शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानामधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:09 IST

श्रावण म्हणजे व्रत वैकल्पे, श्रावण म्हणजे उपवास -तपास

श्रावण महिना म्हणजे आनंद, उत्साहाची पर्वणीच ! श्रावण म्हणजे हिरवाईच्या वैभवाची लयलूट, श्रावण म्हणजे व्रत वैकल्पे, श्रावण म्हणजे उपवास -तपास, श्रावण म्हणजे धार्मिक ग्रंथाचे श्रवण, श्रावण म्हणजे सणावारांची पुण्यपर्वणी, श्रावण म्हणजे वर्षा सहलींची मेजवानी ! धार्मिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक दृष्टीने तसेच वैज्ञानिक अंगानेही श्रावण हा बारा महिन्यातला अत्यंत महत्वाचा महिना आहे. भगवंताचे खरे दर्शन आपल्याला श्रावणातच होते. म्हणूनच कवयित्री बहिणाबाई सांगतात,‘तुझ्या पायाची चाहुल लागे पानापानामधी ।देवा तुझं येनं जानं वारा संगे कानामधी ।।हिरवकंच वस्त्र लेवून, हिरवा चुडा घालून, हिरवा शालू पांघरून हिरवाईने मंडित झालेली सृष्टी देवता या वैभवाचं दान देणाऱ्या विधात्याच्या स्वागताला या श्रावण महिन्यातच सज्ज झालेली दिसते.या ओळीतून बालकवींनी श्रावणाचे दृश्य रूप आपल्यासमोर उभे केले आहे. ‘श्रावणात घननिळा पासून’, रिमझिम के गीत सावन गाये ’ पर्यंत अनेक कवी व गीतकारांनी श्रावणाचं हे वैभव आपापल्या पद्धतीने वर्णन केलं आहे. प्रेमिकांना श्रावण प्रेमाची महती सांगतो. धार्मिकांना धर्मपारायण करतो, उपासकांना उपासनेचा संदेश देतो. तर कलावंतांच्या प्रतिभेला नवोन्मेषाचे धुमारे फुलवितो. प्रत्येकजण श्रावणाकडे आपल्या नजरेने पाहातो. आपल्या दृष्टीने श्रावणाचे चित्र रेखाटतो, श्रावणाचे गीत गातो. भगवान श्रीकृष्ण कंसाच्या दरबारात जातांना मथुरेतील लोकांनी त्यांचे प्रथम दर्शन घेतले तेव्हा मल्लांना तो मलू वाटला, वृद्धांचा वात्सल्यभाव जागा झाला, तरूणींना त्याचा रूपात मदनाचे रूप दिसले, तर बालकांना तो सवंगडी वाटला तसेच श्रावण महिन्याचे आहे. प्रत्येकाला तो वेगळा वाटत असला तरी श्रावण हा उत्साहाचा आणि उत्सवाचा महिना आहे हे मात्र खरं !- प्रा. सी.एस.पाटील. धरणगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव