शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

बोली भाषा जतन करणे आपले काम - प्रा.डॉ. केशव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:38 IST

सामान्य जन बोलतात तोपर्यंत मराठी आबाधित राहिल

जळगाव - मराठीचे दिवस वाईट नाहीत, जोपर्यंत सामान्य लोक ती बोलत आहेत, त्यांची जीभ शाबूत आहे. तोपर्यंत मराठी अबाधित राहिल, यासाठी आपली बोली भाषा जतन करणे आणि तिचे संवर्धन करणे सर्वांचीच जबाबदारी आहे, असे मत राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रा.डॉ. केशव देशमुख (नांदेड) यांनी व्यक्त केले.चोपडा येथील कवी राजेंद्र पारे यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी ते जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला.प्रा. देशमुख हे स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठात मानव विज्ञान शाखेचे डीन आहेत. त्यांनी लिहिलेल्या साहित्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.प्रश्न- भाषा सल्लागार समिती काम काय आहे?उत्तर- विविध प्रकारचे कोष निर्माण करणे. याशिवाय मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार आणि अमराठी वर्गापर्यंत मराठी भाषा घेऊन जाणे हा भाषा सल्लागार समितीचा उद्देश आहे. यासाठी काही दिवसापूर्वीच या समितीची पहिली बैठक झाली आहे.प्रश्न- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी काय प्रयत्न सुरु आहेत?उत्तर- मूळत: आपल्याकडे विविध बोली भाषा बोलल्या जातात. कथा, कादंबरी, कविता ह्या आता बोलीभाषेत येत आहेत. बोली भाषा जतन करणे हा या समितीचा मूळ उद्देश आहे आणि ती टिकवणे आपले काम आहे.प्रश्न- एकीकडे मराठीबद्दल आस्था दाखवायची आणि आपल्या मुुलांना मात्र इंग्रजी शाळेत टाकायचे? असे सुरु आहे....त्याबद्दल?उत्तर - मूळात इंग्रजीशी वैर असण्याचे कारण नाही. मराठी जशी ज्ञानाची भाषा आहे तशी इंग्रजीही आहे . इंग्रजीही जगाला जोडणारी भाषा आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. ती जतन करणे आणि सांभाळणे आपल्या हाती आहे. यासाठी भाषा सल्लागार समितीच्या माध्यमातून उपयोजित मराठी पुढे यावी, यसाठी प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव