शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

यंदाही सलग दुसऱ्या वर्षी वारकरी पंढरीच्या वारीला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST

हरताळा, ता.मुक्ताईनगर : कोरोनाची लाट बरीचशी ओसरल्याने, यंदा तरी आषाढी एकादशीनिमित्त वारी होईल आणि विठुरायाचे दर्शन घेता येईल, अशी ...

हरताळा, ता.मुक्ताईनगर : कोरोनाची लाट बरीचशी ओसरल्याने, यंदा तरी आषाढी एकादशीनिमित्त वारी होईल आणि विठुरायाचे दर्शन घेता येईल, अशी आशा हरताळा व परिसरातील वारकऱ्यांना होती, परंतु शासनाने वारीवर निर्बंध कायम ठेवल्याने सलग दुसऱ्या वर्षी वारकरी पंढरीच्या वारीला मुकणार आहेत.

हरताळा, सालबर्डी, कोथळी परिसरातून दरवर्षी भक्त गावागावातून मुक्ताई पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी पायी दिंडीतून विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. पेरण्या संपल्या की, वारकऱ्याला ओढ लागायची ती म्हणजे सगळ्यांच्या भेटीची, त्यात पांडुरंगाच्या भेटीची मोठी आस. विशेष महत्त्व देत ‘भेटी लागी जीवा, लागलीसे आस...’ म्हणत प्रत्येक वारकऱ्याचे पाय टाळमृदंगाच्या गजरात पंढरीच्या वाटेवर चालू लागायचे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी वेडे झालेले शेकडो भाविक ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता पंढरीची वाट धरायचे, परंतु कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांची वारी चुकत आहे. तीस, चाळीस वर्षे झाली, सलग विठुरायाची भेट घेत कोणी पाई, तर कोणी आपल्या स्वतःच्या वाहनाने किंवा बसने जात विठ्ठलाचे दर्शन घेऊन पंढरीची वारी करत. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने यंदा तरी पंढरीची वारी होईल आणि विठुरायाचे दर्शन होईल, अशी आशा वारकऱ्यांना होती, परंतु शासनाच्या निर्णयामुळे यंदाही वारकरी या वारीला मुकणार आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आठवणींची वारी भावनांचा विठ्ठल

टाळमृदंगाच्या गजरात वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघत असल्याच्या आठवणींना उजाळा देत, गावात पारावर चावडीवरती आबाल वृद्ध वारकऱ्यांच्या गप्पा रंगत आहेत. मुक्काम इथे असता, असे झाले असते... अशी आठवणींची वारीच आता आहे, पण वारी नाही, हे सत्य स्वीकारताना भक्तांचा ऊर गहिवरतो. चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची आठवण होते. काहीही असले, तरी विठुरायाची आठवण कायम आहे. भजन, कीर्तनाचे आवाज नसले व ज्ञानोबा, तुकाराम यांचा जयघोष नसला, तसेच भगवी पताका आणि तुळशीवृंदावन डोक्यावर नसले, तरी आठवणींची वारी भावनांच्या विठ्ठलाच्या दर्शनाला निघाली आहे.

वारकरी प्रतिक्रिया

मागील तीस वर्षांपासून मी व माझ्या परिवारासह गावातील वारकऱ्यांसोबत पंढरीची वारी करतो. आषाढी जवळ आली की, पाय आणि मन पंढरीच्या वाटेने धावू लागतात. पायी दिंडी सोहळ्यात मिळणारा निर्मळ आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही पोरके झालो आहोत. आज पाय जरी जागेवर थांबले असले, तरी मन मात्र कायम दिंडीत रमलेले असते. हे विठुराया कोरोनाचे संकट लवकर दूर कर व आम्हा वारकऱ्यांना पुन्हा एकदा तुझ्या या भक्ती सोहळ्यात जाऊ दे.

- महादू त्रंबक पाटील, वारकरी हरताळा, ता.मुक्ताईनगर.