शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय जागतिक इतिहास अपूर्ण - सुमंत टेकाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 11:39 IST

जळगावात ‘शिवरायांची चाणक्य निती’वर व्याख्यान

ठळक मुद्देअशोक जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशनचाणक्य कृतीशील विचारवंत

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ४ - आदीलशाही, सुलतानी तसेच अफगाणांचे भारतावर अनेक आक्रमणे झाली. यामुळे उत्तर भारताने ६५० वर्षे तर महाराष्ट्राने ३०० वर्षे गुलामगिरी, छळ सहन केले. अशा बिकट परिस्थितीत फाल्गुन वैद्य तृतीयेला शिवराय जन्माला आले आणि या राजाने वयाच्या १४व्या वर्षीच स्वराज्य हे एकच ध्येय उराशी बाळगले आणि देशातील स्थिती बदलून टाकली. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय जागतिक इतिहास हा पूर्ण होऊच शकत नाही, असे मत व्याख्याते सुमंत टेकाडे यांनी व्यक्त केले.शनिवारी रोटरी क्लब आॅफ जळगावतर्फे ‘शिवरायांची चाणक्यनिती’ याविषयावर कांताई सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, रोटरीचे माजी अध्यक्ष अशोक जोशी, रोटरी जळगावचे अध्यक्ष डॉ. तुषार फिरके, सचिव कॅप्टन मोहन कुलकर्णी, उन्मेश प्रकाशनच्या मेधा राजहंस उपस्थित होते.मराठीत श्लोकबद्ध केलेल्या ‘चाणक्यनितीचे प्रकाशनकुमूदाग्रज अशोक जोशी यांनी मराठीत श्लोकबद्ध केलेल्या ‘चाणक्यनिती’ या ग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. डॉ. स्मिता पाटील यांनी गणेशवंदना सादर केली. प्रास्ताविक तुषार फिरके यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज, आर्य चाणक्य राष्ट्राची दोन दैवतछत्रपती शिवाजी महाराज आणि आर्य चाणक्य हे आपल्या राष्ट्राची दोन दैवते असून छत्रपतींनी सामान्यांच्या जनकल्याणासाठी शिवमुद्रा तर आर्य चाणक्य यांनी जीवनाच्या भाष्याविषयी नीती अर्थात तत्वज्ञान सांगितले असेही सुमंत टेकाडे यांनी सांगितले. शस्त्र व शास्त्र यांचा अभ्यास करुन महाराजांनी गडकिल्ले जिंकले. ते करताना त्यांची युद्ध नीती चाणक्य नितीशी साम्य असणारी आहे. शिवाजी महाराज हा राजकारणाचा विषय नसून त्या काळातील परिस्थिती व त्यांचा पराक्रम पाहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.चाणक्य कृतीशील विचारवंत - अशोक जैनअध्यक्षीय भाषणात अशोक जैन यांनी अर्थशास्त्रापासून राजकीय क्षेत्रातील घडामोडींच्या वेळेस आर्य चाणक्यांचा उल्लेख होतो. ते कृतीशील विचारवंत होते. त्यांच्या चिंतनातून आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडते. तेजस्वी वाणी असलेल्या अशोक जोशी यांनी संस्कृतमधून मराठीत ग्रंथ श्लोकबद्ध केला. त्यांच्या कुमुदाग्रज या टोपण नावामुळे तात्यासाहेब शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांची आठवण येते असेही अशोक जैन म्हणाले.दत्तात्रय कराळे, अशोक जोशी व मेधा राजहंस यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गिरीष कुलकर्णी यांनी केले तर नितीन विसपूते यांनी आभार मानले. 

टॅग्स :JalgaonजळगावShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज