शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

ज्याच्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात तो गुरुच होय - सुकन्या पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:21 IST

प्रत्येक जण काहीना काही शिकवृून जात असतो, स्वत:ची क्षमता ओळखून सक्षम बना

जळगाव : जीवनात प्रत्येक जण काहीतरी शिकवून जातो,ज्याच्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतात ते सर्व आपले गुरु असतात, अशा भावना मुळच्या जळगावातील हरेश्वरनगरातील रहिवासी व आयआयटी पवईच्या सुवर्णपदक विजेत्या आणि‘वर्ल्ड क्वान्ट’या बहुराष्ट्रीय कंपनीच्या उपाध्यक्षा सुकन्या विजयसिंग पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.गुरूपौर्णिमेच्या निमित्त गुरूचे जिवनातील महत्व या विषयावर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या भावना व्यक्त केल्या.त्या म्हणाल्या की, ‘ जळगाव शहरात एक सामान्य कुटुंबात वाढले. शाळेत शिकायला जाण्यापूर्वी मला आकार देणारी माझी आई माझी पहिली गुरूच होय. आयआयटी प्रवेश करू शकले याचे मूळ कारण म्हणजे शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा देत राहिली, आणि याचा पाया रचला तो चौथी स्कॉलरशिपने. आयआयटी म्हटले म्हणजे गणित आणि विज्ञान आलेच. मी शाळेत असताना े गणित शिक्षकांनी गणिताची भीती घालवली. यातून यशाचा पल्ला गाठण्याची नवीन उर्मी मिळाली, असल्याचे सुकन्या पाटील यांनी सांगितले.‘आयआयटी प्रवेशाच्या तयारीसाठी पुण्याला जाणे हा जीवनाचा टर्निंग पॉईंट बनला. तिथे माझ्या क्षमता वाढविणारे आणि मला सक्षम करणारे गुरू भेटले. आयआयटी प्रवेशाची कवाडे स्वत:च्या ज्ञानाने कशी उघडायची हे मी तिथं शिकले. आयआयटी प्रवेशाची जेईई परीक्षा गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले. देशातील अव्वल आयआयटी म्हणजे आयआयटी पवई येथे निवड झाली. एवढ्या मोठ्या संस्थेत देशभरातून आलेल्या बुद्धिमान मुलामुलींमध्ये शिकणे मला आधी कठीण वाटत होते. पण आईचे संस्कार आणि जिद्दीची शिकवण यामुळे मी तिथे टिकू शकली. ज्याच्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतात ते सर्व आपले गुरु असतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव