शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

महिलांना समाजात मान सन्मान मिळाला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:06 IST

महिलांना समाजामध्ये मानसन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. प्रत्येक महिलेने आपल्या हक्कांविषयी जागरूक राहणे गरजेचे असून अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात पुढे येणे महत्त्वाचे आहे. पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेच्या जोखडातून मुक्तीचा लढा महिलांनी वैचारिक ताकतीने लढला पाहिजे. महिलांनी मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. महिलांनी शिक्षण घेतले. त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या तर सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. राज्य महिला आयोगाने तीन वर्षात अनेक राष्ट्रीय परिषदा घेऊन ग्रामीण भागापर्यंत महिलांना न्याय मिळवून दिला. तसेच महाराष्ट्र राज्य महिला अयोग हा नेहमी महिलांच्या हक्कासाठी पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देचाळीसगाव येथे राष्ट्रीय परिषदेत देवयानी ठाकरे यांचे प्रतिपादन‘महिलांची सुरक्षितता व सशक्तीकरण अंतर्गत महिलांमध्ये करावयाची सामाजिक व कायदेविषयक जाणीव जागृती’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद

चाळीसगाव, जि.जळगाव : महिलांना समाजामध्ये मानसन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. प्रत्येक महिलेने आपल्या हक्कांविषयी जागरूक राहणे गरजेचे असून अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात पुढे येणे महत्त्वाचे आहे. पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेच्या जोखडातून मुक्तीचा लढा महिलांनी वैचारिक ताकतीने लढला पाहिजे. महिलांनी मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. महिलांनी शिक्षण घेतले. त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या तर सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. राज्य महिला आयोगाने तीन वर्षात अनेक राष्ट्रीय परिषदा घेऊन ग्रामीण भागापर्यंत महिलांना न्याय मिळवून दिला. तसेच महाराष्ट्र राज्य महिला अयोग हा नेहमी महिलांच्या हक्कासाठी पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन चाळीसगाव महाविद्यालयातील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले.बी.पी.आर्टस्, एस.एम.ए.सायन्स आणि के.के.सी.कॉमर्स कॉलेज व महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांच्या सहयोगाने १४ रोजी ‘महिलांची सुरक्षितता व सशक्तीकरण अंतर्गत महिलांमध्ये करावयाची सामाजिक व कायदेविषयक जाणीव जागृती’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल होते.व्यासपीठावर जि.प.शिक्षण समिती पोपट भोळे, पं.स.सभापती स्मिता बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, शुभदा ठाकरे, माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, मिलिंद देशमुख, विनोद कोतकर, स्मिता बच्छाव, संपदा पाटील, बुदेलखंडी प्रदीप अहिरराव, क.मा.राजपूत इत्यादी उपस्थित होते. प्राचार्य मिलिंद बिल्दीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक परिषदेचे प्रमुख डॉ.डी.एस.निकुंब यांनी केले.यावेळी न्यायाधीश अनिता गिरडकर आपल्या बीज भाषणात म्हणाल्या की, महिलांसोबत पुरुषामध्येसुद्धा जागृती होणे गरजेचे आहे. समाजातील सर्वच पुरुष वाईट नाही, पण विकृत मानसिकतेच्या लोकांच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक महिलेला कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे, कारण कायद्याची व्याप्ती ही फार मोठी आहे. जेव्हा २२-२३ वर्षाचे मुलं-मुली घटस्फोटासाठी येतात, तेव्हा खूप वाईट वाटते की, कुठे भरटकतो आहे, समाज आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. तसेच त्यांनी महिलांविषयी असलेल्या विविध कायद्यांची सविस्तर माहिती सांगीतली.सूत्रसंचालन डॉ.गंगापूरकर व प्रा.रवींद्र पाटील यांनी केले तर आभार अजय काटे यांनी मानले.

टॅग्स :WomenमहिलाChalisgaonचाळीसगाव