शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

आपलं घर हातभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:48 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात माया धुप्पड यांचा लेख.

‘आपलं घर हातभर’ असं जे म्हटलं जातं ते अगदी खरं तर आहेच पण खूप सुंदरही आहे. हे शब्द तनामनाला विसावा देतात, हातभर शब्दापासून आभाळभर अर्थ व्यक्त करतात. हे शब्द म्हणजे प्रत्येकाच्या मनातील ‘आपल्या घरात आपण राजे’ हा भाव व्यक्त करणारी एक भाववृत्ती आहे. काही कारणाने आपण नातेवाईकांकडे जातो. तेव्हा पहिल्या दिवशी पाहुणा, दुस:या दिवशी पै आणि तिस:या दिवशी त्याची अक्कलच काढली जाते, ही प्रचिती सर्वानाच येते. ते साहजिकच आहे. त्याचं वाईट वाटण्याचंही कारण नसतं. याच्याही पलीकडे जाऊन ब:याच ठिकाणी छान आदर सत्कार होतात. दोन-चार दिवस आणखी राहण्याचा आग्रहसुद्धा होतो. पण ते शब्द आणि त्या कृती अर्थातच विशिष्ट मर्यादेच्या वतरुळात फिरत असतात. म्हणूनच आपण त्या पाहुणचाराच्या, त्या घराच्या वतरुळातून बाहेर पडतो. आपल्या घरी आल्यावर मात्र परीघ नसलेल्या वतरुळात आल्यासारखं वाटतं. वागण्या-बोलण्याच्या वतरुळाचा परीघ विस्तारत जातो. तिथे आपली सत्ता असते. आपलं घर राजमहाल नसलं तरी आपण मात्र आपल्या घरात ‘राजे’ असतो. महालाला ‘महाल’ म्हटलं जातं, ‘घर’ नाही. ‘घर’, किती सुरेख शब्द! दोन अक्षरी. ना काना, ना मात्रा, ना उकार, ना वेलांटी, म्हणजेच द्वेष, मत्सर, अपमान, कमीपणा काहीच नाही. ‘घर’ या दोन अक्षरांच्या वर, खाली, आजू-बाजूला अनेक भावभावनांचे सुंदर गोफ विणलेले असतात. युगायुगाची हवीशी वाटणारी बंधनं, प्रेम, आपलेपण, स्नेह, माया, लळा, जिव्हाळा यांचे गोफ या शब्दाभोवती विणलेले असतात. परस्परांच्या सुखदु:खात एकरूप होण्याची एक दिव्य शक्ती ‘घर’ या संकल्पनेने मनात रुजते आणि फुलते. घरी वाट पाहणारं कुणीतरी असतं म्हणून घराची वाट धरण्याची ओढ असते. दिवसभर काम करणारा नोकरदार असो, कामगार असो, कुणी मोठा ऑफिसर, उद्योजक वा व्यापारी असो, प्रत्येकालाच संध्याकाळपासूनच घरी जाण्याचे वेध लागलेले असतात. संध्याकाळच्या 70 टक्के गर्दीचे पाय घरच्या दिशेने धावणारे असतात. शाळेतल्या मुलांची तर फारच मजा येते. शाळा सुटली की ‘हो..’ अशा सामूहिक आनंदस्वरांच्या लहरी घराकडे धावू लागतात. घराचं हे साधंसुधं पण मनोहर स्वप्न सगळ्यांचंच असतं. हे ‘घरटं’ म्हणजे साधी ‘झोपडी’सुद्धा चालते. कारण, राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली। ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माङया।। अगदी साधी, शेणाने सारवलेली झोपडीसुद्धा समाधानाचं माप, पदरात भरभरून टाकते. तिथे साध्या भाजी-भाकरीत अमृताची गोडी असते. कांदा, मुळा, भाजी ‘विठाई’ होऊन येतात. शेणसडा घातलेल्या अंगणातली रांगोळी तुळशीबरोबर गुजगोष्ष्टी करीत असते. तोरण वा:यासवे हलून ‘हुंकारा’ देत असते. घरातली कमीच पण ‘लखलख’ भांडी, घराचं स्वच्छ चित्र दाखवतात. अंगणात नातवांसह आजोबा-आजींची मैफील जमलेली असते. सासुरवाशीण काम करताना मधूनच अंगणातल्या सदाफुली, जास्वंदीशी गप्पा मारीत असते. ही फुलं तिला प्रतिकूल परिस्थितीतली वाट आनंदाने चालायला शिकवतात. ग्रामीण भागात तर हे चित्र दिसतंच. मी जेव्हा जेव्हा अशा ठिकाणी जाते किंवा प्रवासातही काही वेळा अशा झोपडय़ा दिसतात. तेव्हा मी ही ‘घरे’ मनाच्या चंदनी पेटीत साठवत राहते. ब:याचदा आपण पाहतो, काही इमारती खूप जुन्या झालेल्या असतात. तिथल्या घरांमधील लोक कसेबसे, जीव मुठीत धरून राहात असतात. इमारत मोडकळीस आलेली असते. पण त्या घरातल्या लोकांची ‘जिद्द’ ताठ उभी असते. कशाबशा उभ्या असणा:या त्या घरांच्या आजुबाजूला, लहानशा जागेत, जीव मुठीत धरून बसलेल्या कुंडय़ांमधून गुलाब, मोगरा, शेवंती इ.फुले तुळशीसोबत हसत असतात. जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा देत असतात. ते पाहून मला आठवतं एक शक्य, ‘घोसले में रहकर आसमान में उडने का एहसास कैसे होता है, यह एक चिडियांसे पुछो’, आणि मग त्या घरांमध्ये राहणारे लोक मला चिमण्यांसारखे वाटू लागतात. आपलं घर सर्वानाच सुरक्षित वाटतं. आपल्या घरात येऊन आपल्यालाच कुणी बोलू शकत नाही, रागवू शकत नाही. घरात आई असते. आई हेच त्यांचं घर असतं. लहान मुलांसाठी जसा आईचा पदर असतो, तसाच घराचा पदर घरातल्या सर्वासाठी असतो. नोकरीनिमित्ताने बालपणंच घर सोडून शहरात गेलेल्यांनाही बालपणंच घर कायम खुणावत असतं. लेखक- कवींचं मन तर तिथे गुंतलेलंच असतं. कवी अनिल भारतींची ही कविता आपल्या आठवणीतल्या घराला साद घालते. खरंच, असं असतं ‘घर’ जे आपल्या मनात कायमचं ‘घर’ करून बसलेलं असतं, बसलेलं असतं..