शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

युवकांनी कमविले, प्रशासनाने गमविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 19:22 IST

देशभरातील सैन्य भरतींचे रेकार्ड जळगावने तोडले

सचिन देवजळगाव : जळगाव येथे झालेल्या सैन्य भरतीसाठी तब्बल ६८ हजार मुलांनी हजेरी लावल्याने, देशभरातील सैन्य भरतींचे रेकार्ड जळगावने तोडले आहेत. एकीकडे युवकांनी जळगावचे नाव कमविले असताना, दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने भरतीसाठी आलेल्या युवकांची सोय न केल्याने, नाव गमविले आहे.या भरतीसाठी विविध जिल्ह्यांमधुन दररोज ५ ते ६ हजार युवक जळगावला येत असतांना, जिल्हा प्रशासनाने भरतीच्या ठिकाणापासुन तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या सैनिकी हॉलमध्ये निवाऱ्याची व्यवस्था केली. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठीच २० रुपये लागत असल्याने, बहुतांश तरुणांनी याकडे पाठ फिरवली होती. तर शिवतीर्थ निवाºयाच्या नावाखाली फक्त मंडप उभारला होता. या ठिकाणी शौचालयाची ना लाईटची व्यवस्था असल्यामुळे, तरुणांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. कुठल्याही ठिकाणी फिरते शौचालय नसल्याने, तरुणांना बस स्टॅण्ड व रेल्वे स्टेशनचा आश्रय घ्यावा लागला.शिवतीर्थ मैदानावर झोपण्यासाठी उघड्यावरच मंडप उभारला असल्याने, तरुणांनी या ठिकाणी न झोपता परिसरातील व्यापारी संकुलाचे ओटे, बस स्टॅण्ड, गांधी उद्यानाचे फुटपाथ तर काही युवकांनी रस्त्यावर झोपुनही रात्र काढली. परभणी, नांदेड,औरंगाबाद, नंदुरबार या भागातुन आलेल्या हजारो युवकासांठी मनपा ना जिल्हा प्रशासनाने शौचालयाचीदेखील व्यवस्था न केल्याने, तरुणांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मुलांच्या सुविधेबाबात एकमेकांकडे बोट दाखवुन अधिकाºयांनी वेळ मारुन नेली. मात्र, कुठल्याही अधिकाºयाने पुढे येऊन, मुलांच्या गैरसोयीबद्दल मुलांशी चर्चादेखील केली नाही.युवकांचे निवाºयासोबत खाण्या-पिण्याचेही हाल झाले. शहरात ढीगभर सामाजिक संस्था असताना कुठल्याही संस्थेने अन्नादानाची सुविधा केली नाही. यामुळे बाहेरुन आलेल्या हजारो युवकांना दुप्पटचे पैसे मोजुन पोटाची भूख भागवावी लागली. बस स्टॅण्डसमोरील व्यावसायिकांनी तर अक्षरश: युवकांना लुटण्याचे धंदे केले. यामुळे बेरोजगार तरुणांच्या खिशांना चांगलीच झळ बसली.एकंदरीत पाहता भरतीसाठी आलेल्या तरुणासांठी जिल्हा प्रशासनाने कुठलिही सुविधा न केल्यामुळे तरुणांनी प्रशासनाविरोधात तीव्र संपातदेखील व्यक्त केला. शौचालय नसल्याने उघड्यावरच प्रात:विधी करावा लागला. यामुळे क्रीडा संकुल, शिवतीर्थ मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. यामुळे याचा परिणाम जळगावकरांच्या आरोग्यावरदेखील झाला. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जळगावकरांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली. भरतीसाठी आलेल्या उच्चशिक्षित तरुणांनी, त्यांना झालेल्या त्रासाबद्दल प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केल्याने, प्रशासनाने आपले नाव गमविले आहे. असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव