शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

बालाजी पेठेतील दोन मजली व्यापारी संकुल जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील बालाजी पेठ परिसरातील मुख्य चौकात मनपाच्या जागेवर अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलेले दुमजली व्यापारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील बालाजी पेठ परिसरातील मुख्य चौकात मनपाच्या जागेवर अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलेले दुमजली व्यापारी संकुल मंगळवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून जमिनदोस्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान अतिक्रमणधारकांनी व या संकुलातील काही गाळेधारकांनी मनपा कर्मचाऱ्यांशी व उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याशी हुज्जत घालून कारवाईमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. तणाव वाढल्यानंतर पोलिसांना पाचारण करून, विरोध करणाऱ्यांना अटक करण्याचा इशारा दिल्यानंतर वाद शांत झाला व मनपाकडून कारवाई पुर्ण करण्यात आली.

बालाजी पेठेतील मुख्य चौकात असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश मनपा नगररचना विभागाने दिल्यानंतर मंगळवारी सकाळी ११ वाजता मनपाचे पथक याठिकाणी दाखल झाले. मात्र, संबधित गाळेधारकांनी दुकानातून माल व इतर साहित्य बाहेर न काढल्यामुळे मनपा अधिकाऱ्यांनी सर्व साहित्य बाहेर काढण्यास सूचना दिली. मात्र, गाळेधारकांनी मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यामुळे काही काळ कारवाई थांबविण्यात देखील आली. मात्र, पोलिसांनी येवून स्थितीवर नियंत्रण आणले. त्यानंतर गाळेधारकांनीही मार्केटमधील साहित्य बाहेर काढत, सर्व गाळे खाली केले. त्यानंतर मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या जेसीबीकडून सर्व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.

काय आहे प्रकार

१. शहरातील बालाजी पेठ परिसरातील मुख्य चौकात मनपाच्या मालकीच्या जागेवर गेल्या तीन वर्षांपासून दुमजली इमारत बांधून त्याठिकाणी सहा दुकाने व तळमजल्याचे व्यापारी संकुल तयार करण्यात आले होते. याबाबत विनोद शर्मा नामक व्यक्तीने मनपा नगररचना विभागाकडे तक्रार करून, हे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगितले होते. त्यावर नगररचना विभागाने मोजणी केल्यानंतर हे बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले.

२. तसेच मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाला आदेश देवून हे बांधकाम पाडण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. १९ डिसेंबर २०१९ रोजी हे आदेश काढण्यात आले होते. मात्र, तब्बल दोन वर्ष यावर मनपाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तब्बल दोन वर्षांनंतर मनपाकडून मंगळवारी हे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले.

मनपा प्रशासनाचा दावा

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार ही जागा मनपा मालकीची असून, यावर भाजीपाला मंडईचे आरक्षण आहे. मात्र, दिलीप लखमल सिखवाल यांनी मनपाची कोणतीही परवानगी न घेता या जागेवर बांधकाम करून घेतले. तसेच याबाबत अनेकवेळा नोटीस देवून देखील हे बांधकाम काढले नाही. तसेच या प्रकरणी न्यायालयाचे देखील मनपाकडे कोणतेही आदेश प्राप्त नसल्याने हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आल्याची माहिती मनपा उपायुक्तांनी दिली. तसेच विकास आराखडा योजनानुसार या परिसरातील इतर जागा देखील मनपाच्या नावावर असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

संकुल बांधकाम करणाऱ्यांचा दावा

या संकुलाचे बांधकाम करणाऱ्या दिलीप सिखवाल यांनी केलेल्या दाव्यानुसार ही जागा आमच्या मालकीची असल्याचे सिखवाल यांनी सांगितले. तसेच १९६४ साली तत्कालीन नगरपालिकेने याठिकाणी भाजीपाला मंडईसाठी आरक्षण टाकले होते. मात्र, ते आरक्षण रद्द झाले असून, मनपाने मोबदला देखील दिलेला नाही. तसेच हे बांधकाम तोडण्यासाठी मनपाने कोणतीही नोटीस आम्हाला बजाविली नाही, केवळ तोंडी आदेश मनपाने दिले असल्याची माहिती दिलीप सिखवाल यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली.