शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे विद्युत खांब काढण्याचे काम थंडबस्त्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या पुलालगत असलेले विद्युत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या पुलालगत असलेले विद्युत खांब काढण्याबाबतचा विषय अनेक महिन्यांपासून प्रलंबित राहत असल्याने या पुलाच्या कामावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. विद्युत खांब काढण्यासाठी महापालिकेने दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी अजूनही हे विद्युत खांब काढण्या बाबतचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. विद्युत खांब काढण्याचे काम जोपर्यंत लांबत जाईल तोपर्यंत पुलाचे काम देखील लांबणार आहे.

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम फेब्रुवारी २०१९ पासून सुरू आहे. मात्र मुदत संपल्यानंतर देखील हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या कामासाठी या पुलालगत असलेले महावितरणचे विद्युत खांब काढणे आवश्यक आहे. मात्र अनेक महिन्यांपासून निधी नसल्याने हे खांब करण्यात न आल्याने हे काम रखडत जात आहे. महापालिका प्रशासनाला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या २५ कोटींचा निधी मधून शिल्लक असलेल्या तीन कोटींच्या निधीपैकी दीड कोटींच्या निधीतून हे काम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. याबाबत महापालिकेने ठराव देखील झाला आहे. मात्र अद्यापही या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याने हे काम रखडत जात आहे. या कामाला लागणारा निधीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार सुरेश भोळे व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा देखील समावेश आहे. या समितीने देखील या कामासाठी मंजुरी दिली असली तरी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची स्वाक्षरी झाली नसल्याने हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनपातील सत्तांतरासाठी विद्युत खांबांचे स्थलांतराचे कामही ठरले कारणीभुत

महापालिकेतील सत्तांतरामध्ये विद्युत खांब काढण्याचे काम देखील एक कारण असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. विद्युत खांब काढण्याचे काम हे महावितरणकडून करण्यात यावे यासाठी आमदार सुरेश भोळे आग्रही होते. तर हे काम मनपा कडूनच करण्यात यावे यासाठी भाजपचे ते नवग्रह मंडळातील नगरसेवक आग्रही होते. याच कारणावरून आमदार भोळे व काही नगरसेवकांमध्ये वाद झाला होता. आता महापालिकेत सत्तांतर झाल्याने हे काम महापालिकेकडून होते की महावितरणकडून याकडे देखील लक्ष लागले आहे. मात्र अनेक वर्षांपासून जळगावकर या पुलाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या पुलाचे काम लवकरात लवकर करण्यासाठी विद्युत खांबांचे स्थलांतर आवश्यक आहे. यामुळे हे काम महावितरण करो की महापालिका ? आधी हे काम होणे महत्त्वाचे असल्याचे सर्वसामान्य जळगावकरांना वाटते.