शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अस्वच्छतेकडे कोणी लक्ष देईल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 12:16 IST

अस्वच्छतेचा प्रश्न बिकट

शहरात अस्वच्छतेचा प्रश्न बिकट बनला असून त्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव नेहमीच शहरवासीयांना येतो. काही ठिकाणी कचरा कुंड्या नाही तर जेथे आहे त्या ओसंडून वाहत आहे. या सोबतच बऱ्याच ठिकाणी कचरा कुंड्या असल्या तरी त्यात कचरा न टाकता अनेक जण बाहेर टाकतात व तो इतरत्र उडतो. त्यामुळे अस्वच्छतेचा प्रश्न बिकट होतो. असे असले तरी शहरातील शिवाजीनगर भागात ही समस्या गंभीर होत आहे. या परिसरात असलेल्या अस्वच्छतेबाबत नेहमी आवाज उठविला जाते. त्या बाबत मनपाकडे तक्रारही केली जाते. यात यंदाही आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून ही समस्या मांडली. हा प्रश्न ५ ते १० हजार नागरिकांचा असून तो खूप गांभीर्याने घेण्यासारखा असला तरी त्याकडे मनपा सोयीस्करपणे दुर्लक्ष करते. यामुळे शिवाजीनगर भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारीतील पाणी हे रस्त्यावरून येवून कोणत्यातरी खड्यात साचून त्यामध्ये डास तयार होतात व त्यामुळे थंडी-ताप, खोकला, मलेरिया अशा प्रकारचे आजार पसरतात. त्या विषयी यापूर्वीदेखील नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र त्याची कोणीच दखल घेतली नाही. मनपाचा आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून बंद आहे. तरीही त्या ठिकाणी शहरातील दररोजचा २२० टन कचरा टाकला जात आहे. लाखो टन कचरा कुठल्याही प्रक्रि येविना पडून आहे. त्या ठिकाणी जसा आजूबाजूला त्रास आहे, तसाच त्रास या भागात सहन करावा लागतो. शिवाजीनगर भागात काही ठिकाणी कचराकुंडीच नाही. त्यामुळे कचरा टाकावा कोठे असा प्रश्न पडतो. या सर्व प्रकाराची मनपाच्या आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेणे गरजेचे आहे, तरच हा प्रश्न सुटू शकेल.- विनायक पाटील, अध्यक्ष, धर्मरथ फाउंडेशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव