शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मजुरी रखडल्याने मजुरांनी महामार्गाचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:30 IST

गेल्या चार-पाच महिन्यांपासून मजुरी रखडल्याने मजुरांनी जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम मंगळवारी सकाळी बंद पाडले. जामनेर तालुुक्यातील पाळधी परिसरात हा प्रकार घडला.

ठळक मुद्देआधीच काम संथ गतीनेपुरेशा निधीअभावी अडचणीचार-पाच महिन्यांपासून वेतनच नाही

पाळधी, ता.जामनेर, जि.जळगाव : गेल्या चार-पाच महिन्यांपासून मजुरी रखडल्याने मजुरांनी जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम मंगळवारी सकाळी बंद पाडले. जामनेर तालुुक्यातील पाळधी परिसरात हा प्रकार घडला.आधीच जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. या परिसरात पाळधीकडून नेरी-जळगावकडील रस्त्याचे काम करीत असलेल्या मजुरांची गेल्या चार-पाच महिन्यांपासून मजुरी रखडली आहे. मजुरी न मिळाल्याने मजूर संतप्त झाले. मजुरी मिळण्यासाठी त्यांनी कामावरील कंत्राटदार, अभियंते यांना वेळोवेळी सूचित केले. मात्र मजुरी मिळाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या मजुरांनी मंगळवारी सकाळी काम बंद पाडले.संतप्त झालेल्या मजुरांनी ऋतिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सुनसगाव, ता.जामनेर येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.विशेष म्हणजे मजुरांसोबतच अभियंते, पर्यवेक्षक, वाहनचालक, रोलरचालक, गवंडी इत्यादींचेही वेतन मिळालेले नाही.दर महिन्याला पुरेसा निधी मिळत नसल्याने मजुरांचे पगार होत नाही. रस्त्याच्या कामाचा निधी उपलब्ध न झाल्यामुळे कामगारांना वेळेवर पगार देऊ शकले नाही. तरी १० फेब्रुवारीपर्यंत सर्व मजुरांचे पगार दिले जातील.-किरण चौधरी, प्रोजेक्ट मॅनेजरगेल्या चार-पाच महिन्यांपासून काम करीत आहे. आजपर्यंत आम्हाला एक रुपयाही पगार मिळालेला नाही. महिना संपल्यानंतर पगारासाठी गेले तर पुढील महिन्यात या, असे करीत चार ते पाच महिन्यांचे पगार थकलेले आहे. पगार जर मागितले तर कामावरून काढून टाकण्याची धमकी देतात. यांच्याकडे रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या मालाला पैसे आहेत, पण मजुराला पैसे देण्यासाठी नाही. - विशाल सुरवाडे, मजूर, रा.शिंदी सुरवाडे, ता.बोदवड

टॅग्स :highwayमहामार्गJamnerजामनेर