शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

साहित्यिकाला कोणतीही जात, धर्म, पंथ नसतो - लेखिका दीपा देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 23:41 IST

नकारात्मकता दूर ठेऊन साहित्यिकांच्या लिखाणाकडे बघावे

जळगाव : उस्मानाबाद येथे झालेल्या ९३ व्या अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरुन वाद झाला. हा विरोध करणे चुकीचे आहे. मुळात साहित्यिक वा लेखकाला कुठलाही जात, धर्म वा पंथ नसतो. या जाती-धर्माच्या कारणावरुन भेदभाव करणे हे चुकीचे आहे. विरोध करणाऱ्यांनी या प्रकारची मानसिकता दूर ठेऊन, साहित्यिकांच्या लिखाणाकडे बघणे गरजेचे आहे. असे मत ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केले.जळगावात एका कार्यक्रमात आले असतांना ‘लोकमत’ प्रतिनिधीने दीपा देशमुख यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी केलेली ही बातचीत..प्रश्न : सोशल मीडियामुळे वाचन संस्कृतीवर परिणाम झाला आहे का ?उत्तर : नक्कीच, आज प्रत्येक जण मोबाईल असो की फेसबुकमध्ये इतका गुंतला आहे की त्यांना पुस्तके वाचायला आवडत नाहीत. बाजारात कुठल्या लेखकांची ,कुठली नवीन पुस्तके येत आहेत. याची बहुतांश लोकांना माहिती नसते. त्यामुळे हा सर्व परिणाम सोशल मीडियामुळे होत आहे. यासाठी आता शक्य झाले तर लेखकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले लिखाण इतरांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.प्रश्न : नवोदीत कवींना व्यासपीठ मिळण्यासाठी काय करायला हवे?उत्तर : नवोदिन कवींना आपल्या कथा, कविता सादर करण्यासाठी सामाजिक संस्थांनी विविध प्रकारची संमेलन आयोजित करायला हवीत. गेल्या वर्षी जळगावात पुलोत्सव झाला होता. तशा प्रकारची संमेलनही सतत होणे गरजेचे आहे. नवोदित कवींनीदेखील जिथे कुठे संमेलन असेल, तिथे स्वत:हून जायला हवे. कारण, समाजापर्यंत पोहचण्याचे हे सर्वांत मोठे माध्यम असते.प्रश्न : अच्युत गोडबोले यांच्या बरोबर आपण सहलेखिका म्हणून अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे, सध्या कुठल्या पुस्तकावर लेखन सुरु आहे?उत्तर : सध्या ‘जग बदलणारे ग्रंथ’ या पुस्तकाचे लेखन सुरु आहे. यामध्ये कार्ल मार्क्सचा ‘दास कॅपिटल’ या ग्रंथामध्ये काय लिहले आहे, भगवत गीतेमध्ये काय सांगितले आहे, बायबल मध्ये काय आहे. यासह ज्या प्रभावशाली ग्रंथांनी जग बदलले. अशा प्रभावशाली ग्रंथावर आधारीत ‘जग बदलणारे ग्रंथ’ या पुस्तकावर काम सुरु आहे.प्रश्न : ‘समलिंगी’ संबंधावरील पुस्तकाच्या लेखनातून आपण काय मांडण्याचा प्रयत्न करणार आहात ?उत्तर : माझे वैयक्तिक मत असे आहे की, मुळात समलिंगी संबंधाला विरोध करण्याचे कारणचं काय आहे. दोन समलिंग व्यक्ती एकमेकांना आवडले, ते एकमेकांसोबत आयुष्यभर रहायला तयार आहेत, मग त्या गोष्टींना विरोध कशासाठी करावा, वेगळ््या भूमिकेतून त्यांच्याकडे कशाला पहावे.मोदींबद्दल म्हणाल्या...महिला अधिकार संरक्षण (तीन तलाक) विधेयक २0१८ लोकसभेत गुरुवारी २४५ विरुद्ध ११ मतांनी मंजूर झाले. विधेयकावरील चर्चेसाठी गुरुवारी भाजपा व काँग्रेसने आपापल्या सदस्यांसाठी व्हीप जारी केले होते. असे असूनही तीन तलाक विधेयकावर आक्रमक भाषणे करणारे वेळी अनुपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव