शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीवर नियंत्रण कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST

गेल्या चार महिन्यांपासून जवळपास अत्यावश्यक सेवेचे दुकाने सोडले की, उर्वरित सर्व दुकाने बंद होती. त्यांचा रोजगार गेला होता, व्यवसाय ...

गेल्या चार महिन्यांपासून जवळपास अत्यावश्यक सेवेचे दुकाने सोडले की, उर्वरित सर्व दुकाने बंद होती. त्यांचा रोजगार गेला होता, व्यवसाय बंद होता. त्यामुळे आता व्यवसाय सुरू झाल्याने, सर्वच प्रकारची दुकाने माल विक्रीसाठी आणल्याने सज्ज झाली आहेत. म्हणून दिनांक ७ पासून जळगाव जिल्हा अनलॉक झाला आहे. म्हणून चोपडा शहरात सकाळी साडेआठ वाजेपासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत तोबा गर्दी होत असते. मात्र, नागरिकांना आता सकाळी बाजार करून घ्यायची सवय पडल्याने दुपारी शुकशुकाट दिसून येतो.

तसेच जळगाव जिल्हा अनलॉक झाला असला, तरी एका दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहक नसावेत, असा नियम आहे. या नियमाला मात्र दुकानदारांकडून तिलांजली दिली जात आहे. पाच ग्राहकांपेक्षा दहा ते पंधरा काही दुकानांमध्ये वीस ते पंचवीस, तीस ग्राहक दिसून येत आहेत. कापड विक्री दुकानांमध्ये अशी गर्दी दिसून येत आहे. म्हणून या गर्दीमुळे पुन्हा कोरोना वाढणार तर नाही ना, अशी भीती जाणकार नागरिक व्यक्त करीत आहेत.

सध्या नगरपालिकेकडून ही पूर्वीचे पथके कार्यान्वित असली, तरी सर्वच प्रकारची दुकाने सुरू झाल्यामुळे सध्या पथके निष्क्रिय आहेत. या पथकांनी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन ज्या दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहक असतील, अशा दुकानदार मालकांना समज देऊन गर्दी होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अन्यथा कोणीच कोणाला बोलणार नाही, म्हणून अशीच गर्दी वाढत राहिली, तर कोरोनाची गेल्या चार महिन्यांची पुनरावृत्ती तिसऱ्या लाटेच्या रूपाने होऊ शकते.

दुसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त फटका चोपडा तालुक्याला सर्वात आधी बसलेला आहे. कोरोनामुळे शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. अनलॉकनंतर पालिका प्रशासनाची चोपडा शहरात भूमिका काय असणार, हे जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी भ्रमणध्वनी स्वीकारला नाही.

सध्या सर्वच प्रकारचे दुकाने सुरू असल्याने काय कारवाई करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रथम फेजमध्ये जळगाव जिल्हा असल्याने सर्व दुकाने वेळेच्या बंधनाशिवाय सुरू आहेत. नगरपालिकेतील पथके कार्यान्वित आहेत, परंतु कारवाई काय करावी, कोणत्या आधारावर करावी, असा प्रश्न आहे. मात्र, पोलीस प्रशासनाच्या मदतीने ज्या दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहक असतील, अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

-नीलेश ठाकूर, प्रशासकीय अधिकारी, चोपडा नगरपालिका