शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

निवडणुका उंबरठ्यावर असल्याने कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 01:07 IST

चाळीसगाव येथे राष्टÑवादीची बैठक : जयंत पाटील यांचे आवाहन

चाळीसगाव, जि.जळगाव : लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर असल्याने मरगळ झटकून कामाला लागा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारचे अपयश जनतेपर्यंत पोहचवून बुथ लेव्हल पर्यंत संघटन मजबुत करा. असा सल्लाही यावेळी दिला. शनिवारी सायंकाळी सात वाजता जयंत पाटील यांनी चाळीसगाव येथील दौ-यात माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत संवाद साधला.यावेळी त्यांनी केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय, एनपीए यावर सविस्तर भाष्य नोंदविले. चाळीसगाव विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकीत राजीव देशमुख यांच्या विजयासाठी संकल्प करा, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीला माजी खासदार वसंतराव मोरे, आमदार सतीश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, गुलाबराव पाटील, अरुण पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महिला अध्यक्ष कल्पना पाटील, प्रदीप देशमुख, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जि.प. सदस्य भूषण पाटील, अतुल देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, दिलीप रामराव चौधरी, आर.के. माळी, भोजराज पुन्शी, रामचंद्र जाधव, मंगेश पाटील, अजय पाटील, सोनाली साळुंखे, अ‍ॅड. प्रदीप आगोणे, प्रकाश सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोदींच्या कार्यपद्धतीवर सडकून टिकापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जयंत पाटील यांनी सडकून टिका केली. केंद्र सरकारचे निर्णय फसवे असून नोटबंदीमुळे देशात आर्थिक आरिष्टासह शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे पाटील यांनी सांगितले. असंघटीत कामगारांचा रोजगार गेल्याने उपासमारीचे 'बुरे दिन' त्यांच्या वाट्याला आले आहेत. राफेल विमान खरेदी संशयास्पद असून करार रद्द करुन सरकारनेच हे गूढ आणखी वाढविल्याची टिकाही त्यांनी केली. राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा देखील त्यांनी कार्यकर्त्यांसमोर वाचला.

टॅग्स :PoliticsराजकारणChalisgaonचाळीसगाव