शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

युवकांनी कमविले, प्रशासनाने गमविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 19:22 IST

देशभरातील सैन्य भरतींचे रेकार्ड जळगावने तोडले

सचिन देवजळगाव : जळगाव येथे झालेल्या सैन्य भरतीसाठी तब्बल ६८ हजार मुलांनी हजेरी लावल्याने, देशभरातील सैन्य भरतींचे रेकार्ड जळगावने तोडले आहेत. एकीकडे युवकांनी जळगावचे नाव कमविले असताना, दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने भरतीसाठी आलेल्या युवकांची सोय न केल्याने, नाव गमविले आहे.या भरतीसाठी विविध जिल्ह्यांमधुन दररोज ५ ते ६ हजार युवक जळगावला येत असतांना, जिल्हा प्रशासनाने भरतीच्या ठिकाणापासुन तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या सैनिकी हॉलमध्ये निवाऱ्याची व्यवस्था केली. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठीच २० रुपये लागत असल्याने, बहुतांश तरुणांनी याकडे पाठ फिरवली होती. तर शिवतीर्थ निवाºयाच्या नावाखाली फक्त मंडप उभारला होता. या ठिकाणी शौचालयाची ना लाईटची व्यवस्था असल्यामुळे, तरुणांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. कुठल्याही ठिकाणी फिरते शौचालय नसल्याने, तरुणांना बस स्टॅण्ड व रेल्वे स्टेशनचा आश्रय घ्यावा लागला.शिवतीर्थ मैदानावर झोपण्यासाठी उघड्यावरच मंडप उभारला असल्याने, तरुणांनी या ठिकाणी न झोपता परिसरातील व्यापारी संकुलाचे ओटे, बस स्टॅण्ड, गांधी उद्यानाचे फुटपाथ तर काही युवकांनी रस्त्यावर झोपुनही रात्र काढली. परभणी, नांदेड,औरंगाबाद, नंदुरबार या भागातुन आलेल्या हजारो युवकासांठी मनपा ना जिल्हा प्रशासनाने शौचालयाचीदेखील व्यवस्था न केल्याने, तरुणांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मुलांच्या सुविधेबाबात एकमेकांकडे बोट दाखवुन अधिकाºयांनी वेळ मारुन नेली. मात्र, कुठल्याही अधिकाºयाने पुढे येऊन, मुलांच्या गैरसोयीबद्दल मुलांशी चर्चादेखील केली नाही.युवकांचे निवाºयासोबत खाण्या-पिण्याचेही हाल झाले. शहरात ढीगभर सामाजिक संस्था असताना कुठल्याही संस्थेने अन्नादानाची सुविधा केली नाही. यामुळे बाहेरुन आलेल्या हजारो युवकांना दुप्पटचे पैसे मोजुन पोटाची भूख भागवावी लागली. बस स्टॅण्डसमोरील व्यावसायिकांनी तर अक्षरश: युवकांना लुटण्याचे धंदे केले. यामुळे बेरोजगार तरुणांच्या खिशांना चांगलीच झळ बसली.एकंदरीत पाहता भरतीसाठी आलेल्या तरुणासांठी जिल्हा प्रशासनाने कुठलिही सुविधा न केल्यामुळे तरुणांनी प्रशासनाविरोधात तीव्र संपातदेखील व्यक्त केला. शौचालय नसल्याने उघड्यावरच प्रात:विधी करावा लागला. यामुळे क्रीडा संकुल, शिवतीर्थ मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. यामुळे याचा परिणाम जळगावकरांच्या आरोग्यावरदेखील झाला. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जळगावकरांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली. भरतीसाठी आलेल्या उच्चशिक्षित तरुणांनी, त्यांना झालेल्या त्रासाबद्दल प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केल्याने, प्रशासनाने आपले नाव गमविले आहे. असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव