भुसावळ: कोरोनासंदर्भात आरोग्यसेवकांचे काम सुरूच ठेवावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे निवेदनाद्वारे केली आहे. शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना हे निवेदन दिले.
या निवेदनात नमूद केले आहे की, अनेक कोरोना उपचार केंद्रे बंद केल्याने तसेच तेथील आरोग्यसेवकांना कमी केले असून कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांमध्ये तत्य ठेवणे गरजेचे आहे. ज्या भुसावळात कोरोना वाढीचा वेग कमी झाला. तेथे आता पुन्हा रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणचे रुग्ण सापडणे थांबणे म्हणजे कोरोना संपला असे म्हणणे उचित ठरणार नाही, म्हणून विविध केंद्रही सुरू ठेवावे अशी मागणी केली आहे.
निवेदन देताना शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, माजी नगरसेवक दीपक धांडे, शहर संघटक योगेश बागूल, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, उपशहर प्रमुख सोनी ठाकूर, स्वप्नील सावळे उपशहर संघटक अब्दुल नबी पटेल, युवा सेना शहरप्रमुख सूरज पाटील, गोकुळ बाविस्कर, मोहसीन तडवी व पदाधिकारी तसेच डॉ.प्राजक्ता नेवे, शशिकांत अहिरे, माधुरी सुरवाडे, विक्की मेश्राम, लीना पाथरवट, शिरीन तडवी, जयश्री सपकाळे, नजराणा तडवी हे कोरोना योद्धे उपस्थित होते.
आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
रावेर, यावल, बोदवड मुक्ताईनगरच्या रुग्णांवर भुसावळात उपचार झाले आणि आता तेथील रुग्णसंख्या भुसावळपेक्षा कमी असूनही भुसावळची केंद्रे बंद करण्यात आली. अचानक रुग्ण वाढल्यानंतर आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार आहे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन पाठवले असून शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे असे प्रा.धीरज पाटील यांनी कळविले आहे.
प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी.