शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विषप्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या : विहिरीत तोल गेल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:43 IST

पारोळा : आंबापिंप्री येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणास कंटाळुन विषप्राशन करून गुरुवारी आत्महत्या केली. प्रवीण शालिक माळी (वय ३५) यांच्यावर विविध ...

पारोळा : आंबापिंप्री येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणास कंटाळुन विषप्राशन करून गुरुवारी आत्महत्या केली.प्रवीण शालिक माळी (वय ३५) यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटी व हातउसनवारीचे कर्ज होते. तसेच सततच्या नापिकीमुळे ते हताश झाले होते. या विवंचनेत त्यांनी २६ रोजी सायंकाळी ५ ते साडेसहा वाजेच्या कपाशीवर फवारणीचे विषारी औषध सेवन केले. त्याचा परिणाम लक्षात येताच त्यांना उपचारासाठी कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.याबाबत पारोळा पोलिसात शालिक माळी यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास काशिनाथ पाटील करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी व मुलगी आहे.

विहिरीत तोल गेल्याने युवकाचा मृत्यूपारोळा : टिटवी येथील १९ वर्षीय युवकाचा शेतातील विहिरीवर हात-पाय धुण्यासाठी गेला असता तोल गेल्याने विहिरीत पडून मत्यू झाला. ही घटना २६ रोजी सायंकाळी घडली.राजेंद्र धनराज सोनवणे (१९) हा शेतात काम झाल्यानंतर विहिरीवर हात-पाय धुण्यासाठी गेला असता पाय घसरून विहिरीत तोल गेला. ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले. पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवलदार कैलास शिंदे तपास करीत आहेत.