शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आपलं घर हातभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:48 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात माया धुप्पड यांचा लेख.

‘आपलं घर हातभर’ असं जे म्हटलं जातं ते अगदी खरं तर आहेच पण खूप सुंदरही आहे. हे शब्द तनामनाला विसावा देतात, हातभर शब्दापासून आभाळभर अर्थ व्यक्त करतात. हे शब्द म्हणजे प्रत्येकाच्या मनातील ‘आपल्या घरात आपण राजे’ हा भाव व्यक्त करणारी एक भाववृत्ती आहे. काही कारणाने आपण नातेवाईकांकडे जातो. तेव्हा पहिल्या दिवशी पाहुणा, दुस:या दिवशी पै आणि तिस:या दिवशी त्याची अक्कलच काढली जाते, ही प्रचिती सर्वानाच येते. ते साहजिकच आहे. त्याचं वाईट वाटण्याचंही कारण नसतं. याच्याही पलीकडे जाऊन ब:याच ठिकाणी छान आदर सत्कार होतात. दोन-चार दिवस आणखी राहण्याचा आग्रहसुद्धा होतो. पण ते शब्द आणि त्या कृती अर्थातच विशिष्ट मर्यादेच्या वतरुळात फिरत असतात. म्हणूनच आपण त्या पाहुणचाराच्या, त्या घराच्या वतरुळातून बाहेर पडतो. आपल्या घरी आल्यावर मात्र परीघ नसलेल्या वतरुळात आल्यासारखं वाटतं. वागण्या-बोलण्याच्या वतरुळाचा परीघ विस्तारत जातो. तिथे आपली सत्ता असते. आपलं घर राजमहाल नसलं तरी आपण मात्र आपल्या घरात ‘राजे’ असतो. महालाला ‘महाल’ म्हटलं जातं, ‘घर’ नाही. ‘घर’, किती सुरेख शब्द! दोन अक्षरी. ना काना, ना मात्रा, ना उकार, ना वेलांटी, म्हणजेच द्वेष, मत्सर, अपमान, कमीपणा काहीच नाही. ‘घर’ या दोन अक्षरांच्या वर, खाली, आजू-बाजूला अनेक भावभावनांचे सुंदर गोफ विणलेले असतात. युगायुगाची हवीशी वाटणारी बंधनं, प्रेम, आपलेपण, स्नेह, माया, लळा, जिव्हाळा यांचे गोफ या शब्दाभोवती विणलेले असतात. परस्परांच्या सुखदु:खात एकरूप होण्याची एक दिव्य शक्ती ‘घर’ या संकल्पनेने मनात रुजते आणि फुलते. घरी वाट पाहणारं कुणीतरी असतं म्हणून घराची वाट धरण्याची ओढ असते. दिवसभर काम करणारा नोकरदार असो, कामगार असो, कुणी मोठा ऑफिसर, उद्योजक वा व्यापारी असो, प्रत्येकालाच संध्याकाळपासूनच घरी जाण्याचे वेध लागलेले असतात. संध्याकाळच्या 70 टक्के गर्दीचे पाय घरच्या दिशेने धावणारे असतात. शाळेतल्या मुलांची तर फारच मजा येते. शाळा सुटली की ‘हो..’ अशा सामूहिक आनंदस्वरांच्या लहरी घराकडे धावू लागतात. घराचं हे साधंसुधं पण मनोहर स्वप्न सगळ्यांचंच असतं. हे ‘घरटं’ म्हणजे साधी ‘झोपडी’सुद्धा चालते. कारण, राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली। ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माङया।। अगदी साधी, शेणाने सारवलेली झोपडीसुद्धा समाधानाचं माप, पदरात भरभरून टाकते. तिथे साध्या भाजी-भाकरीत अमृताची गोडी असते. कांदा, मुळा, भाजी ‘विठाई’ होऊन येतात. शेणसडा घातलेल्या अंगणातली रांगोळी तुळशीबरोबर गुजगोष्ष्टी करीत असते. तोरण वा:यासवे हलून ‘हुंकारा’ देत असते. घरातली कमीच पण ‘लखलख’ भांडी, घराचं स्वच्छ चित्र दाखवतात. अंगणात नातवांसह आजोबा-आजींची मैफील जमलेली असते. सासुरवाशीण काम करताना मधूनच अंगणातल्या सदाफुली, जास्वंदीशी गप्पा मारीत असते. ही फुलं तिला प्रतिकूल परिस्थितीतली वाट आनंदाने चालायला शिकवतात. ग्रामीण भागात तर हे चित्र दिसतंच. मी जेव्हा जेव्हा अशा ठिकाणी जाते किंवा प्रवासातही काही वेळा अशा झोपडय़ा दिसतात. तेव्हा मी ही ‘घरे’ मनाच्या चंदनी पेटीत साठवत राहते. ब:याचदा आपण पाहतो, काही इमारती खूप जुन्या झालेल्या असतात. तिथल्या घरांमधील लोक कसेबसे, जीव मुठीत धरून राहात असतात. इमारत मोडकळीस आलेली असते. पण त्या घरातल्या लोकांची ‘जिद्द’ ताठ उभी असते. कशाबशा उभ्या असणा:या त्या घरांच्या आजुबाजूला, लहानशा जागेत, जीव मुठीत धरून बसलेल्या कुंडय़ांमधून गुलाब, मोगरा, शेवंती इ.फुले तुळशीसोबत हसत असतात. जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा देत असतात. ते पाहून मला आठवतं एक शक्य, ‘घोसले में रहकर आसमान में उडने का एहसास कैसे होता है, यह एक चिडियांसे पुछो’, आणि मग त्या घरांमध्ये राहणारे लोक मला चिमण्यांसारखे वाटू लागतात. आपलं घर सर्वानाच सुरक्षित वाटतं. आपल्या घरात येऊन आपल्यालाच कुणी बोलू शकत नाही, रागवू शकत नाही. घरात आई असते. आई हेच त्यांचं घर असतं. लहान मुलांसाठी जसा आईचा पदर असतो, तसाच घराचा पदर घरातल्या सर्वासाठी असतो. नोकरीनिमित्ताने बालपणंच घर सोडून शहरात गेलेल्यांनाही बालपणंच घर कायम खुणावत असतं. लेखक- कवींचं मन तर तिथे गुंतलेलंच असतं. कवी अनिल भारतींची ही कविता आपल्या आठवणीतल्या घराला साद घालते. खरंच, असं असतं ‘घर’ जे आपल्या मनात कायमचं ‘घर’ करून बसलेलं असतं, बसलेलं असतं..