शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

पांढऱ्या सोन्याच्या तेजी-मंदीमुळे चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:34 IST

कुणाला भाववाढीचा फायदा तर कुणाला कमी भावाचा फटका

आडगाव, ता.चाळीसगाव : निसर्गाच्या अवकृपेने गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पूर्ण पाणी फिरले असताना कापसाच्या भावातील चढ-उताराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.चाळीसगाव तालुक्यातील त्यातच मन्याड परिसरातील शेतकºयांचे खरीपातील मुख्य पीक म्हणजे पांढरे सोने म्हणजेच कपाशी या पिकावरच शेतकºयांचे वर्षभराचे गणित अवलंबून असते. कपाशी पिकाने साथ दिली तरच लग्न समारंभ, विविध संस्थाचे कर्ज, इतर देणे-घेणे तसेच रब्बी हंगामाचा खर्च, गुरांचा चारा इत्यादी आर्थिक गणित हे कपाशीच्या उत्पन्नावरूनच सोडविले जाते. परंतु गेल्या खरीपात पर्जन्यमान कमी झाल्याने कपाशीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. एकरी १२ ते १५ क्वींटल पर्यंत उत्पन्न निघणारे ते यावर्षी फक्त पाच क्विंटलपर्यंतच आले ते ही ज्यांच्याकडे थोडेफार पाणी होते त्यांनाच हे शक्य झाले. कोरडवाहू शेतकºयांना तर काहीच हाती आले नाही.यावर्षी उत्पन्न कमी त्यामुळे कपाशी सुरूवातीपासून सहा हजाराच्या पुढे विकली जाईल असा अंदाच बांधून २५ टक्के शेतकºयांनी सुरुवातीलाच म्हणजे नोव्हेबर-डिसेंबरच्या कालावधीत ६००० ते ६ हजार १०० प्रती क्विंटल भावात कापूस विकला. ७५ टक्के शेतकºयांनी यंदा दुष्काळ आहे म्हणून कपाशीचे सर्वत्र उत्पन्न कमी आहे त्यामुळे आणखी भाव वाढतील या आशेवर कापूस साठवून ठेवला. मात्र नंतर हळूहळू भाव कमी होत गेले. ६००० ते ६१०० वरून थेट ५१०० ते ५२०० रूपयापर्यंत म्हणजे एक हजार प्रती क्विंटलने भाव खाली आले.जानेवारी महिन्यातील संक्रात सणानंतर भाव वाढतात हा दरवर्षाचा अनुभव लक्षात घेता १५ जानेवारीपासून ते १५ फेब्रुवारीपर्यंत भाव ५४०० पर्यंत स्थिर राहिले. फेब्रुवारी संपायला आला तरी भाव वाढण्याचे काहीही संकेत दिसत नव्हते. पुढे लोकसभेची निवडणूक येत आहे. आता काही भाव वाढणार नाही म्हणून जवळ-जवळ ५० टक्के शेतकºयांनी ५४०० च्या भावाने कापूस विकून टाकला.यात राहिले ते २५ टक्के मोठे बागायतदार शेतकरी. या शेतकºयांनी भविष्यकाळात कापसाचे बाजार भाव वाढतील या आशेवर कापूस साठवून ठेवल्यानंतर मार्च महिन्याच्या १८-१९ तारखेनंतर कापूस ५७०० ते ५८०० रुपये प्रती क्विंटल भाव झाले. १९ मार्च रोजी काही ठिकाणी खाजगी व्यापाºयांनी ६००० ते ६१०० रूपये पर्यंतने खरेदी केला. म्हणजेच ५० टक्के शेतकºयांना भाव कमीचा फटका बसला तर ५० टक्के शेतकºयांना भाववाढीचा फायदा झाला.यंदा उत्पन्नात मोठी घटदरवर्षा प्रमाणेच यावर्षीदेखील कपाशी पिकावर शेतकºयांनी हजारो रुपये खर्च केले होते. गेल्या खरीप हंगामात बोंड अळीच्या प्रार्दुभावाने कपाशीचे मोठे नुकसान झाले होते. परत बोंडअळी पडू नये म्हणून यावर्षी शेतकºयांनी सुरूवातीपासूनच दक्षता घेतली. परंतु यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने शेतकºयांच्या उत्पन्नात जवळ-जवळ मोठी घट झाली. उलट बोंडअळीच्या काळात शेतकºयांना चांगले उत्पन्न हाती आले होत, असेही काही कापूस उत्पादक सांगत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव