शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

आपलं घर हातभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:48 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात माया धुप्पड यांचा लेख.

‘आपलं घर हातभर’ असं जे म्हटलं जातं ते अगदी खरं तर आहेच पण खूप सुंदरही आहे. हे शब्द तनामनाला विसावा देतात, हातभर शब्दापासून आभाळभर अर्थ व्यक्त करतात. हे शब्द म्हणजे प्रत्येकाच्या मनातील ‘आपल्या घरात आपण राजे’ हा भाव व्यक्त करणारी एक भाववृत्ती आहे. काही कारणाने आपण नातेवाईकांकडे जातो. तेव्हा पहिल्या दिवशी पाहुणा, दुस:या दिवशी पै आणि तिस:या दिवशी त्याची अक्कलच काढली जाते, ही प्रचिती सर्वानाच येते. ते साहजिकच आहे. त्याचं वाईट वाटण्याचंही कारण नसतं. याच्याही पलीकडे जाऊन ब:याच ठिकाणी छान आदर सत्कार होतात. दोन-चार दिवस आणखी राहण्याचा आग्रहसुद्धा होतो. पण ते शब्द आणि त्या कृती अर्थातच विशिष्ट मर्यादेच्या वतरुळात फिरत असतात. म्हणूनच आपण त्या पाहुणचाराच्या, त्या घराच्या वतरुळातून बाहेर पडतो. आपल्या घरी आल्यावर मात्र परीघ नसलेल्या वतरुळात आल्यासारखं वाटतं. वागण्या-बोलण्याच्या वतरुळाचा परीघ विस्तारत जातो. तिथे आपली सत्ता असते. आपलं घर राजमहाल नसलं तरी आपण मात्र आपल्या घरात ‘राजे’ असतो. महालाला ‘महाल’ म्हटलं जातं, ‘घर’ नाही. ‘घर’, किती सुरेख शब्द! दोन अक्षरी. ना काना, ना मात्रा, ना उकार, ना वेलांटी, म्हणजेच द्वेष, मत्सर, अपमान, कमीपणा काहीच नाही. ‘घर’ या दोन अक्षरांच्या वर, खाली, आजू-बाजूला अनेक भावभावनांचे सुंदर गोफ विणलेले असतात. युगायुगाची हवीशी वाटणारी बंधनं, प्रेम, आपलेपण, स्नेह, माया, लळा, जिव्हाळा यांचे गोफ या शब्दाभोवती विणलेले असतात. परस्परांच्या सुखदु:खात एकरूप होण्याची एक दिव्य शक्ती ‘घर’ या संकल्पनेने मनात रुजते आणि फुलते. घरी वाट पाहणारं कुणीतरी असतं म्हणून घराची वाट धरण्याची ओढ असते. दिवसभर काम करणारा नोकरदार असो, कामगार असो, कुणी मोठा ऑफिसर, उद्योजक वा व्यापारी असो, प्रत्येकालाच संध्याकाळपासूनच घरी जाण्याचे वेध लागलेले असतात. संध्याकाळच्या 70 टक्के गर्दीचे पाय घरच्या दिशेने धावणारे असतात. शाळेतल्या मुलांची तर फारच मजा येते. शाळा सुटली की ‘हो..’ अशा सामूहिक आनंदस्वरांच्या लहरी घराकडे धावू लागतात. घराचं हे साधंसुधं पण मनोहर स्वप्न सगळ्यांचंच असतं. हे ‘घरटं’ म्हणजे साधी ‘झोपडी’सुद्धा चालते. कारण, राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली। ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माङया।। अगदी साधी, शेणाने सारवलेली झोपडीसुद्धा समाधानाचं माप, पदरात भरभरून टाकते. तिथे साध्या भाजी-भाकरीत अमृताची गोडी असते. कांदा, मुळा, भाजी ‘विठाई’ होऊन येतात. शेणसडा घातलेल्या अंगणातली रांगोळी तुळशीबरोबर गुजगोष्ष्टी करीत असते. तोरण वा:यासवे हलून ‘हुंकारा’ देत असते. घरातली कमीच पण ‘लखलख’ भांडी, घराचं स्वच्छ चित्र दाखवतात. अंगणात नातवांसह आजोबा-आजींची मैफील जमलेली असते. सासुरवाशीण काम करताना मधूनच अंगणातल्या सदाफुली, जास्वंदीशी गप्पा मारीत असते. ही फुलं तिला प्रतिकूल परिस्थितीतली वाट आनंदाने चालायला शिकवतात. ग्रामीण भागात तर हे चित्र दिसतंच. मी जेव्हा जेव्हा अशा ठिकाणी जाते किंवा प्रवासातही काही वेळा अशा झोपडय़ा दिसतात. तेव्हा मी ही ‘घरे’ मनाच्या चंदनी पेटीत साठवत राहते. ब:याचदा आपण पाहतो, काही इमारती खूप जुन्या झालेल्या असतात. तिथल्या घरांमधील लोक कसेबसे, जीव मुठीत धरून राहात असतात. इमारत मोडकळीस आलेली असते. पण त्या घरातल्या लोकांची ‘जिद्द’ ताठ उभी असते. कशाबशा उभ्या असणा:या त्या घरांच्या आजुबाजूला, लहानशा जागेत, जीव मुठीत धरून बसलेल्या कुंडय़ांमधून गुलाब, मोगरा, शेवंती इ.फुले तुळशीसोबत हसत असतात. जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा देत असतात. ते पाहून मला आठवतं एक शक्य, ‘घोसले में रहकर आसमान में उडने का एहसास कैसे होता है, यह एक चिडियांसे पुछो’, आणि मग त्या घरांमध्ये राहणारे लोक मला चिमण्यांसारखे वाटू लागतात. आपलं घर सर्वानाच सुरक्षित वाटतं. आपल्या घरात येऊन आपल्यालाच कुणी बोलू शकत नाही, रागवू शकत नाही. घरात आई असते. आई हेच त्यांचं घर असतं. लहान मुलांसाठी जसा आईचा पदर असतो, तसाच घराचा पदर घरातल्या सर्वासाठी असतो. नोकरीनिमित्ताने बालपणंच घर सोडून शहरात गेलेल्यांनाही बालपणंच घर कायम खुणावत असतं. लेखक- कवींचं मन तर तिथे गुंतलेलंच असतं. कवी अनिल भारतींची ही कविता आपल्या आठवणीतल्या घराला साद घालते. खरंच, असं असतं ‘घर’ जे आपल्या मनात कायमचं ‘घर’ करून बसलेलं असतं, बसलेलं असतं..