शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पर्यावरण क्षेत्रात महिलांचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:16 IST

-शिल्पा गाडगीळ

प्राचीन ग्रंथ आणि भारतीय संविधान यांचा पर्यावरण संरक्षण दृष्टीकोन विसरून आपण स्वाथार्साठी निसर्ग ओरबाडत आहोत. संपूर्ण विश्वात जीवसृष्टी असणारा एकुलता एक ग्रह म्हणजे पृथ्वी हा होय. या पृथ्वीला वाचविण्यासाठी जगभरातील सुजाण नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.यांत अभिमानाची गोष्ट म्हणजे पर्यावरण रक्षण व संवर्धनात भारतीय महिला अग्रेसर आहेत. याचे आदर्श उदाहरण म्हणजे सन १७३० चे चिपको आंदोलन होय. जोधपुरच्या महाराजांचा महाल बांधण्यासाठी जंगलातील झाडे तोडण्यास आलेल्या सैन्यास खिजडी गावातील अमृतादेवी या महिलेने कडाडून विरोध करतांना तिला व सोबतच्या ६३ लोकांना जीव गमवावा लागला.यातूनच चिपको आंदोलनाची मुहूर्त मेढ रचली गेली.१९७४ मध्ये शासनाने चामोली जिल्ह्यात जंगलतोडीला सुरवात केली होती तेंव्हा तेथील रैणी गावातील गौरादेवी या महिलेनी ‘जंगल म्हणजे आमचे माहेर, ते तोडू देणार नाही’ असे ठणकावून सांगत अन्य महिलांना सोबत घेऊन चिपको आंदोलन केले आणि वृक्षतोड थांबवली. १९७७ मध्ये अडवाणी गावातील बचनीदेवी या महिलेने याच आंदोलनाचा पवित्रा घेत वृक्षतोड थांबवली. चिपको आंदोलनाचे हे लोण सर्व भारतभर पसरले. दक्षिण भारतातही जंगलतोडीस विरोध करण्यासाठी १९८३ मध्ये कर्नाटकातील उत्तर कन्नड भागात असेच ‘अप्पिको आंदोलन’ करण्यात आले. अशा कितीतरी महिला आहेत ज्या वेगवेगळ्या पातळीवर पर्यावरण रक्षणाचे काम करीत आहेत जसे उदयपुर जवळील रेताड प्रदेशाला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी झटणारी ‘सेवामंडल’ ही महिलांची संस्था, सायलेंट व्हॅली बचाव आंदोलनातील महिला, सरदार धरण विस्थापितांसाठी लढणाऱ्या मेधा पाटकर,चीनमधील मेई नेग, केनियातील वानगेरी मथाई, रशियाची मारिया शाराकोवा, अमेरिकेची रचेल कार्झान यांचे काम मोठे आहे-शिल्पा गाडगीळ, पक्षिमित्र , जळगाव