शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

घरात खायलाच मिळत नाही म्हणून भीक मागून भरावे लागते पोट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:13 IST

जळगाव : जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात आह़े. या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ मुली व १६ ...

जळगाव : जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात आह़े. या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ मुली व १६ मुले अशी २१ बालके आढळून आली. या बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात १०८ मुले हरविल्याची नोंद पोलिसांकडे आहे. त्यात ४९ मुली तर ५९ मुलांचा समावेश आहे. जिल्ह्यात केशवस्मृती प्रतिष्तान अंतर्गत समतोल प्रकल्पाचीही मदत घेतली जाते.

घरापासून दुरावलेले, हरवलेले आणि बालमजुरीच्या जोखडात अडकून पडलेल्या बालकांच्या सुटकेसाठी ऑपरेशन मुस्कान सुरू करण्यात आले आह़े या अंतर्गत अनेक बालकांना मुख्य प्रवाहात आणले. या अभियानात पथकांनी बसस्थानक, रेल्वेस्थानक, धार्मिक स्थळे, हॉटेल्स, ढाबे याठिकाणी भेटी देऊन तेथे काम करणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.

जिल्ह्यात मुले हरविल्याच्या तक्रारी संख्या

जानेवारी६४

फेब्रुवारी १०२

मार्च९२

एप्रिल २१

मे७५

जून६२

जुलै १०३

ऑगस्ट५०

सप्टेंबर २२३

ऑक्टोबर २०७

नोव्हेंबर६२

बाप दारु पितो...

बाप दारु पितो, आई त्याच्या त्रासाला कंटाळली आहे. मिळेल तेथून खायला जेवण मागून आणते, कधी मिळते तर कधी मिळत नाही. त्यामुळे भीक मागून थोडेफार पैसे मिळतात, त्यातून खायला घेतो. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, झोपडपट्टी भागात किंवा मंदिर परिसरात जेथे जागा मिळेल तेथे झोपून घ्यायचे, हातपंपावर हातपाय धुवायचे व पुन्हा रोज भीक मागून पोट भरायचे, असा दिनक्रम असल्याचे एका बालकाने पोलिसांकडे सांगितले. या बालकाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

माय बापच नाही

या मोहिमेत काही वर्षांपूर्वी तर काही बालके अशी सापडली की, त्यांना त्यांचे माय बाप कोण? गाव कोणते, नातेवाईक कोण? याचीही माहिती सांगता आली नाही. अशा निराधार बालकांना बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले. ही बालके भुसावळ रेल्वे स्थानकावर आढळून आली होती. दरम्यान, काही बालके बालनिरीक्षणगृहातूनही निघून जातात. पुन्हा ते भीक मागणे व कचरा गोळा करून उदरनिर्वाह भागवितात. दरवर्षी असा अनुभव येतो.

माय बापांचेच दुर्लक्ष

काही बालके कचरा वेचताना तर काही बालके भीक मागताना सापडली. त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. काही दिवस त्यांच्याजवळ थ‌ांबल्यानंतर ते पुन्हा घरातून निघून जातात. आपला मुलगा कुठे गेला, याचा शोध घेण्याचीही तसदी पालकांकडून घेतली जात नाही. काही दिवसात ते परत येतात, असे उत्तर पालकांकडून मिळाले. या मुलांचेही घरात मन लागत नाही. भीक मागून मिळालेल्या पैशात चटपटीत खायला मिळते, घरी तसे मिळत नाही, असेही अनुभव आहेत.

पुनर्वसन करण्याचा प्रयत्न

जिल्हा पोलीस दलातर्फे केशवस्मृती प्रतिष्ठान अंतर्गत समतोल प्रकल्पाच्या मदतीने जिल्ह्यात हरवलेल्या बालकांसाठी ही शोध मोहीम राबविण्यात आली. सापडलेल्या बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आता यापुढे पुनर्वसन केले जाणार आहे.

- किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.