शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे विद्युत खांब काढण्याचे काम थंडबस्त्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या पुलालगत असलेले विद्युत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या पुलालगत असलेले विद्युत खांब काढण्याबाबतचा विषय अनेक महिन्यांपासून प्रलंबित राहत असल्याने या पुलाच्या कामावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. विद्युत खांब काढण्यासाठी महापालिकेने दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी अजूनही हे विद्युत खांब काढण्या बाबतचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. विद्युत खांब काढण्याचे काम जोपर्यंत लांबत जाईल तोपर्यंत पुलाचे काम देखील लांबणार आहे.

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम फेब्रुवारी २०१९ पासून सुरू आहे. मात्र मुदत संपल्यानंतर देखील हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या कामासाठी या पुलालगत असलेले महावितरणचे विद्युत खांब काढणे आवश्यक आहे. मात्र अनेक महिन्यांपासून निधी नसल्याने हे खांब करण्यात न आल्याने हे काम रखडत जात आहे. महापालिका प्रशासनाला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या २५ कोटींचा निधी मधून शिल्लक असलेल्या तीन कोटींच्या निधीपैकी दीड कोटींच्या निधीतून हे काम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. याबाबत महापालिकेने ठराव देखील झाला आहे. मात्र अद्यापही या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याने हे काम रखडत जात आहे. या कामाला लागणारा निधीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार सुरेश भोळे व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा देखील समावेश आहे. या समितीने देखील या कामासाठी मंजुरी दिली असली तरी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची स्वाक्षरी झाली नसल्याने हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनपातील सत्तांतरासाठी विद्युत खांबांचे स्थलांतराचे कामही ठरले कारणीभुत

महापालिकेतील सत्तांतरामध्ये विद्युत खांब काढण्याचे काम देखील एक कारण असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. विद्युत खांब काढण्याचे काम हे महावितरणकडून करण्यात यावे यासाठी आमदार सुरेश भोळे आग्रही होते. तर हे काम मनपा कडूनच करण्यात यावे यासाठी भाजपचे ते नवग्रह मंडळातील नगरसेवक आग्रही होते. याच कारणावरून आमदार भोळे व काही नगरसेवकांमध्ये वाद झाला होता. आता महापालिकेत सत्तांतर झाल्याने हे काम महापालिकेकडून होते की महावितरणकडून याकडे देखील लक्ष लागले आहे. मात्र अनेक वर्षांपासून जळगावकर या पुलाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या पुलाचे काम लवकरात लवकर करण्यासाठी विद्युत खांबांचे स्थलांतर आवश्यक आहे. यामुळे हे काम महावितरण करो की महापालिका ? आधी हे काम होणे महत्त्वाचे असल्याचे सर्वसामान्य जळगावकरांना वाटते.