शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

वादावादी टाळून शहराच्या विकास होणार का ..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST

महापालिकेत ऐतिहासिक सत्तांतर होऊन आता दोन महिन्याचा काळ पूर्ण झाला आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने महापालिकेची सर्व यंत्रणा व ...

महापालिकेत ऐतिहासिक सत्तांतर होऊन आता दोन महिन्याचा काळ पूर्ण झाला आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने महापालिकेची सर्व यंत्रणा व मनपा सर्व पदाधिकारी देखील कोरोना वरील उपाय योजनांमध्ये गुंतलेले आहेत. या भयावह परिस्थितीत महापालिका व जळगाव शहराच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे महापालिकेला जिल्हा नियोजन समितीमधून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. रस्त्यांची भीषण परिस्थिती मुळे शहराची अक्षरशा वाट लागली आहेत. त्यात महापालिकेला प्राप्त शंभर कोटी रुपयांच्या निधीतून कोणतेही काम नव्हता त्या निधीवर राज्य शासनाने स्थगिती आणली आहे. अशा परिस्थितीत माजी महापौर भारती सोनवणे व विद्यमान महापौर जयश्री महाजन व शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडून जिल्हा नियोजन समितीतून ६१ कोटी रुपयांचा निधी महापालिकेसाठी प्राप्त झाला आहे. शहरवासीयांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब असली तरी हा निधी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा भाजप व शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. याआधी भाजपाची सत्ता असताना देखील दोन्ही पक्षात अशाच प्रकारे तू तू मे मे सुरूच होती. दोन्ही पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीना जळगावकर अक्षरशः कंटाळले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने देखील विद्यमान पालकमंत्र्यांवर आरोप केले. दोन्ही पक्षात अशाच प्रकारे आरोप-प्रत्यारोप अजूनही कायम आहेत. मात्र या आरोप-प्रत्यारोपांमध्ये जळगावकरांना काय मिळणार आहे. याबाबत या दोन्ही पक्षांनी विचार करण्याची गरज आहे. दोन्हीही पक्षांनी आपापसातील गट-तट व वाद सोडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. शहरातील रस्त्यांची परिस्थिती पाहता जळगावकर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर सारखेच नाराज आहेत. अशा परिस्थितीत मनपातील सत्ताधारी व विरोधी बनलेल्या भाजपला देखील आता काही महिने का असेना शिवसेनेला काम करण्याची संधी देणे गरजेचे आहे. कारण अडीच वर्षात सत्ताधारी म्हणून भाजपला कोणतेही ठोस काम करता आले नाही. त्यात राज्य शासनाकडून प्राप्त झालेला शंभर कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन देखील सत्ताधाऱ्यांना त्यावेळी करता आले नव्हते. त्यामुळे विरोधी बनलेल्या भाजपने काम करण्यासाठी शिवसेनेला काही अवधी देण्याची गरज आहे. त्यानंतर कामे झाली प्रखर विरोधी पक्ष म्हणून भाजपने आपली भूमिका पार पाडली पाहिजे. मात्र संपूर्ण शहर आधीच समस्यांनी ग्रासले आहे. त्यात कोरोना ची भयंकर परिस्थिती असताना दोन्ही पक्षाचे पदाधिकारी जर राजकीय हेवेदाव्यांमध्ये गुंतलेले असले, तर यामध्ये या दोन्ही पक्षांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे प्राप्त निधीतून शहराच्या विकासासाठी कसा सुवर्णमध्य निघेल याचा विचार करून मनपा सत्ताधारी शिवसेना व विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला काही महिने तरी काम करावे लागेल.