शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांची बांधिलकी जनतेशी राहणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST

वार्तापत्र महापालिकेत अडीच वर्षाचा कार्यकाळ संपून मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या 27 नगरसेवकांनी ...

वार्तापत्र

महापालिकेत अडीच वर्षाचा कार्यकाळ संपून मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या 27 नगरसेवकांनी विकासाचं नाव सांगून पक्षांतर करत थेट शिवसेनेला मदत करत, महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणली. महापालिकेच्या निवडणुकीत देखील अनेक नगरसेवकांनी याच विकासाचे नाव सांगत इतर पक्षांना मधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र अडीच वर्षात भाजप मध्ये राहून कोणत्याही नगरसेवकाला आपल्या प्रभागाचा व शहराच्या देखील साधा विकास देखील करता आला नाही. अडीच वर्षात केवळ नागरिकांचा संतापाचा सामना सर्वपक्षीय नगरसेवकांना करावा लागला. एन् महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम लावून नगरसेवकांनी जनतेला पुन्हा विकासाचे आश्वासन देत पक्षांतर केले. जळगावकरांनी भाजपने दिलेल्या अडीच वर्षातील आश्वासनांची आठवण काढत नगरसेवकांच्या पक्षांतराला देखील एक प्रकारे समर्थनच दिले. आता जळगावकरांना पक्षांतर केलेल्या नगरसेवकानी ज्या कारणाने पक्ष बदल केला आहे. त्या कारणाची पूर्तता होण्याची अपेक्षा आता जळगावकर लावून आहेत. नगरसेवक जनतेच्या बांधिलकी साठीच व विकासासाठीच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले आहेत हे आता नगरसेवकांनी आपल्या कामातून सिद्ध करून दाखवण्याची गरज आहे. जर पुढील अडीच वर्षात शहराचा समस्या कायम राहील्यात तर जनतेची बांधीलकी कोणत्याही लोकप्रतिनिधी सोबत राहील याची देखील शास्वती जनता देणार नाही. भाजपने महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस केवड विजयासाठी इतर पक्षातील नगरसेवक आपल्या बाजूने करत ही निवडणूक जिंकली. तेव्हाही जनतेने या पक्षांतराच्या पाठिंबाच दिला होता, भाजपने भ्रमनिरास केल्यानंतर आत्ताही शिवसेनेने भाजपचे नगरसेवक फोडून महापालिकेत सत्ता आणण्याचा या प्रकाराला देखील जनतेने पाठिंबा दिला आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की निवडून येणारे नगरसेवक जनतेला गृहीत धरणार नाही. जर जळगावकरांना गृहीत न धरताच, केवळ जळगावकरांना विकासाचे गाजर देऊन स्वतःच्या विकास करण्याचा हा खटाटोप नगरसेवकांकडून होत असेल तर जळगावकर जनता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षांतर करणाऱ्या व सत्तेच्या बाजार मांडणाऱ्याना मतदानातून उत्तर देईल च, त्यामुळे जनतेशी बांधिलकी ठेवून व शहराचा विकास करून च पुढील निवडणुकीसाठी नगरसेवकांनी प्रयत्न केल्यास, त्या प्रयत्नांना जळगावकर नेहमी समर्थन देत राहतील.