शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

नगरसेवकांची बांधिलकी जनतेशी राहणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST

वार्तापत्र महापालिकेत अडीच वर्षाचा कार्यकाळ संपून मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या 27 नगरसेवकांनी ...

वार्तापत्र

महापालिकेत अडीच वर्षाचा कार्यकाळ संपून मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या 27 नगरसेवकांनी विकासाचं नाव सांगून पक्षांतर करत थेट शिवसेनेला मदत करत, महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणली. महापालिकेच्या निवडणुकीत देखील अनेक नगरसेवकांनी याच विकासाचे नाव सांगत इतर पक्षांना मधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र अडीच वर्षात भाजप मध्ये राहून कोणत्याही नगरसेवकाला आपल्या प्रभागाचा व शहराच्या देखील साधा विकास देखील करता आला नाही. अडीच वर्षात केवळ नागरिकांचा संतापाचा सामना सर्वपक्षीय नगरसेवकांना करावा लागला. एन् महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम लावून नगरसेवकांनी जनतेला पुन्हा विकासाचे आश्वासन देत पक्षांतर केले. जळगावकरांनी भाजपने दिलेल्या अडीच वर्षातील आश्वासनांची आठवण काढत नगरसेवकांच्या पक्षांतराला देखील एक प्रकारे समर्थनच दिले. आता जळगावकरांना पक्षांतर केलेल्या नगरसेवकानी ज्या कारणाने पक्ष बदल केला आहे. त्या कारणाची पूर्तता होण्याची अपेक्षा आता जळगावकर लावून आहेत. नगरसेवक जनतेच्या बांधिलकी साठीच व विकासासाठीच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले आहेत हे आता नगरसेवकांनी आपल्या कामातून सिद्ध करून दाखवण्याची गरज आहे. जर पुढील अडीच वर्षात शहराचा समस्या कायम राहील्यात तर जनतेची बांधीलकी कोणत्याही लोकप्रतिनिधी सोबत राहील याची देखील शास्वती जनता देणार नाही. भाजपने महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस केवड विजयासाठी इतर पक्षातील नगरसेवक आपल्या बाजूने करत ही निवडणूक जिंकली. तेव्हाही जनतेने या पक्षांतराच्या पाठिंबाच दिला होता, भाजपने भ्रमनिरास केल्यानंतर आत्ताही शिवसेनेने भाजपचे नगरसेवक फोडून महापालिकेत सत्ता आणण्याचा या प्रकाराला देखील जनतेने पाठिंबा दिला आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की निवडून येणारे नगरसेवक जनतेला गृहीत धरणार नाही. जर जळगावकरांना गृहीत न धरताच, केवळ जळगावकरांना विकासाचे गाजर देऊन स्वतःच्या विकास करण्याचा हा खटाटोप नगरसेवकांकडून होत असेल तर जळगावकर जनता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षांतर करणाऱ्या व सत्तेच्या बाजार मांडणाऱ्याना मतदानातून उत्तर देईल च, त्यामुळे जनतेशी बांधिलकी ठेवून व शहराचा विकास करून च पुढील निवडणुकीसाठी नगरसेवकांनी प्रयत्न केल्यास, त्या प्रयत्नांना जळगावकर नेहमी समर्थन देत राहतील.