शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

परवानगी नसताना मोलगी महाविद्यालयात प्रवेश

By admin | Updated: October 15, 2015 00:08 IST

नंदुरबार : विद्यापीठाने विद्यार्थी प्रवेशासाठी परवानगी दिली नसताना प्रवेश देऊन फसवणूक केल्याचा प्रकार मोलगी, ता.अक्कलकुवा येथे प्रज्ञा कला वरिष्ठ महाविद्यालयाने केला आहे.

नंदुरबार : विद्यापीठाने विद्यार्थी प्रवेशासाठी परवानगी दिली नसताना विद्याथ्र्याना प्रवेश देऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार मोलगी, ता.अक्कलकुवा येथे प्रज्ञा कला वरिष्ठ महाविद्यालयाने केला आहे. दरम्यान, विद्याथ्र्याना परीक्षेसाठी परवानगी न मिळाल्याने दोन दिवसांपासून त्यांनी आंदोलन सुरू केले होते. अखेर बुधवारी संस्थाचालकांनी विद्याथ्र्याचे वर्ष वाया जाऊ देणार नाही, असे हमीपत्र दिल्यानंतर विद्याथ्र्यानी आंदोलन स्थगित केले.

मोलगी येथे ग्रामविकास मंडळातर्फे प्रज्ञा वरिष्ठ कला महाविद्यालय चालविले जाते. या महाविद्यालयाला 2015-16 साली विद्याथ्र्याना प्रवेशाची परवानगी नसताना महाविद्यालयाने 96 विद्याथ्र्याना प्रथम वर्ष कला महाविद्यालयात प्रवेश दिला. शिवाय वर्गही सुरू केले. मात्र, परीक्षा अर्ज भरताना विद्याथ्र्याना अधिकृत प्रवेश मान्यताच नसल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने या विद्याथ्र्याचे परीक्षा अर्ज स्वीकारले नाही. त्यामुळे विद्याथ्र्याना या वर्षाची परीक्षाच देता येणार नाही. येत्या 27 ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थी व पालकवर्गात संस्थाचालकांप्रति तीव्र असंतोष व्यक्त झाला. या विद्याथ्र्यानी मोलगी येथे शासकीय विश्रामगृह परिसरात संस्थाचालकांच्या विरोधात दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले. अखेर बुधवारी संस्थाचालकांनी विद्याथ्र्याना येत्या सहा दिवसात याबाबत आपण शिक्षणमंत्री, तसेच कुलगुरू यांची भेट घेऊन विद्याथ्र्याचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी विनंती करण्याचे व परीक्षेची हमी घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर बुधवारी दुपारी विद्याथ्र्यानी आंदोलन स्थगित केले.

मात्र, 20 ऑक्टोबर्पयत याबाबत निकाल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा, तथा संस्थाचालकांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा पालक व विद्याथ्र्यानी दिला आहे.

संस्थाचालकांच्या अंतर्गत वादामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संस्थेचे जरी बेकायदेशीर काम असले तरी आधी विद्याथ्र्याचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी सर्वानी प्रय} करणे गरजेचे आहे. या विद्याथ्र्याना परीक्षेसाठी यंदा विद्यापीठाने बसू द्यावे अशी विनंती आपण आदिवासी पालकांतर्फे कुलगुरूंना करणार आहोत.

-सी.के.पाडवी,

माजी सभापती, जि.प. नंदुरबार.

संस्थाचालकांनी विद्याथ्र्याना अंधारात ठेवून परवानगी नसताना परवानगी आहे असे भासविले व प्रवेश दिला. त्यामुळे 96 विद्याथ्र्याच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडू.

-महेश वसावे,

विद्यापीठ प्रतिनिधी