शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

हरविलेला ‘विकास’ आता गवसेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 18:51 IST

भाजपने दाखविलेले स्वप्न महाआघाडी प्रत्यक्षात आणेल ?; कोट्यवधीच्या निधींच्या घोषणांपेक्षा मुलभूत सुविधांकडे लक्ष हवे; रस्ते, सिंचन प्रकल्प, आरोग्य, वीज क्षेत्रातील अनुशेष मोठा

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑातील तत्कालीन भाजप सरकारने विकास कामांसाठी कोटींच्या कोटी उड्डाणे मारली; प्रत्यक्षात निधीचा खडखडाट राहिला. जेवढा निधी आला, तोही आपापसातील वादामुळे पडून राहिला. आभासी चित्र निर्माण केले होते, ते आता दूर होऊ लागले आहे.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाच वर्षांपूर्वी जळगावात झालेल्या कार्यक्रमात राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी १६०० कोटी रुपयांच्या कामांचे भूमीपूजन केले होते. नवापूर ते अकोला, बºहाणपूर ते अंकलेश्वर, जळगाव ते औरंगाबाद, जळगाव ते नांदगाव या महामार्गांचा त्या कामांमध्ये समावेश होता.काय झाले या कामाचे? नवापूर ते अकोला या महामार्गापैकी केवळ तरसोद ते चिखली या टप्प्याचे काम बऱ्यापैकी सुरु आहे. जळगाव ते नांदगाव या रस्त्याचे काम समाधानकारक आहे. मात्र उर्वरित रस्त्यांची परिस्थिती जैसे थे आहे. कंत्राटदाराला तंबी देणारे गडकरी आता त्याची बाजू घेत अधिकारी, लोकप्रतिनिधींना आरोपीच्या पिंजºयात उभे करीत आहे. पाच वर्षांमध्ये हाच खेळ चालला.रविवारी रात्री बºहाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर १२ जणांचा बळी गेला. दोन महिन्यांपूर्वी एरंडोलजवळ मोठा अपघात झाला. केंद्रात भाजपचे सरकार असूनही राष्टÑीय महामार्गाच्या कामांविषयी गौडबंगाल कायम आहे.केंद्र सरकारशी निगडीत तापी रिचार्ज, गिरणा नदीतील ७ बलून बंधारे हे प्रकल्प असेच रेंगाळले आहेत. जळगाव, भुसावळ, धुळे येथील अमृत पाणीपुरवठा योजना, मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग रखडलेले आहेत. घोषणा आणि वास्तव यातील फरक आता लोकांच्या लक्षात येऊ लागला आहे. भाजपकडून भ्रमनिरास होत असल्याने महाविकास आघाडीकडून अपेक्षा उंचावल्या आहे. भाजपच्या खासदार आणि आमदारांसाठी ही धोक्याची घंटा आहे. जनहिताच्या कामासाठी रेटा न लावल्यास जळगावचे आमदार सुरेश भोळे यांना जसा जनक्षोभाचा सामना करावा लागला, अशी वेळ इतरांवर येणार नाही, असे कसे म्हणता येईल?पंतप्रधानांनी दोन वर्षांपासून नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे. मोठा निधी देण्याची घोषणा झाली. परंतु, तेथील स्थलांतर थांबलेले नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अद्याप सुरु झालेले नाही. ८६ प्राथमिक शाळा अद्याप खाजगी जागेत किंवा कच्च्या घरात भरत आहे, हे वास्तव चित्र आहे.जळगाव शहरात नगरोत्थान योजनेचा ८ कोटींचा निधी अद्याप महापालिकेच्या खात्यात पडून आहे. पिण्याचे पाणी, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण या मुलभूत सुविधांकडे तिन्ही जिल्ह्यातील पालिकांचे दुर्लक्ष आहे.जळगाव जिल्ह्यात आमदार निधीतील १४० कामे अद्यापही प्रलंबित आहेत. स्थानिक विकास निधी एकूण तीन कोटी ९० लाख रुपये हा दोन वर्षांपासून खर्चाविना पडून आहे. खासदार निधीतील पाच कोटी ३९ लाखांची एकूण ९७ कामे प्रलंबित आहेत. त्याला गती देण्याचे काम आता पालकमंत्र्यांना करावे लागणार आहे.महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तीन राजकीय पक्षांच्या अनुभवी मंत्र्यांचा समावेश आहे. मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा सरकारची सुरुवात ही प्राथमिक पातळीवर सुरु आहे. किमान समान कार्यक्रम राबविताना सामान्यांना नजरेसमोर ठेवले जात आहे, हे महत्त्वपूर्ण आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार काम करीत असल्याने चांगली कामे होतील, हा विश्वास सामान्यांना वाटत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव