शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

ज्याच्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात तो गुरुच होय - सुकन्या पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:21 IST

प्रत्येक जण काहीना काही शिकवृून जात असतो, स्वत:ची क्षमता ओळखून सक्षम बना

जळगाव : जीवनात प्रत्येक जण काहीतरी शिकवून जातो,ज्याच्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतात ते सर्व आपले गुरु असतात, अशा भावना मुळच्या जळगावातील हरेश्वरनगरातील रहिवासी व आयआयटी पवईच्या सुवर्णपदक विजेत्या आणि‘वर्ल्ड क्वान्ट’या बहुराष्ट्रीय कंपनीच्या उपाध्यक्षा सुकन्या विजयसिंग पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.गुरूपौर्णिमेच्या निमित्त गुरूचे जिवनातील महत्व या विषयावर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या भावना व्यक्त केल्या.त्या म्हणाल्या की, ‘ जळगाव शहरात एक सामान्य कुटुंबात वाढले. शाळेत शिकायला जाण्यापूर्वी मला आकार देणारी माझी आई माझी पहिली गुरूच होय. आयआयटी प्रवेश करू शकले याचे मूळ कारण म्हणजे शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा देत राहिली, आणि याचा पाया रचला तो चौथी स्कॉलरशिपने. आयआयटी म्हटले म्हणजे गणित आणि विज्ञान आलेच. मी शाळेत असताना े गणित शिक्षकांनी गणिताची भीती घालवली. यातून यशाचा पल्ला गाठण्याची नवीन उर्मी मिळाली, असल्याचे सुकन्या पाटील यांनी सांगितले.‘आयआयटी प्रवेशाच्या तयारीसाठी पुण्याला जाणे हा जीवनाचा टर्निंग पॉईंट बनला. तिथे माझ्या क्षमता वाढविणारे आणि मला सक्षम करणारे गुरू भेटले. आयआयटी प्रवेशाची कवाडे स्वत:च्या ज्ञानाने कशी उघडायची हे मी तिथं शिकले. आयआयटी प्रवेशाची जेईई परीक्षा गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले. देशातील अव्वल आयआयटी म्हणजे आयआयटी पवई येथे निवड झाली. एवढ्या मोठ्या संस्थेत देशभरातून आलेल्या बुद्धिमान मुलामुलींमध्ये शिकणे मला आधी कठीण वाटत होते. पण आईचे संस्कार आणि जिद्दीची शिकवण यामुळे मी तिथे टिकू शकली. ज्याच्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतात ते सर्व आपले गुरु असतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव