शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

यंदा वहनोत्सवात ना पानसुपारी ना भारुडांची रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:16 IST

जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्यावतीने आयोजित वहनोत्सव यंदा झाला खरा, मात्र कोरोनामुळे परवानगीअभावी ग्रामप्रदक्षिना होऊ ...

जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्यावतीने आयोजित वहनोत्सव यंदा झाला खरा, मात्र कोरोनामुळे परवानगीअभावी ग्रामप्रदक्षिना होऊ शकली नाही. दरवर्षी असणारा पानसुपारीचा कार्यक्रम व भारुडांचीही रंगत यंदा शहरवासीयांना अनुभवता आली नाही. मात्र परंपरा अखंडित राहण्यासाठी मंदिर परिसरातच वहन काढण्यात आले.

तीनशे वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या वहनोत्सवाला आहे. हा वहनोत्सव म्हणजे जळगावकरांसाठी धार्मिकतेसह सांस्कृतिक मेजवाणीही असते. कारण काय तर या उत्सवात भाविकांकडून ठिकठिकाणी होणारी पूजा-अर्चा व या सोबतच लोककलेचे दर्शन घडविणाऱ्या भारुडांचे यात सादरीकरण केेले जाते. यंदा मात्र या धार्मिक व सांस्कृतिक मेजवानीला जळगावकर मुकले ते केवळ अख्ख्या जगाला वेठीस धरलेल्या कोरोना संसर्गामुळे. इतकेच नव्हे यंदा प्रथमच याच कोरोनामुळे वहनाच्या ग्रामप्रदक्षिणेत खंड पडला.

१८ पगड जाती जमातींना एकत्र करून सद्गुरू श्री संत अप्पा महाराज यांनी शके १७९४ (सन १८७२) मध्ये सुरू केलेला रथोत्सव म्हणजे श्रीराम मंदिर संस्थानचा सर्वोच्च मानबिंदूच. संस्थानतर्फे साजरा होणाऱ्या श्रीराम रथोत्सवाचे वेध लागतात ते वहनोत्सवापासून.

काकडारती व पूजा अभिषेकाची अनोखी परंपरा

पहाटे ५ ते ७ या वेळेत काकडा आरती, पूजा, अभिषेक, मंगलारती होऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ व सामूहिक रामजप केला जातो. त्यानंतर निमखेडी शिवारातील श्रीराम मंदिर येथे पालखी जाते व गिरणा नदीच्या पात्रात प्रभू श्रीराम यांच्या उत्सव मूर्तीस व श्रीसंत मुक्ताबाईंच्या पादुकांना जलाभिषेक व पूजन करण्यात येते. तसेच श्रीरामांच्या आरतीने वहनाला प्रारंभ होतो. मात्र यंदा पहाटेपासूनचा हा धार्मिक मेळा अनुभवता आला नाही.

रांगोळ्या, सडासमार्जन दिसलेच नाही

घरी वहन येणार, आपल्या हातून आरती होणार हीच खरी दिवाळी असल्याची भावना कुटुंबामध्ये दरवर्षी असते. यासाठी पानसुपारीला मोठे महत्त्व असते. दरवर्षी वेगवेगळे यजमान पानसुपारी मान स्वीकारतात. विशेष म्हणजे यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला जातो. या निमित्ताने परिसरात रांगोळ्या, सडासमार्जन करून परिसर स्वच्छ करण्यात येतो. या निमित्ताने दोन दिवसांपासून कुटुंबात अतिशय उत्साहाचे वातावरण असते व त्यासाठीची तयारी, शेजारच्यांना निमंत्रण, मित्र परिवारास निमंत्रण अशी प्रक्रिया आठवड्यापासून सुरू असते. मात्र यंदा वहन मंदिर परिसरात फिरविण्यात आल्याने हा सोहळ्यापासून भाविक वंचित राहिले.

संबळ, मृदुंग, नाल, टाळ, पेटी शांत-शांत

श्रीराम मंदिर संस्थान मंदिराला लाभलेला धार्मिक व सांस्कृतिक वारसा हा अतिप्राचीन आहे. रथोत्सवाचे वारे वाहू लागले की त्या दरम्यान राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमधील सहभागीतांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. काकड आरती, भजने, तुळशीची आरती व त्यानंतर सुरू होते ती सायंकाळची धावपळ. सायंकाळी निघणारे वहन म्हणजे उत्साहाला पारावार रहात नाही आणि यात सादर होणारे भारुड तर सर्वांचे लक्ष वेधून घेतात. संबळ, मृदुंग, नाल, टाळ आणि पेटी असे भारुड सादर करणाऱ्या मंडळींचे वाद्य. गवळ, नंतर भारूड अशा लोककलेचे हे सादरीकरण मोठी दाद मिळविणारे ठरते. मात्र यंदा ना भजन झाले ना वाद्यांचा निनाद घुमला.

आत्मिक समाधान राहिले दूर

घरी वहन यावे अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा असते. त्यानुसार मंदिरात भेट देऊन विनंती केली जाते. त्यानंतर यजमानांकडे वहन जाते व कुटुंबियांसाठी ती दिवाळी असते. एक आत्मिक समाधान, ईश्वर सेवेचा आनंद यातून कुटुंबियांना मिळतो. मात्र हे सर्व यंदा दूरच राहिले.