जळगाव : दमदार पावसानंतर हतनूर धरणाची जलपातळी वाढली असून रावेर तालुक्यातील मंगरूळ धरण ओसंडून वाहू लागले आहे. यावल तालुक्यात ६६.१ मि.मी. पावसासह अतवृष्टी तर फैजपूरला ११६ मि.मी. पावसाचीे नोंद झाली आहे. भुसावळसह परिसरात रविवारी रात्रभरात २८.६ मिलीमीटर पाऊस झाला. हतनूर धरणात शनिवारी सकाळी १८.६३ टक्केतर सोमवारी सकाळी २४.0८ टक्केइतका जलसाठा होता. रावेर तालुक्यात दमदार पावसामुळे मंगरूळ प्रकल्प दुसर्याच पावसात ओव्हरफ्लो झाल्याने भोकर नदी वाहू लागली आहे. तिथे सोमवारी ३१.८५ मि.मी. पाऊस झाला. सातपुड्यात अतवृष्टीझाल्याने वड्री बंधारा पूर्ण भरला तर हरिपुरा धरणात ६0 टक्के साठा झाला. खडकाई, हडकाई नद्यांना पूर आला. बोदवडसह मुक्ताईनगर तालुक्यात मध्यरात्री रिपरिप सुरू होती. अमळनेर आणि चोपडा तालुक्यात पहाटे चांगला पाऊस झाला आहे. पाचोरा व भडगाव परिसरात मात्र मध्यम पाऊस झाला.धरणगाव शहर व तालुक्यातही शेतशिवार भिजवले. जामनेर येथे रविवारी रात्री झालेल्या रिमझिम पावसावरच शेतकर्यांनी पेरणी सुरू केली आहे. एरंडोल तालुक्यात सोमवारी पहाटे तासभर जलधारा बरसल्या.
---------
पर्जन्यमान (मि.मी.मध्ये) : |
जळगाव- ३७, भुसावळ- १९, यावल- ७३, रावेर- ३४.७, मुक्ताईनगर- १३.९, अमळनेर- १0.७, चोपडा- ५२, एरंडोल- १६, पारोळा- 00, चाळीसगाव- २, जामनेर- ८.६, पाचोरा- २.८, भडगाव- 00 धरणगाव- २८.६, बोदवड- १0. ■ १0 जुलैअखेरपर्यंत कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार जिल्हाभरात फक्त एक लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्हाभरातील सात लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी होईल, असे उद्दिष्ट आहे. ■ पेरणीमध्ये कापूस आघाडीवर आहे. कापसाची लागवड ही एक लाख ४३ हजार हेक्टरवर झाली आहे. मक्याची पाच हजार, मूग १३00, उडीद १८00, सोयाबीन ३२३, ज्वारी ३२३ तर तुरीची ८0 हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या दोन दिवसात पेरणीला वेग आला आहे. ■ भुसावळ, बोदवड, अमळनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव, जामनेर, भडगाव या तालुक्यांत सध्या तरी पेरणीसारखी स्थिती नाही. दीड लाख हेक्टरवर पेरणी |