शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

‘ते’ २० किमीचे रस्ते कोणाचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून गेलेल्या २० किमीच्या रस्त्यांवरून मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागातील वाद अजूनही शमलेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून गेलेल्या २० किमीच्या रस्त्यांवरून मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागातील वाद अजूनही शमलेला दिसून येत नाही. आता हे रस्ते कोणाकडे आहेत. याबाबत तोडगा काढण्यासाठी मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठकीचे आयोजन १ सप्टेंबर रोजी महापालिकेत करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी मनपा आयुक्तांनी विभागप्रमुखांची बैठक घेवून प्राथमिक चर्चा केल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे.

शहरातील मुख्य भागातून २० किमीचे ६ रस्ते गेले आहेत. २०१७ मध्ये हे रस्ते मनपाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करण्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आले होते. मात्र, चार वर्षांपासून हे रस्ते अद्यापही मनपाकडेच असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच बांधकाम विभागाने हे रस्ते अद्याप मनपाकडून वर्ग करून घेतले नसल्याचेही स्पष्ट झाले होते. मंगळवारी शासनाच्या अंदाज समितीने घेतलेल्या बैठकीत मनपा प्रशासनाने या रस्त्यांवरील अतिक्रमण काढून हे रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करण्यासंदर्भातील आदेश मनपा प्रशासनाला दिले होते. त्यादृष्टीने आता हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेवून, या प्रकरणाबाबत झालेले ठराव, शासन निर्णय व पत्रव्यवहारांची माहिती घेण्यात आल्याची माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली आहे.

सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घेणार निर्णय

२००२ मध्ये हे रस्ते मनपाने बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केले होते. त्यानंतर मनपाच्या महासभेत ठराव घेवून मार्च २०१७ मध्ये हे रस्ते मनपाच्या हद्दीत घेण्यात आले. त्यानंतर पुन्हा २९ एप्रिल २०१७ मध्ये मनपानेच ठराव करून हे रस्ते पुन्हा बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा ठराव महासभेत करण्यात आला. या ठरावांची अंमलबजावणी करत राज्य शासनाने ४ मे २०१७ रोजी शासन निर्णय घेत मनपाचे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चार वर्षांपासून हे रस्ते मनपाकडून बांधकाम विभागाने घेतलेच नसल्याचे समोर आले होते. आता याच प्रकरणाचा निर्णय घेण्यासाठी मनपात १ रोजी बैठक होणार आहे.

अतिक्रमणांची पाहणी करणार

१ रोजीच बांधकाम विभाग व मनपाचे अधिकारी शहरातील २० किमीच्या रस्त्यांवर असलेल्या अतिक्रमणाची पाहणी करणार आहे. पाहणी दरम्यान ज्या-ज्या ठिकाणी अतिक्रमण आढळून येईल त्याठिकाणचे अतिक्रमण मनपा प्रशासनाकडून काढण्यात येणार असून, त्यानंतरच हे रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहेत.