शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जळगावातील वनजमीन विक्री घोटाळ्यातील पडद्याआडचे सूत्रधार सापडतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:21 IST

विश्लेषण

-सुशील देवकर

जळगाव- तालुक्यातील उमाळे, कंडारी, भागपूर शिवारातील सुमारे २२८८ एकर वनजमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणात ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे गुन्हा दाखल झाला असला तरीही या घोटाळ्यातील पडद्याआडचे सूत्रधार असलेली बडी धेंडे सापडतील का? हा कळीचा मुद्दा आहे.वनजमीनीचा बनावट सातबारा तयार करून परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणात शनिवार, ८ डिसेंबर रोजी तलाठी रवींद्र बहादुरे, वकील प्रदीप कुळकर्णी, ब्रोकर मुकुंद ठाकूर याच्यासह ११ जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बनावट दस्ताऐवज तयार करणारे सहा वेंडरांचाही यात समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार मुकुंद ठाकूर, वकील रवींद्र बहादुरे व अ‍ॅड.प्रदीप कुळकर्णी मात्र अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू असताना पडद्याआडचे सूत्रधार कधी सापडणार? असा सवाल आहे. वनजमीनीची बनावट दस्तावेजांद्वारे विक्री करण्याच्या या घोटाळ्यात जी नावे समोर आली आहेत, त्याव्यतिरिक्त आणखीही अनेक जण यात गुंतले असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांची नावे पुढे येणार कशी हा प्रश्न आहे. पोलिसांनी यात प्रामाणिकपणे तपास केला तरच ते शक्य होणार आहे. मात्र याबाबत अनुभव फारसा चांगला नाही. त्यातच या प्रकरणात पोलिसांवर दबावही येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीने केवळ मर्यादित चौकटीत तपास केला. जर त्यांनी या प्रकरणाच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांनाही यातील अनेक धागेदोरे मिळाले असते. मात्र कदाचित त्यांच्यावरही राजकीय दबाव आला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होऊन गेल्यानंतरही समितीचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर झालेला नाही. तसेच बनावट सातबारा व बनावट शिक्के केल्याप्रकरणी तसेच अधिकाºयांची बनावट सही केल्याप्रकरणी प्रशासनाने फिर्याद दिलेली नाही. त्यामुळे पडद्याआडचे सूत्रधार शोधणे दूरच.. अशी परिस्थिती आहे. या प्रकरणात संगणकीकृत सातबाराच्या नोंदींमध्येही फेरफार केला गेला असल्याचे सांगितले जात आहे. ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे असताना त्याकडेही सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाºयांना तर पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.