शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ २० किमीचे रस्ते कोणाचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून गेलेल्या २० किमीच्या रस्त्यांवरून मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागातील वाद अजूनही शमलेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून गेलेल्या २० किमीच्या रस्त्यांवरून मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागातील वाद अजूनही शमलेला दिसून येत नाही. आता हे रस्ते कोणाकडे आहेत. याबाबत तोडगा काढण्यासाठी मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठकीचे आयोजन १ सप्टेंबर रोजी महापालिकेत करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी मनपा आयुक्तांनी विभागप्रमुखांची बैठक घेवून प्राथमिक चर्चा केल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे.

शहरातील मुख्य भागातून २० किमीचे ६ रस्ते गेले आहेत. २०१७ मध्ये हे रस्ते मनपाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करण्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आले होते. मात्र, चार वर्षांपासून हे रस्ते अद्यापही मनपाकडेच असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच बांधकाम विभागाने हे रस्ते अद्याप मनपाकडून वर्ग करून घेतले नसल्याचेही स्पष्ट झाले होते. मंगळवारी शासनाच्या अंदाज समितीने घेतलेल्या बैठकीत मनपा प्रशासनाने या रस्त्यांवरील अतिक्रमण काढून हे रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करण्यासंदर्भातील आदेश मनपा प्रशासनाला दिले होते. त्यादृष्टीने आता हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेवून, या प्रकरणाबाबत झालेले ठराव, शासन निर्णय व पत्रव्यवहारांची माहिती घेण्यात आल्याची माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली आहे.

सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घेणार निर्णय

२००२ मध्ये हे रस्ते मनपाने बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केले होते. त्यानंतर मनपाच्या महासभेत ठराव घेवून मार्च २०१७ मध्ये हे रस्ते मनपाच्या हद्दीत घेण्यात आले. त्यानंतर पुन्हा २९ एप्रिल २०१७ मध्ये मनपानेच ठराव करून हे रस्ते पुन्हा बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा ठराव महासभेत करण्यात आला. या ठरावांची अंमलबजावणी करत राज्य शासनाने ४ मे २०१७ रोजी शासन निर्णय घेत मनपाचे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चार वर्षांपासून हे रस्ते मनपाकडून बांधकाम विभागाने घेतलेच नसल्याचे समोर आले होते. आता याच प्रकरणाचा निर्णय घेण्यासाठी मनपात १ रोजी बैठक होणार आहे.

अतिक्रमणांची पाहणी करणार

१ रोजीच बांधकाम विभाग व मनपाचे अधिकारी शहरातील २० किमीच्या रस्त्यांवर असलेल्या अतिक्रमणाची पाहणी करणार आहे. पाहणी दरम्यान ज्या-ज्या ठिकाणी अतिक्रमण आढळून येईल त्याठिकाणचे अतिक्रमण मनपा प्रशासनाकडून काढण्यात येणार असून, त्यानंतरच हे रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहेत.