शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मोठा कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:49 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘संस्कार दीप’ या सदरात जळगाव येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा विचारवंत प्रा.प्रभाकर श्रावण चौधरी यांनी बोधकथा लिहिल्या आहेत. त्यातील आज ‘मोठा कोण?’ ही वाचनीय बोधकथा नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

बंगालमध्ये एक महान सत्पुरुष होऊन गेले. तेच थोर संत, स्वामी विवेकानंद यांचे गुरू होते. स्वामी रामकृष्ण परमहंस हे त्यांचे नाव होते. स्वामी रामकृष्णांचा जन्म १८३६ मध्ये झाला. ते १८८६ मध्ये निवर्तले. तेव्हा स्वामी विवेकानंद पंचविशीच्या आत होते. आपल्या गुरूच्या स्मरणार्थ त्यांनी रामकृष्ण मठ ही संस्था स्थापन केली आहे. एकविसाव्या शतकातही तिचे कार्य सुरू आहे. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा शिष्य परिवार फार मोठा होता. त्यांच्याकडे सतत लोक येत असत. आपले प्रश्न, आपल्या समस्या सांगत. त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत. त्यामुळे परमहंस लोकप्रिय होते. ते ज्ञानी होते.एकदा त्यांच्याकडे त्यांचे दोन शिष्य आले. त्या शिष्यांमध्ये मोठा कोण? याबद्दल विवाद झाला होता. एक सन्यासदीक्षेने ज्येष्ठ होता. दुसरा ज्ञानाने मोठा होता. परंतु दोघे स्वत:ला मोठा समजत. एकाने म्हटले, मी मोठा, तर दुसरा म्हणे ‘तर मीही मोठा’! त्यावरून त्यांच्यात भांडणही होई. शेवटी आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी दोघे शिष्य स्वामी समस्येचे निराकरण करण्यासाठी दोघे शिष्य स्वामी परमहंसाकडे आले. दोघांनी आपापले म्हणणे त्यांच्यासमोर सांगितले. त्यासाठी आपापले तर्क दिले. तेव्हा परमहंसांनी मन:पूर्वक स्मित केले.ते प्रसन्न भावमुद्रेने म्हणाले, ‘जो दुसऱ्याला मोठा मानतो, त्याला मोठा म्हणावे. आता तुम्हीच ठरवायचं आहे तुमच्यात मोठा कोण आहे ते!’ दोन्ही शिष्यांनी गुरूंचा निर्णय ऐकला. आता ते परस्परांना मोठा म्हणू लागले. स्वत:कडे लहानपण घेऊ लागले. जो सन्यासदीक्षेने ज्येष्ठ असल्याने स्वत:ला मोठा समजत होता, तो म्हणू लागला. ‘डोक्यावरील केसांचे मुंडण केल्याने काय होते फारसे? म्हत्त्वपूर्ण तर ज्ञानच आहे. तुम्ही माझ्यापेक्षा अधिक शास्त्रांचा अभ्यास केला आहे. तुम्ही प्रभावी प्रवचनकार आहात. तुम्हीच मोठे आहात’. दुसरा म्हणाला, ‘नाही बंधू, शास्त्रे अभ्यासून काय फार मोठे मिळते हो. संन्यासदीक्षा घेऊन साधना करणे महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही साधनेने मोठे आहात. म्हणून तुम्ही श्रेष्ठही आहात.आतापर्यंत ‘मी मोठा’ म्हणून ते झगडत होते. आता ते दुसºयाला मोठा म्हणत होते. मी नाही, तुम्हीच मोठे, अशा जिद्दीवर ते आले. अगोदर कटुता होती. आता गोडवा आहे. अगोदर आग्रह, अहंवृत्ती होती, आता नम्रता व माधुर्य आहे. हे परिवर्तन का घडले. दृष्टी बदलली. घटनांचा संदर्भ बदलला. अर्थ बदलला. त्यामुळे जीवन समपातळीवर आले. मन विशाल बनले. म्हणजे जीवन सुखमय व शांतीमय बनते.- प्रा.प्रभाकर श्रावण चौधरी