सहकारी बँकेकडून ३४० कोटी रुपयांची कर्ज मर्यादा मंजूर होती. त्यात बँकेने वर्षभरात फेरउचल केलेली नाही. तसेच बँकेने या आर्थिक वर्षात ६०८ कोटी रुपयांचे पीक कर्ज स्वभांडवलातून उभे केले आहे. बँकेच्या थकबाकी कर्जाची वसुली १५ टक्के झाली आहे. त्यात नफा ९५ कोटी ७० लाख रुपयांचा असला तरी एनपीए ११९ कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे बँक सध्या २३ कोटी ६० लाख रुपयांच्या तोट्यात आहे, असेही त्यांनी सांगितले.

काही सभासदांनी विषयपत्रिका मिळालेली नसल्याची तक्रार केली होती. त्यात त्यांनी म्हटले की, विकासो प्रतिनिधींना अजेंडा थेट पाठवले होते. तर इतरांना टपालाने पाठविले होते. त्यातील २२०० पेक्षा जास्त विषयपत्रिका या पोस्टाच्या शिक्क्यानिशी परत आल्या आहेत. पीक विम्यातूनच कर्ज वसुली ८ सप्टेंबर रोजीच बंद केली आहे. त्यामुळे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. संगणक देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्च हा मूळ रकमेच्या १६ टक्के आहे. त्यामुळे हा खर्च १ कोटी १३ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. त्यात अतिरिक्त खर्च नाही. संचित तोटा भरून निघायला मात्र वेळ लागेल, असेही त्यांनी सांगितले.

अपहाराच्या रकमेबाबतही प्रश्न विचारला गेला. त्यात सांगितले की, ही रक्कम चार कोटी ७० लाख ७८ हजारांची आहे. ही सर्व प्रकरणे १९९२-९३ च्या दरम्यानची आहेत. त्यातील एक कोटीची रक्कम वर्षभरात वसूल होईल.

मसाकाच्या मुद्द्यावर सुरेश चौधरी यांनी प्रश्न विचारला त्यावर देवकर यांनी बँकेकडे एका संस्थेने प्रस्ताव दाखल केला आहे. हा प्रस्ताव आला की त्यावर विचार करूनच बँक त्याला मंजुरी देईल. मात्र, रिझर्व बँकेच्या नियमानुसार बँक कारखाना चालवू शकत नाही, असे सांगितले.