शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी कमविले, प्रशासनाने गमविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 19:22 IST

देशभरातील सैन्य भरतींचे रेकार्ड जळगावने तोडले

सचिन देवजळगाव : जळगाव येथे झालेल्या सैन्य भरतीसाठी तब्बल ६८ हजार मुलांनी हजेरी लावल्याने, देशभरातील सैन्य भरतींचे रेकार्ड जळगावने तोडले आहेत. एकीकडे युवकांनी जळगावचे नाव कमविले असताना, दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने भरतीसाठी आलेल्या युवकांची सोय न केल्याने, नाव गमविले आहे.या भरतीसाठी विविध जिल्ह्यांमधुन दररोज ५ ते ६ हजार युवक जळगावला येत असतांना, जिल्हा प्रशासनाने भरतीच्या ठिकाणापासुन तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या सैनिकी हॉलमध्ये निवाऱ्याची व्यवस्था केली. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठीच २० रुपये लागत असल्याने, बहुतांश तरुणांनी याकडे पाठ फिरवली होती. तर शिवतीर्थ निवाºयाच्या नावाखाली फक्त मंडप उभारला होता. या ठिकाणी शौचालयाची ना लाईटची व्यवस्था असल्यामुळे, तरुणांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. कुठल्याही ठिकाणी फिरते शौचालय नसल्याने, तरुणांना बस स्टॅण्ड व रेल्वे स्टेशनचा आश्रय घ्यावा लागला.शिवतीर्थ मैदानावर झोपण्यासाठी उघड्यावरच मंडप उभारला असल्याने, तरुणांनी या ठिकाणी न झोपता परिसरातील व्यापारी संकुलाचे ओटे, बस स्टॅण्ड, गांधी उद्यानाचे फुटपाथ तर काही युवकांनी रस्त्यावर झोपुनही रात्र काढली. परभणी, नांदेड,औरंगाबाद, नंदुरबार या भागातुन आलेल्या हजारो युवकासांठी मनपा ना जिल्हा प्रशासनाने शौचालयाचीदेखील व्यवस्था न केल्याने, तरुणांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मुलांच्या सुविधेबाबात एकमेकांकडे बोट दाखवुन अधिकाºयांनी वेळ मारुन नेली. मात्र, कुठल्याही अधिकाºयाने पुढे येऊन, मुलांच्या गैरसोयीबद्दल मुलांशी चर्चादेखील केली नाही.युवकांचे निवाºयासोबत खाण्या-पिण्याचेही हाल झाले. शहरात ढीगभर सामाजिक संस्था असताना कुठल्याही संस्थेने अन्नादानाची सुविधा केली नाही. यामुळे बाहेरुन आलेल्या हजारो युवकांना दुप्पटचे पैसे मोजुन पोटाची भूख भागवावी लागली. बस स्टॅण्डसमोरील व्यावसायिकांनी तर अक्षरश: युवकांना लुटण्याचे धंदे केले. यामुळे बेरोजगार तरुणांच्या खिशांना चांगलीच झळ बसली.एकंदरीत पाहता भरतीसाठी आलेल्या तरुणासांठी जिल्हा प्रशासनाने कुठलिही सुविधा न केल्यामुळे तरुणांनी प्रशासनाविरोधात तीव्र संपातदेखील व्यक्त केला. शौचालय नसल्याने उघड्यावरच प्रात:विधी करावा लागला. यामुळे क्रीडा संकुल, शिवतीर्थ मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. यामुळे याचा परिणाम जळगावकरांच्या आरोग्यावरदेखील झाला. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जळगावकरांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली. भरतीसाठी आलेल्या उच्चशिक्षित तरुणांनी, त्यांना झालेल्या त्रासाबद्दल प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केल्याने, प्रशासनाने आपले नाव गमविले आहे. असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव