शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणीअभावी घनकचरा प्रकल्पाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

जळगाव : घनकचरा प्रकल्पासाठी ठेका देण्यात आलेल्या पूर्वीच्या कंपनीकडे महावितरणची थकबाकी असल्याने आता नवीन महापालिकेला नवीन वीज जोडणी मिळत ...

जळगाव : घनकचरा प्रकल्पासाठी ठेका देण्यात आलेल्या पूर्वीच्या कंपनीकडे महावितरणची थकबाकी असल्याने आता नवीन महापालिकेला नवीन वीज जोडणी मिळत नाही. यामुळे घनकचरा प्रकल्पाचे काम रखडले आहे, असा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला. त्यावर थकबाकी असल्याने वीजजोडणी देता नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र पाच लाख जनतेशी संबंधित हा प्रश्न असल्याने उद्याच वीज जोडणी द्या, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महावितरणच्या विविध तक्रारी करण्यात आल्या. यामध्ये जळगाव महापालिकेच्या घनकचऱ्याचाही प्रश्न उपस्थित झाला. यात आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, मनपाने या पूर्वी ज्या कंपनीला घनकचऱ्याचा ठेका दिला होता, त्या कंपनीकडे वीजबिलाची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरण आता मनपाला नवीन वीज जोडणी देत नसल्याचे सांगितले. त्यावर महावितरणचे अधीक्षक अभियंता फारुक शेख यांनी थकबाकी असलेल्यांना नवीन वीज जोडणी देता येत नाही. मात्र ही थकबाकी कंपनीकडे होते, मनपाकडे नाही, असे आमदार भोळे यांनी सांगितले. यावर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनीही मनपाचे म्हणणे मांडले. तरीही महावितरणचे अधिकारी नवीन वीज जोडणी न देण्यावर ठाम होते. अखेर पालकमंत्र्यांनी उद्याच नवीन वीज जोडणी द्या, अशा सूचना दिल्या.

मनपाकडे असलेल्या थकबाकीवर कोणी बोलत नाही

आमदार सुरेश भोळे यांनी घनकचरा प्रकल्पासह शहरातील विविध भागातील वीजपुरवठ्याच्या समस्येविषयी मुद्दा मांडला. त्यावर अधीक्षक अभियंता फारुक शेख यांनी महापालिकेकडे सात ते आठ कोटींची थकबाकी आहे, त्याविषयी कोणी बोलत नाही, असे थेट वक्तव्य केले. त्यावर मात्र कोणी काहीच बोलले नाही.

खड्डे बुजवायला पैसे नाही, महामार्ग काय करणार? पालकमंत्री

शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामाविषयी अनेक तक्रारीदेखील मांडण्यात आल्या. खोटेनगर ते कालिंकामाता मंदिर दरम्यान अनेक अडचणी असून ठिकठिकाणच्या कामांचा समावेश करून नवीन डीपीआर सादर करा, अशा सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी नहीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या सोबतच शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामात अनेक अडचणी असल्याने हे रस्ते मनपाकडे द्या, असा मुद्दा समोर आला. मात्र मनपाकडे पैसे नसल्याने त्यांच्याकडून ही कामे होणार नाही, यासाठी हा रस्ता सा.बां. विभागाकडे वर्ग करा, असे पालकमंत्री पाटील म्हणाले. मनपा शहरातील खड्डे बुजवू शकत नाही, महामार्गाचे काम काय करेल, असा चिमटाही पालकमंत्र्यांनी काढला.

१५ दिवसात गाळ्यांचा प्रश्न मार्गी

शहरातील व्यापाऱ्यांचा प्रश्न बिकट असून मनपाच्या गाळ्यांवरही टांगती तलवार आहे. त्यामुळे या विषयी तोडगा काढावा, अशी मागणी नगरसेवक नितीन बरडे यांनी केली. त्यावर आपली चर्चा झाली असून १५ दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा पालकमंत्री पाटील यांनी केला.