शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

अस्वच्छतेकडे कोणी लक्ष देईल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 12:16 IST

अस्वच्छतेचा प्रश्न बिकट

शहरात अस्वच्छतेचा प्रश्न बिकट बनला असून त्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव नेहमीच शहरवासीयांना येतो. काही ठिकाणी कचरा कुंड्या नाही तर जेथे आहे त्या ओसंडून वाहत आहे. या सोबतच बऱ्याच ठिकाणी कचरा कुंड्या असल्या तरी त्यात कचरा न टाकता अनेक जण बाहेर टाकतात व तो इतरत्र उडतो. त्यामुळे अस्वच्छतेचा प्रश्न बिकट होतो. असे असले तरी शहरातील शिवाजीनगर भागात ही समस्या गंभीर होत आहे. या परिसरात असलेल्या अस्वच्छतेबाबत नेहमी आवाज उठविला जाते. त्या बाबत मनपाकडे तक्रारही केली जाते. यात यंदाही आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून ही समस्या मांडली. हा प्रश्न ५ ते १० हजार नागरिकांचा असून तो खूप गांभीर्याने घेण्यासारखा असला तरी त्याकडे मनपा सोयीस्करपणे दुर्लक्ष करते. यामुळे शिवाजीनगर भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारीतील पाणी हे रस्त्यावरून येवून कोणत्यातरी खड्यात साचून त्यामध्ये डास तयार होतात व त्यामुळे थंडी-ताप, खोकला, मलेरिया अशा प्रकारचे आजार पसरतात. त्या विषयी यापूर्वीदेखील नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र त्याची कोणीच दखल घेतली नाही. मनपाचा आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून बंद आहे. तरीही त्या ठिकाणी शहरातील दररोजचा २२० टन कचरा टाकला जात आहे. लाखो टन कचरा कुठल्याही प्रक्रि येविना पडून आहे. त्या ठिकाणी जसा आजूबाजूला त्रास आहे, तसाच त्रास या भागात सहन करावा लागतो. शिवाजीनगर भागात काही ठिकाणी कचराकुंडीच नाही. त्यामुळे कचरा टाकावा कोठे असा प्रश्न पडतो. या सर्व प्रकाराची मनपाच्या आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेणे गरजेचे आहे, तरच हा प्रश्न सुटू शकेल.- विनायक पाटील, अध्यक्ष, धर्मरथ फाउंडेशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव