शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त एलईडीची माहिती मिळणार बसल्याजागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST

शहरात बसविण्यात आले १७ हजार एलईडी : तब्बल दोन वर्षांनंतर झाले काम पूर्ण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात ...

शहरात बसविण्यात आले १७ हजार एलईडी : तब्बल दोन वर्षांनंतर झाले काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरात ईएसएल कंपनीच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यात एकूण १७ हजार ४०० एलईडीचे पथदिवे बसविण्यात आले आहेत. हे एलईडी बसविण्याचे काम पूर्ण झाले असले तरी, एलईडी पुन्हा बंद होणार नाही किंवा बंद पडल्यास तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी संबंधित कंपनीकडून शहरातील १२५ ठिकाणी सेंट्रल मॉनेटरिंग ऑपरेटिंग सिस्टिम बसविण्यात आली असून, शहरातील कोणत्याही भागात एलईडी बंद पडला तरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बसल्या जागी याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी देखभाल-दुरुस्तीच्या कामात सातत्य राहणार आहे.

शहरात गेल्या दोन वर्षांपूर्वी मनपाकडून एस्को तत्त्वावर सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या निधीतून ईएसएल या कंपनीला सात वर्षांसाठी शहरात १५ हजार ६०० एलईडी लावण्याचा ठेका देण्यात आला होता. मात्र, संबंधित ठेकेदाराने कोणताही डीपीआर सादर न करताच हे काम सुरू केल्याने व कामात देखील गुणवत्ता नसल्याने अनेक नगरसेवकांकडून याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच हा ठेका रद्द करण्याची मागणी केल्यानंतर हा ठेका रद्द करण्याचा ठराव देखील महापालिकेत करण्यात आला होता. मात्र, कायदेशीर अडचणींमुळे या ठेकेदाराला नवीन डीपीआर तयार करून नव्याने काम सुरू करण्याचा सूचना मनपाने दिल्यानंतर तीन महिन्यात ठेकेदाराने शहरात मुख्य भागासह विविध कॉलनी भागात तब्बल १७ हजार ४०० एलईडी नव्याने बसविले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून महापौर जयश्री महाजन यांनी देखील याबाबतचा आढावा घेऊन, हे काम पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम्‌ दिला होता. या अल्टिमेटम्‌नंतर हे काम पूर्ण झाले आहे.

१२५ ठिकाणी काम करणार सिस्टिम

पहिल्या टप्प्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसात एलईडी दिवे बंद पडण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारीनंतर दुसऱ्या टप्प्यात संबंधित ठेकेदाराने सेंट्रल मॉनेटरिंग ऑपरेटिंग सिस्टिम कार्यान्वित केली आहे. त्यानुसार १२५ ठिकाणी ही सिस्टिम बसविण्यात आली असून, यामुळे कोणत्या भागात किती दिवे बंद आहेत याची माहिती कळेल. तसेच एकाचवेळी पथदिवे सुरू व बंद करणे सोपे होणार आहे.

दरम्यान, ईएसएल कंपनीने एलईडी लावण्याचे काम पूर्ण केले असले तरी पुढील सात वर्षांपर्यंत या कंपनीमार्फत योजनेचे देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. मनपाने काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्यानंतर योजनेसाठी झालेला खर्च व देखभाल-दुरुस्तीसाठी लागणारी फी याबाबत खर्चाचा आढावा सादर केला जाणार आहे.