शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अरेच्चा... पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत अडीच वर्षांतच भाजपची सत्ता खेचून शिवसेनेने महापालिकेवर भगवा फडकवला आहे. भाजपच्या २७ बंडखोर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेत अडीच वर्षांतच भाजपची सत्ता खेचून शिवसेनेने महापालिकेवर भगवा फडकवला आहे. भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर पहिल्यांदाच महापालिकेत जयश्री महाजन या शिवसेनेच्या महापौर झाल्या असून, भाजपला विरोधात असतानाही आता विरोधी पक्षनेतेपदही मिळणे कठीण झाले आहे. त्यात विद्यमान विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे असल्याने जळगाव महापालिकेतच नाही तर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिकेतील महापौरपद हे पत्नीकडे तर मनपा विरोधी पक्षनेतेपद हे पतीकडे असल्याचा योगायोग जळगाव महापालिकेत जुळून आला आहे. विशेष म्हणजे महापौर व विरोधी पक्षनेतेपद हे एकाच पक्षाकडे आहे.

जळगाव महापालिकेच्या २०१८मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ७५पैकी ५७ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. शिवसेनेला अवघ्या १५ जागा मिळाल्या होत्या. एमआयएमच्या तीन जागा असल्याने विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेला मिळाले. शिवसेनेचे सुनील महाजन हे गेल्या अडीच वर्षांपासून मनपा विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका पार पाडत आहेत. दरम्यान, महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीआधीच सत्ताधारी भाजपमधील तब्बल २७ नगरसेवक फुटल्याने भाजपची महापालिकेतील सत्ता गेली आहे. सद्यस्थितीत महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष भाजपच आहे तर २७ बंडखोर नगरसेवक हे सद्यस्थितीत भाजपचेच नगरसेवक म्हणून गणले जात आहेत. बंडखोर नगरसेवकांना अद्यापही स्वतंत्र गट स्थापन करता आलेला नाही. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडेच राहिले आहे.

महापौर चुकले तर त्यांचा विरोध घरातूनच होईल

महापालिकेच्या इतिहासात महापौरपद व विरोधी पक्षनेतेपद हे एकाच पक्षाकडे आहे. विशेष म्हणजे महापौर जयश्री महाजन यांनी जर शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष केले तर त्यांचा विरोध त्यांचे पती सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते म्हणून करतील, असा गंमतीशीर योगायोग महापालिकेत जुळून आला आहे.

कोट

महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष सद्यस्थितीत भाजप आहे तर विरोधी पक्ष म्हणून कमी नगरसेवक शिवसेनेकडे आहेत. भाजपच्या २७ नगरसेवकांनी शिवसेनेच्या महापौर उमेदवाराला पाठिंबा दिला तर उपमहापौरपद हे भाजपच्या नगरसेवकाला देण्यात आले आहे. दरम्यान, जे २७ नगरसेवक फुटले आहेत ते अजूनही भाजपचेच नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडेच राहील.

- नितीन लढ्ढा, नगरसेवक, शिवसेना

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला कोणत्याही पदाची गरज नाही. महापौर शिवसेनेचा असला तर आम्ही विरोधातच राहू, चुकीच्या कामांना महासभेत विरोध केला जाईल तर विरोधी पक्षनेतेपदाबाबत कायद्याचा अभ्यास करूनच निर्णय घेण्यात येईल.

- भगत बालानी, गटनेते, भाजप