शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

बिबट्यांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत वन विभाग गंभीर होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -जंगलामध्ये वाढत जाणाऱ्या अतिक्रमणामुळे वन्यजीव नागरीवस्तीमध्ये शिरण्याच्या घटना वाढत असून, यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष ...

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव -जंगलामध्ये वाढत जाणाऱ्या अतिक्रमणामुळे वन्यजीव नागरीवस्तीमध्ये शिरण्याच्या घटना वाढत असून, यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. त्यात मानवाकडून वन्यजीवांना ठार मारण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात असून, जळगाव तालुक्यातच गेल्या सहा महिन्यात एकूण ३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे; मात्र याप्रकरणी वन विभागाकडून कोणतेही ठोस कारण देण्यात आले नसून, दोषींवरदेखील कारवाईबाबत वन विभाग लक्ष द्यायला तयार नाही.

सोमवारी तालुक्यातील विटनेर वनक्षेत्रातील कम्पार्टमेंट ४३८ मध्ये एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. या बिबट्याने मृत नीलगाय खाल्ल्याने विषबाधा होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याआधी याच भागात डिसेंबर महिन्यात एका मादी बिबट्याचा मृत्यू झाला होता. तर जानेवारी महिन्यात ममुराबाद शिवारातदेखील एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. विशेष म्हणजे ममुराबाद शिवारातील बिबट्या अन्य भागात मारून, त्याचा मृतदेह या शिवारात आणून फेकला होता. त्या बिबट्यावरदेखील विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला होता. बिबट्यांवर विषबाधासारखे प्रयोग होत असताना, वन विभागाकडून असले प्रयोग रोखण्यास पूर्णपणे अपयश येत आहे.

तीन दिवसांपासून नीलगायचा मृतदेह पडून कसा राहतो?

विटनेर शिवारात बिबट्यांसह नीलगाय व इतर वन्यप्राणीदेखील आहेत. त्यानुसार वन विभागाकडून सुरक्षा पुरविणे गरजेचे आहे, तसेच नियमित जंगलात गस्त मारणेदेखील गरजेचे आहे. या जंगलात तीन दिवसांपासून एक नीलगायचा मृतदेह पडून असतो, त्या गायीचा मृतदेहावर विषप्रयोग केला जातो व त्या गायीचे मास खाल्ल्यामुळे बिबट्याचा मृत्यू होतो. जर वन विभागाने वेळीच गस्त करून, याकडे लक्ष दिले असते तर बिबट्याचा मृत्यू झालाच नसता. या भागातील वनरक्षक फिल्डवर जात नसल्याच्या तक्रारीदेखील प्राप्त होत आहेत. याबाबत चौकशी करण्याची मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य बाळकृष्ण देवरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे करणार तक्रार

बिबट्यांच्या मृत्यूला वन विभागाचा उदासीन कारभार जबाबदार असून, वन अधिकारी व कर्मचारी नियमित जंगलात गस्त करत नसल्याने या घटना वाढत असल्याने याबाबत संबंधित वन अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांबाबत वन्यजीव संरक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

व्हिसेरा मिळण्याची सहा महिन्यांची प्रतीक्षा

बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूचे कारण शोधण्यासाठी बिबट्याचा व्हिसेरा नाशिक येथे पाठविण्यात आला आहे. ममुराबाद येथे मृतावस्थेत आढळून आलेल्या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सहा महिने होऊनदेखील व्हिसेराचा अहवाल प्राप्त झालेला नाही. अहवाल मिळण्यास होणाऱ्या उशीरबाबतदेखील लक्ष देण्याची गरज आहे.