शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मुख्यमंत्री साहेब, विकासाचे ग्रहण सुटेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:53 IST

मिलिंद कुलकर्णी केंद्र, राज्य आणि गावात भाजप विजयी होऊनही खान्देशाला लागलेले विकासाचे ग्रहण मात्र कायम आहे. प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान, ...

मिलिंद कुलकर्णीकेंद्र, राज्य आणि गावात भाजप विजयी होऊनही खान्देशाला लागलेले विकासाचे ग्रहण मात्र कायम आहे. प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान, मुख्यमंत्री विकासाचे मोठी आश्वासने देतात, पण ती वास्तवात उतरत नाही, हा खान्देशवासीयांचा दु:खद अनुभव आहे. ही भावना मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवी.कोट्यवधीच्या निधीची घोषणा होते, प्रकल्प मंजुरीचे आदेश निघतात, शुभारंभ धडाक्यात होतात, मात्र पुढे निधीअभावी कामे रेंगाळतात हा अनुभव भाजपच्या पाच वर्षांच्या राजवटीत प्रामुख्याने येत आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या कार्यकाळात नशिराबाद जवळील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु झाले, पुढे ते काँग्रेस आघाडीच्या काळात पूर्ण झाले. काँग्रेस आघाडीच्या काळात धरणगावचा रेल्वे उड्डाणपूल, जळगावचे नाट्यगृह, लांडोरखोरी वनउद्यान हे प्रकल्प सुरु झाले, मात्र भाजप-शिवसेना युतीच्या दुसऱ्या पर्वात ते पूर्णत्वास आले. कामासाठी विलंब लागणे वेगळे आणि रेंगाळणे वेगळे. एकीकडे बुलेट ट्रेन, समृध्दी महामार्गाचे काम सुरु असताना खान्देशात मात्र रेंगाळलेल्या कामांची लांबलचक यादी आहे.पाडळसरे धरण, शेळगाव बॅरेज, गिरणा नदीपात्रातील बलून बंधारे, तापीवरील मेगा रिचार्ज प्रकल्प ही प्रमुख सिंचनाची कामे, राष्टÑीय महामार्ग क्रमांक ६ वरील नवापूर ते फागणे, फागणे ते तरसोद या चौपदरीकरणाच्या टप्प्यांची कामे, बºहाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्गाचे चौपदरीकरण, जळगाव ते औरंगाबाद राज्य मार्ग ही रस्त्यांची कामे, मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्ग, चाळीसगाव-धुळे मार्ग, पाचोरा-जामनेर मार्ग ही रेल्वेची कामे, रेल्वेच्या भुसावळातील इंजिन बांधणी प्रकल्प, नीर पाणी प्रकल्प अशी प्रलंबित, रेंगाळलेल्या प्रकल्पांची यादी आहे. औद्योगिक विकासाच्या बाबतीत तर मोठा अनुशेष आहे. दिल्ली -मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर पुढे काहीही सरकत नाही. नवापूरसारख्या गुजराथच्या सीमेवरील शहरातील उद्योगांना प्रोत्साहन दिले जात नाही. जिल्हा व तालुका औद्योगिक वसाहतींचे प्रश्न प्रलंबित आहेत. कोणत्याही मंत्री, लोकप्रतिनिधीने या विषयावर प्रयत्न केलेले दिसून आले नाहीत. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी ‘टेक्सटाईल पार्क’ची घोषणा केली होती. मोकळ्या जागांवर जामनेरला फलक लागले पाच वर्षात, बाकी काहीही झालेले नाही. राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करुन जळगाव किंवा धुळ्यात कृषी विद्यापीठाची स्थापना करण्याचा मुद्दा असाच बासनात पडला आहे.जळगाव, धुळ्याच्या महापालिका भाजपच्या ताब्यात आल्यानंतर सहा महिने ते वर्षभरात काही बदल दिसायला हवा होता, पण दुर्देवाने तसे काहीही घडलेले नाही. केवळ कोट्यवधीच्या निधी मंजुरीच्या घोषणा आणि वास्तवात ठणठणगोपाळ असा प्रकार सुरु आहे. दोन्ही शहरांमधील अमृत पाणी योजनेची पुरती वाट लागली आहे. महापालिका, महाराष्टÑ जीवन प्राधीकरण आणि ठेकेदार हे केवळ आरोप-प्रत्यारोपात मश्गुल आहेत. कोणाचे कुणावर नियंत्रण नाही. भर पावसाळ्यात नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी आणि रस्त्यावर धड चालण्यासाठी हाल सुरु आहेत. तीच अवस्था मल:निस्सारण योजनांची आहे. विमानसेवा कधी तरी सुरु होते, बराच काळ बंद असते. पुन्हा नवीन कंपनी आणि पुन्हा नवीन आश्वासने असे शुक्लकाष्ट कायम आहे.या पंचवार्षिक काळात जळगावला चार तर नंदुरबारला दोन पालकमंत्री मिळाले. पण प्रभाव म्हणावा असा कुणाचाही पडला नाही. एकनाथराव खडसे, पांडुरंग फुंडकर, चंद्रकांत पाटील आणि आता गिरीश महाजन हे जळगावचे तर गिरीश महाजन आणि जयकुमार रावल हे नंदुरबारचे पालकमंत्री. नाव मोठे पण जिल्ह्याला फायदा काही नाही, असे घडले. फायदा भाजपला झाला, पण जनतेचे काय हा प्रश्न भेडसावतो आहे. खान्देशातील प्रत्येक ठिकाणी अभाव, गैरसोयींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. उद्योग-व्यापारांपुढे संकटे आहेत. नवीन रोजगार नाही. मुंबई-पुण्याकडे स्थलांतराचे प्रमाण खूप आहे. २५ पैकी १० तालुके आदिवासी आहेत. त्यांच्या प्रश्नांसाठी संघटना कायम आंदोलनाच्या पवित्र्यात असतात, सरकार केवळ आश्वासन देते, अशी त्यांची भावना झालेली आहे. हे ग्रहण सुटावे अशी ‘महाजनादेश’ घ्यायला आलेल्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव