शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्याच्या तेजी-मंदीमुळे चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:34 IST

कुणाला भाववाढीचा फायदा तर कुणाला कमी भावाचा फटका

आडगाव, ता.चाळीसगाव : निसर्गाच्या अवकृपेने गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पूर्ण पाणी फिरले असताना कापसाच्या भावातील चढ-उताराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.चाळीसगाव तालुक्यातील त्यातच मन्याड परिसरातील शेतकºयांचे खरीपातील मुख्य पीक म्हणजे पांढरे सोने म्हणजेच कपाशी या पिकावरच शेतकºयांचे वर्षभराचे गणित अवलंबून असते. कपाशी पिकाने साथ दिली तरच लग्न समारंभ, विविध संस्थाचे कर्ज, इतर देणे-घेणे तसेच रब्बी हंगामाचा खर्च, गुरांचा चारा इत्यादी आर्थिक गणित हे कपाशीच्या उत्पन्नावरूनच सोडविले जाते. परंतु गेल्या खरीपात पर्जन्यमान कमी झाल्याने कपाशीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. एकरी १२ ते १५ क्वींटल पर्यंत उत्पन्न निघणारे ते यावर्षी फक्त पाच क्विंटलपर्यंतच आले ते ही ज्यांच्याकडे थोडेफार पाणी होते त्यांनाच हे शक्य झाले. कोरडवाहू शेतकºयांना तर काहीच हाती आले नाही.यावर्षी उत्पन्न कमी त्यामुळे कपाशी सुरूवातीपासून सहा हजाराच्या पुढे विकली जाईल असा अंदाच बांधून २५ टक्के शेतकºयांनी सुरुवातीलाच म्हणजे नोव्हेबर-डिसेंबरच्या कालावधीत ६००० ते ६ हजार १०० प्रती क्विंटल भावात कापूस विकला. ७५ टक्के शेतकºयांनी यंदा दुष्काळ आहे म्हणून कपाशीचे सर्वत्र उत्पन्न कमी आहे त्यामुळे आणखी भाव वाढतील या आशेवर कापूस साठवून ठेवला. मात्र नंतर हळूहळू भाव कमी होत गेले. ६००० ते ६१०० वरून थेट ५१०० ते ५२०० रूपयापर्यंत म्हणजे एक हजार प्रती क्विंटलने भाव खाली आले.जानेवारी महिन्यातील संक्रात सणानंतर भाव वाढतात हा दरवर्षाचा अनुभव लक्षात घेता १५ जानेवारीपासून ते १५ फेब्रुवारीपर्यंत भाव ५४०० पर्यंत स्थिर राहिले. फेब्रुवारी संपायला आला तरी भाव वाढण्याचे काहीही संकेत दिसत नव्हते. पुढे लोकसभेची निवडणूक येत आहे. आता काही भाव वाढणार नाही म्हणून जवळ-जवळ ५० टक्के शेतकºयांनी ५४०० च्या भावाने कापूस विकून टाकला.यात राहिले ते २५ टक्के मोठे बागायतदार शेतकरी. या शेतकºयांनी भविष्यकाळात कापसाचे बाजार भाव वाढतील या आशेवर कापूस साठवून ठेवल्यानंतर मार्च महिन्याच्या १८-१९ तारखेनंतर कापूस ५७०० ते ५८०० रुपये प्रती क्विंटल भाव झाले. १९ मार्च रोजी काही ठिकाणी खाजगी व्यापाºयांनी ६००० ते ६१०० रूपये पर्यंतने खरेदी केला. म्हणजेच ५० टक्के शेतकºयांना भाव कमीचा फटका बसला तर ५० टक्के शेतकºयांना भाववाढीचा फायदा झाला.यंदा उत्पन्नात मोठी घटदरवर्षा प्रमाणेच यावर्षीदेखील कपाशी पिकावर शेतकºयांनी हजारो रुपये खर्च केले होते. गेल्या खरीप हंगामात बोंड अळीच्या प्रार्दुभावाने कपाशीचे मोठे नुकसान झाले होते. परत बोंडअळी पडू नये म्हणून यावर्षी शेतकºयांनी सुरूवातीपासूनच दक्षता घेतली. परंतु यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने शेतकºयांच्या उत्पन्नात जवळ-जवळ मोठी घट झाली. उलट बोंडअळीच्या काळात शेतकºयांना चांगले उत्पन्न हाती आले होत, असेही काही कापूस उत्पादक सांगत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव