शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

जीएसटी कमी झाल्याने औषधी स्वस्त होईल का रे भाऊ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:17 IST

जळगाव : कर्करोगासारख्या दुर्धर आजाराच्या औषधींवरील जीएसटीमध्ये कपात करून तो पाच टक्क्यांवर आणला तरी औषधींच्या किंंमतीमध्ये फारसा फरक पडणार ...

जळगाव : कर्करोगासारख्या दुर्धर आजाराच्या औषधींवरील जीएसटीमध्ये कपात करून तो पाच टक्क्यांवर आणला तरी औषधींच्या किंंमतीमध्ये फारसा फरक पडणार नसल्याचे औषधी विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र सरकारच्या घोषनेमुळे सामान्यांच्या आशा पल्लवित होऊन औषधी किती स्वस्त होणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. औषधींच्या किंमती कमी करायच्या असतील तर औषधींवरील जीएसटी पूर्णपणे हटविण्यात यावा, असे औषधी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढला तेव्हापासून आरोग्यावरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. ज्यांना कोरोना झाला त्यांना महागड्या औषधींचा खर्च सहन करावा लागला. मात्र कोरोना झाला नाही व किरकोळ आजारही झाले तरी आता सर्वांच्या मनात धास्ती निर्माण होत आहे. त्यामुळे साहजिकच काही जरी झाले तरी लगेच डॉक्टरांकडे जाण्याचा कल वाढला आहे. यात औषधींवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. औषधींच्या किंमतीदेखील प्रचंड वाढल्या असून केवळ साध्या तपासासाठीदेखील दवाखान्यात गेले तरी २०० ते ३०० रुपयांचा खर्च नागरिकांना करावा लागत आहे. यामुळे औषधींच्या किमतीचा विषय आला म्हणजे सर्वांच्या नजरा त्याकडे लागतात.

त्यात आता शुक्रवारी जीएसटी कौन्सिलची बैठक होऊन त्यात औषधीसह मालवाहतुकीचा विषय आला. त्यामुळे साहजिकच सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली व नवीन घोषणेमुळे काही स्वस्ताई येते का? याकडे लक्ष लागले. या पार्श्वभूमीवर या दोन्ही घटकांची माहिती घेतली असता सामान्यांना याचा फारसा दिलासा मिळणे कठीणच आहे.

काय होऊ शकतो परिणाम?

औषधींवर सध्या १२ टक्के जीएसटी आकारला जातो. त्यात कर्करोग व इतर दुर्धर आजारावरील औषधींवरील जीएसटीचे प्रमाण पाच टक्क्यांवर आणल्याची घोषणा शुक्रवारी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत करण्यात आली. जीएसटी कमी केले असले तरी त्यामुळे औषधी फारसी स्वस्त होणार नाही. मुळात या या औषधी एवढ्या महाग आहे की, त्यावरील जीएसटी पूर्णपणे हटविला तरच रुग्णांना दिलासा मिळू शकतो. या शिवाय पेशी व स्नायूंवरील महागड्या औषधींवरील जीएसटी रद्द केला आहे. मात्र यासोबतच कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब या आजारांसाठी जास्त प्रमाणात औषधींची मागणी असते, त्यावरील जीएसटी हटविल्यास त्याचा लाभ रुग्णांना अधिक होईल, असे औषध विक्रेते तसेच सामान्यांचेही म्हणणे आहे.