शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

पर्यावरण क्षेत्रात महिलांचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:16 IST

-शिल्पा गाडगीळ

प्राचीन ग्रंथ आणि भारतीय संविधान यांचा पर्यावरण संरक्षण दृष्टीकोन विसरून आपण स्वाथार्साठी निसर्ग ओरबाडत आहोत. संपूर्ण विश्वात जीवसृष्टी असणारा एकुलता एक ग्रह म्हणजे पृथ्वी हा होय. या पृथ्वीला वाचविण्यासाठी जगभरातील सुजाण नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.यांत अभिमानाची गोष्ट म्हणजे पर्यावरण रक्षण व संवर्धनात भारतीय महिला अग्रेसर आहेत. याचे आदर्श उदाहरण म्हणजे सन १७३० चे चिपको आंदोलन होय. जोधपुरच्या महाराजांचा महाल बांधण्यासाठी जंगलातील झाडे तोडण्यास आलेल्या सैन्यास खिजडी गावातील अमृतादेवी या महिलेने कडाडून विरोध करतांना तिला व सोबतच्या ६३ लोकांना जीव गमवावा लागला.यातूनच चिपको आंदोलनाची मुहूर्त मेढ रचली गेली.१९७४ मध्ये शासनाने चामोली जिल्ह्यात जंगलतोडीला सुरवात केली होती तेंव्हा तेथील रैणी गावातील गौरादेवी या महिलेनी ‘जंगल म्हणजे आमचे माहेर, ते तोडू देणार नाही’ असे ठणकावून सांगत अन्य महिलांना सोबत घेऊन चिपको आंदोलन केले आणि वृक्षतोड थांबवली. १९७७ मध्ये अडवाणी गावातील बचनीदेवी या महिलेने याच आंदोलनाचा पवित्रा घेत वृक्षतोड थांबवली. चिपको आंदोलनाचे हे लोण सर्व भारतभर पसरले. दक्षिण भारतातही जंगलतोडीस विरोध करण्यासाठी १९८३ मध्ये कर्नाटकातील उत्तर कन्नड भागात असेच ‘अप्पिको आंदोलन’ करण्यात आले. अशा कितीतरी महिला आहेत ज्या वेगवेगळ्या पातळीवर पर्यावरण रक्षणाचे काम करीत आहेत जसे उदयपुर जवळील रेताड प्रदेशाला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी झटणारी ‘सेवामंडल’ ही महिलांची संस्था, सायलेंट व्हॅली बचाव आंदोलनातील महिला, सरदार धरण विस्थापितांसाठी लढणाऱ्या मेधा पाटकर,चीनमधील मेई नेग, केनियातील वानगेरी मथाई, रशियाची मारिया शाराकोवा, अमेरिकेची रचेल कार्झान यांचे काम मोठे आहे-शिल्पा गाडगीळ, पक्षिमित्र , जळगाव