शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कामबंदमुळे गाळे लिलाव होतील का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:19 IST

अजय पाटीलजळगाव-महापालिकेच्या मुदत संपलेल्या २० मार्केटमधील गाळे ताब्यात घेवून, त्या गाळ्यांचा लिलाव करण्यात यावा व त्यातून मिळणाऱ्या रक्कमेतुन मनपा कर्मचाºयांचे अनेक महिन्यांपासूनचे थकीत वेतन अदा करावे या मागणीसाठी मनपा कर्मचाºयांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. तसेच मंगळवारी लेखणीबंद आंदोलन केल्याने संपूर्ण कामकाज ठप्प होते. मनपा कर्मचाºयांकडून पुकारण्यात आलेल्या कामबंद मुळे ...

अजय पाटीलजळगाव-महापालिकेच्या मुदत संपलेल्या २० मार्केटमधील गाळे ताब्यात घेवून, त्या गाळ्यांचा लिलाव करण्यात यावा व त्यातून मिळणाऱ्या रक्कमेतुन मनपा कर्मचाºयांचे अनेक महिन्यांपासूनचे थकीत वेतन अदा करावे या मागणीसाठी मनपा कर्मचाºयांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. तसेच मंगळवारी लेखणीबंद आंदोलन केल्याने संपूर्ण कामकाज ठप्प होते. मनपा कर्मचाºयांकडून पुकारण्यात आलेल्या कामबंद मुळे महापालिका प्रशासनावर दबाव येवून गाळे लिलावाची प्रक्रिया तत्काळ सुरु होईल अशी आशा आहे.मात्र, उच्च न्यायालयाचा आदेशानंतर ९ महिने उलटूनही मनपाकडून गाळे लिलावाची प्रक्रिया अद्याप राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे मनपा कर्मचाºयांचा कामबंद आंदोलनाची दखल घेवून मनपा प्रशासन तत्काळ कारवाई करून गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु होईल का ? हा प्रश्न निर्माण होत आहे.मनपा कर्मचाºयांकडून करण्यात आलेले आंदोलन हे गाळे धारकांनी गेल्या महिन्यात पुकारलेल्या आंदोेलनाला उत्तर असून, प्रशासनाव्दारे शासनावर दबाव टाकण्यासाठी कामबंद आंदोलन सुरु करण्यात आल्याची चर्चा आहे. कामबंद आंदोलनादरम्यान, सफाई, करवसुलीचे कामे देखील थांबणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांना देखील फटका बसणार आहे. गाळेधारक व प्रशासनाच्या वादामध्ये नाहक सर्वसामान्य जनता व मनपा कर्मचाºयांना खेचण्याचा हा प्रयत्न सध्या दिसून येत आहे. मनपाला जर न्यायालयाने आदेश दिले आहेत तर थेट कारवाई करण्यास काय अडचण आहे ? हा प्रश्न मनपातील कर्मचाºयांसह नागरिकांना देखील पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी मनपा अधिनियमात बदल करण्यात येणार असल्याचे आश्वासन गाळेधारकांना दिले होते.मात्र ७ एप्रिल रोजी नगरविकास खात्याचा उपसचिवांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून न्यायालयाचा अवमान न करता कार्यवाही करण्याचा सुचना दिल्या होत्या. त्यानंतर मनपा आयुक्तांनी थकीत गाळेधारकांना बिले वाटपाची प्रक्रिया सुरु केली. मात्र, अद्याप गाळे ताब्यात घेण्याबाबत कोणतीही प्रक्रिया प्रशासनाने केलेली नाही. जे ढीम्म मनपा प्रशासन उच्च न्यायालय व शासनाच्या नगरविकास खात्याच्या सूचनांनरतही कारवाईसाठी सरसावले नाही. ते प्रशासन कर्मचाºयांचा कामबंद आंदोलनाची दखल घेवून खरोखरच कारवाई करेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मनपा कर्मचाºयांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाबाबत अद्याप मनपा प्रशासनाने कुठल्याही कर्मचारी किंवा विभागप्रमुखांना सूचना देखील पाठविल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाची भूमिका अद्याप देखील स्पष्ट नाही. मनपा कर्मचाºयांचा आंदोलनानंतर प्रशासन काय कारवाई हे पाहणे आता औत्सुक्याचे आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव