शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

घरात खायलाच मिळत नाही म्हणून भीक मागून भरावे लागते पोट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:13 IST

जळगाव : जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात आह़े. या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ मुली व १६ ...

जळगाव : जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात आह़े. या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ मुली व १६ मुले अशी २१ बालके आढळून आली. या बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात १०८ मुले हरविल्याची नोंद पोलिसांकडे आहे. त्यात ४९ मुली तर ५९ मुलांचा समावेश आहे. जिल्ह्यात केशवस्मृती प्रतिष्तान अंतर्गत समतोल प्रकल्पाचीही मदत घेतली जाते.

घरापासून दुरावलेले, हरवलेले आणि बालमजुरीच्या जोखडात अडकून पडलेल्या बालकांच्या सुटकेसाठी ऑपरेशन मुस्कान सुरू करण्यात आले आह़े या अंतर्गत अनेक बालकांना मुख्य प्रवाहात आणले. या अभियानात पथकांनी बसस्थानक, रेल्वेस्थानक, धार्मिक स्थळे, हॉटेल्स, ढाबे याठिकाणी भेटी देऊन तेथे काम करणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.

जिल्ह्यात मुले हरविल्याच्या तक्रारी संख्या

जानेवारी६४

फेब्रुवारी १०२

मार्च९२

एप्रिल २१

मे७५

जून६२

जुलै १०३

ऑगस्ट५०

सप्टेंबर २२३

ऑक्टोबर २०७

नोव्हेंबर६२

बाप दारु पितो...

बाप दारु पितो, आई त्याच्या त्रासाला कंटाळली आहे. मिळेल तेथून खायला जेवण मागून आणते, कधी मिळते तर कधी मिळत नाही. त्यामुळे भीक मागून थोडेफार पैसे मिळतात, त्यातून खायला घेतो. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, झोपडपट्टी भागात किंवा मंदिर परिसरात जेथे जागा मिळेल तेथे झोपून घ्यायचे, हातपंपावर हातपाय धुवायचे व पुन्हा रोज भीक मागून पोट भरायचे, असा दिनक्रम असल्याचे एका बालकाने पोलिसांकडे सांगितले. या बालकाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

माय बापच नाही

या मोहिमेत काही वर्षांपूर्वी तर काही बालके अशी सापडली की, त्यांना त्यांचे माय बाप कोण? गाव कोणते, नातेवाईक कोण? याचीही माहिती सांगता आली नाही. अशा निराधार बालकांना बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले. ही बालके भुसावळ रेल्वे स्थानकावर आढळून आली होती. दरम्यान, काही बालके बालनिरीक्षणगृहातूनही निघून जातात. पुन्हा ते भीक मागणे व कचरा गोळा करून उदरनिर्वाह भागवितात. दरवर्षी असा अनुभव येतो.

माय बापांचेच दुर्लक्ष

काही बालके कचरा वेचताना तर काही बालके भीक मागताना सापडली. त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. काही दिवस त्यांच्याजवळ थ‌ांबल्यानंतर ते पुन्हा घरातून निघून जातात. आपला मुलगा कुठे गेला, याचा शोध घेण्याचीही तसदी पालकांकडून घेतली जात नाही. काही दिवसात ते परत येतात, असे उत्तर पालकांकडून मिळाले. या मुलांचेही घरात मन लागत नाही. भीक मागून मिळालेल्या पैशात चटपटीत खायला मिळते, घरी तसे मिळत नाही, असेही अनुभव आहेत.

पुनर्वसन करण्याचा प्रयत्न

जिल्हा पोलीस दलातर्फे केशवस्मृती प्रतिष्ठान अंतर्गत समतोल प्रकल्पाच्या मदतीने जिल्ह्यात हरवलेल्या बालकांसाठी ही शोध मोहीम राबविण्यात आली. सापडलेल्या बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आता यापुढे पुनर्वसन केले जाणार आहे.

- किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.