शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

आपलं घर हातभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:48 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात माया धुप्पड यांचा लेख.

‘आपलं घर हातभर’ असं जे म्हटलं जातं ते अगदी खरं तर आहेच पण खूप सुंदरही आहे. हे शब्द तनामनाला विसावा देतात, हातभर शब्दापासून आभाळभर अर्थ व्यक्त करतात. हे शब्द म्हणजे प्रत्येकाच्या मनातील ‘आपल्या घरात आपण राजे’ हा भाव व्यक्त करणारी एक भाववृत्ती आहे. काही कारणाने आपण नातेवाईकांकडे जातो. तेव्हा पहिल्या दिवशी पाहुणा, दुस:या दिवशी पै आणि तिस:या दिवशी त्याची अक्कलच काढली जाते, ही प्रचिती सर्वानाच येते. ते साहजिकच आहे. त्याचं वाईट वाटण्याचंही कारण नसतं. याच्याही पलीकडे जाऊन ब:याच ठिकाणी छान आदर सत्कार होतात. दोन-चार दिवस आणखी राहण्याचा आग्रहसुद्धा होतो. पण ते शब्द आणि त्या कृती अर्थातच विशिष्ट मर्यादेच्या वतरुळात फिरत असतात. म्हणूनच आपण त्या पाहुणचाराच्या, त्या घराच्या वतरुळातून बाहेर पडतो. आपल्या घरी आल्यावर मात्र परीघ नसलेल्या वतरुळात आल्यासारखं वाटतं. वागण्या-बोलण्याच्या वतरुळाचा परीघ विस्तारत जातो. तिथे आपली सत्ता असते. आपलं घर राजमहाल नसलं तरी आपण मात्र आपल्या घरात ‘राजे’ असतो. महालाला ‘महाल’ म्हटलं जातं, ‘घर’ नाही. ‘घर’, किती सुरेख शब्द! दोन अक्षरी. ना काना, ना मात्रा, ना उकार, ना वेलांटी, म्हणजेच द्वेष, मत्सर, अपमान, कमीपणा काहीच नाही. ‘घर’ या दोन अक्षरांच्या वर, खाली, आजू-बाजूला अनेक भावभावनांचे सुंदर गोफ विणलेले असतात. युगायुगाची हवीशी वाटणारी बंधनं, प्रेम, आपलेपण, स्नेह, माया, लळा, जिव्हाळा यांचे गोफ या शब्दाभोवती विणलेले असतात. परस्परांच्या सुखदु:खात एकरूप होण्याची एक दिव्य शक्ती ‘घर’ या संकल्पनेने मनात रुजते आणि फुलते. घरी वाट पाहणारं कुणीतरी असतं म्हणून घराची वाट धरण्याची ओढ असते. दिवसभर काम करणारा नोकरदार असो, कामगार असो, कुणी मोठा ऑफिसर, उद्योजक वा व्यापारी असो, प्रत्येकालाच संध्याकाळपासूनच घरी जाण्याचे वेध लागलेले असतात. संध्याकाळच्या 70 टक्के गर्दीचे पाय घरच्या दिशेने धावणारे असतात. शाळेतल्या मुलांची तर फारच मजा येते. शाळा सुटली की ‘हो..’ अशा सामूहिक आनंदस्वरांच्या लहरी घराकडे धावू लागतात. घराचं हे साधंसुधं पण मनोहर स्वप्न सगळ्यांचंच असतं. हे ‘घरटं’ म्हणजे साधी ‘झोपडी’सुद्धा चालते. कारण, राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली। ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माङया।। अगदी साधी, शेणाने सारवलेली झोपडीसुद्धा समाधानाचं माप, पदरात भरभरून टाकते. तिथे साध्या भाजी-भाकरीत अमृताची गोडी असते. कांदा, मुळा, भाजी ‘विठाई’ होऊन येतात. शेणसडा घातलेल्या अंगणातली रांगोळी तुळशीबरोबर गुजगोष्ष्टी करीत असते. तोरण वा:यासवे हलून ‘हुंकारा’ देत असते. घरातली कमीच पण ‘लखलख’ भांडी, घराचं स्वच्छ चित्र दाखवतात. अंगणात नातवांसह आजोबा-आजींची मैफील जमलेली असते. सासुरवाशीण काम करताना मधूनच अंगणातल्या सदाफुली, जास्वंदीशी गप्पा मारीत असते. ही फुलं तिला प्रतिकूल परिस्थितीतली वाट आनंदाने चालायला शिकवतात. ग्रामीण भागात तर हे चित्र दिसतंच. मी जेव्हा जेव्हा अशा ठिकाणी जाते किंवा प्रवासातही काही वेळा अशा झोपडय़ा दिसतात. तेव्हा मी ही ‘घरे’ मनाच्या चंदनी पेटीत साठवत राहते. ब:याचदा आपण पाहतो, काही इमारती खूप जुन्या झालेल्या असतात. तिथल्या घरांमधील लोक कसेबसे, जीव मुठीत धरून राहात असतात. इमारत मोडकळीस आलेली असते. पण त्या घरातल्या लोकांची ‘जिद्द’ ताठ उभी असते. कशाबशा उभ्या असणा:या त्या घरांच्या आजुबाजूला, लहानशा जागेत, जीव मुठीत धरून बसलेल्या कुंडय़ांमधून गुलाब, मोगरा, शेवंती इ.फुले तुळशीसोबत हसत असतात. जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा देत असतात. ते पाहून मला आठवतं एक शक्य, ‘घोसले में रहकर आसमान में उडने का एहसास कैसे होता है, यह एक चिडियांसे पुछो’, आणि मग त्या घरांमध्ये राहणारे लोक मला चिमण्यांसारखे वाटू लागतात. आपलं घर सर्वानाच सुरक्षित वाटतं. आपल्या घरात येऊन आपल्यालाच कुणी बोलू शकत नाही, रागवू शकत नाही. घरात आई असते. आई हेच त्यांचं घर असतं. लहान मुलांसाठी जसा आईचा पदर असतो, तसाच घराचा पदर घरातल्या सर्वासाठी असतो. नोकरीनिमित्ताने बालपणंच घर सोडून शहरात गेलेल्यांनाही बालपणंच घर कायम खुणावत असतं. लेखक- कवींचं मन तर तिथे गुंतलेलंच असतं. कवी अनिल भारतींची ही कविता आपल्या आठवणीतल्या घराला साद घालते. खरंच, असं असतं ‘घर’ जे आपल्या मनात कायमचं ‘घर’ करून बसलेलं असतं, बसलेलं असतं..