शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पर्यावरण क्षेत्रात महिलांचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:16 IST

-शिल्पा गाडगीळ

प्राचीन ग्रंथ आणि भारतीय संविधान यांचा पर्यावरण संरक्षण दृष्टीकोन विसरून आपण स्वाथार्साठी निसर्ग ओरबाडत आहोत. संपूर्ण विश्वात जीवसृष्टी असणारा एकुलता एक ग्रह म्हणजे पृथ्वी हा होय. या पृथ्वीला वाचविण्यासाठी जगभरातील सुजाण नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.यांत अभिमानाची गोष्ट म्हणजे पर्यावरण रक्षण व संवर्धनात भारतीय महिला अग्रेसर आहेत. याचे आदर्श उदाहरण म्हणजे सन १७३० चे चिपको आंदोलन होय. जोधपुरच्या महाराजांचा महाल बांधण्यासाठी जंगलातील झाडे तोडण्यास आलेल्या सैन्यास खिजडी गावातील अमृतादेवी या महिलेने कडाडून विरोध करतांना तिला व सोबतच्या ६३ लोकांना जीव गमवावा लागला.यातूनच चिपको आंदोलनाची मुहूर्त मेढ रचली गेली.१९७४ मध्ये शासनाने चामोली जिल्ह्यात जंगलतोडीला सुरवात केली होती तेंव्हा तेथील रैणी गावातील गौरादेवी या महिलेनी ‘जंगल म्हणजे आमचे माहेर, ते तोडू देणार नाही’ असे ठणकावून सांगत अन्य महिलांना सोबत घेऊन चिपको आंदोलन केले आणि वृक्षतोड थांबवली. १९७७ मध्ये अडवाणी गावातील बचनीदेवी या महिलेने याच आंदोलनाचा पवित्रा घेत वृक्षतोड थांबवली. चिपको आंदोलनाचे हे लोण सर्व भारतभर पसरले. दक्षिण भारतातही जंगलतोडीस विरोध करण्यासाठी १९८३ मध्ये कर्नाटकातील उत्तर कन्नड भागात असेच ‘अप्पिको आंदोलन’ करण्यात आले. अशा कितीतरी महिला आहेत ज्या वेगवेगळ्या पातळीवर पर्यावरण रक्षणाचे काम करीत आहेत जसे उदयपुर जवळील रेताड प्रदेशाला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी झटणारी ‘सेवामंडल’ ही महिलांची संस्था, सायलेंट व्हॅली बचाव आंदोलनातील महिला, सरदार धरण विस्थापितांसाठी लढणाऱ्या मेधा पाटकर,चीनमधील मेई नेग, केनियातील वानगेरी मथाई, रशियाची मारिया शाराकोवा, अमेरिकेची रचेल कार्झान यांचे काम मोठे आहे-शिल्पा गाडगीळ, पक्षिमित्र , जळगाव