शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

तक्रारीसाठी महिलांनी पुढे यावे

By admin | Updated: May 21, 2014 01:20 IST

राज्य आयोग तत्पर : अध्यक्षा डॉ.सुशीबेन शाह

धुळे : महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी राज्य महिला आयोगाने कंबर कसली आहे. त्यासाठी महिलांना सक्षम करणे, त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांचे म्हणणे ऐकणे, तेथील व्यवस्थेची माहिती घेणे, समुपदेशन केंद्रे सक्षम करणे, तसेच आयोग व त्याच्या कार्यपद्धतीविषयी विविध स्तरातील महिलांना माहिती देणे अशी कार्यपद्धती अवलंबल्याचे मत आयोगाच्या अध्यक्षा अ‍ॅड.सुशीबेन शाह यांनी आज एकदिवसीय जिल्हा दौर्‍यात व्यक्त केले. प्रश्न- महिलांना न्याय देण्याविषयी आपले काय धोरण, भूमिका राहील? उत्तर- महिलांवर अन्याय, अत्याचार होऊ नये. झाला असेल तर त्यांना त्वरेने न्याय मिळावा, त्यासाठी प्रयत्न करणे, जिल्हा परिषद व पोलीस दलामार्फत चालविण्यात येणार्‍या समुपदेशन केंद्रांना (कौन्सिलिंग सेंटर) सक्षम करणे, प्रत्येक विभागीय मुख्यालयी जाऊन तेथील प्रकरणांवर सुनावणी घेऊन आदेश देणे व त्यांची अंमलबजावणी होते का, याची खात्री करणे अशी कार्यपद्धती स्वीकारून महिलांना न्याय देण्याची, त्यांना सक्षम करण्याची आयोगाची भूमिका आहे. परंतु आता महिलांनी सक्षम होऊन पुढे येण्याची गरज आहे. प्रश्न- महिलांना न्याय देण्यासाठी सध्याचे (प्रचलित) कायदे पुरेसे आहेत का? उत्तर- होय निश्चितपणे. परंतु त्यांची अंमलबजावणी चुकीची होते. महिलांमध्येही न्याय-अन्यायाबाबत जाणीव असणे, त्यासाठी कायद्यांची माहिती, त्यात होणारे बदल याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी आयोग बुकलेट प्रसिद्ध करणार असून त्यात महिलांविषयक विविध कायदे, प्रश्न, विविध धोके, आयोग व समुपदेशन केंद्रांशी कसा संपर्क साधावा, त्यांचे नाव, पत्ते, दूरध्वनी क्रमांक आदी माहिती त्यात राहील. प्रश- राज्य सरकार याप्रश्नी किती संवेदनशील आहे? उत्तर- सरकार संवेदनशील नाही, असे नाही. परंतु अजून बरेच संवेदनशील होऊ शकते. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे अशा प्रकरणांबाबत संवेदनशील असतात. परंतु त्यांच्या हाताखालील कनिष्ठ कर्मचारी यांनी संवेदनशील होणे गरजेचे आहे. अन्याय, अत्याचार पीडित महिला जेव्हा पोलीस ठाण्यात पोहचते तेव्हा तेथील कर्मचार्‍यांनी सर्वप्रथम गुन्हा दाखल करून घेणे महत्त्वाचे आहे. ते लगेच समुपदेशन सुरू करतात, ते गैरलागू आहे. प्रश्न- महिलांवर अन्याय, अत्याचारच होऊ नये, या दृष्टीने महिला व समाज यांची काय भूमिका असावी? उत्तर- यासंदर्भात महिला व समाज या दोन्हींची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. अगदी घरापासून सुरुवात करावी लागेल. मुलामुलींना वाढविताना बालपणापासूनच भेद केला जातो. तो बदलावा लागेल. दोघांना सारख्याच पद्धतीने वाढविण्याची मानसिकता पालकांमध्ये तयार झाली पाहिजे. प्रश्न- महिला आयोगाची प्रामुख्याने रचना कशी आहे? उत्तर- आयोगाची अध्यक्षा व सदस्या मिळून आठ जणींची कार्यकारिणी आहे. प्रत्येक सदस्य एकेका विभागाची प्रभारी आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्टÑ, पश्चिम महाराष्टÑ, कोकण, मुंबई असे हे विविध विभाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.