शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

बालकवी स्मारकाची उपेक्षा थांबणार कधी?

By admin | Updated: May 25, 2017 11:11 IST

भादली रेल्वे स्थानकावरील स्मारक हटणार : नवीन जागेत उभारणीचे नियोजन

ऑनलाईन लोकमत/प्रसाद धर्माधिकारी 

नशिराबाद, ता.जळगाव, दि.25- मराठी साहित्याला निसर्ग कवितांचे अमोल लेणं बहाल करणा:या आणि मराठी काव्यसृष्टीत अजरामर झालेल्या बालकवी कै.त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे भादली रेल्वे स्टेशनवर असलेले स्मारक अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. आता रेल्वे लाईन विस्तारीकरण होत आहे. त्यात स्मारकाचे स्थलांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता तरी बालकवींच्या स्मारकाचे विस्तारीकरण होऊन कायापालट  व्हावे, स्मारकाचे सौंदर्य वाढावे, निसर्गरम्य बगिचा असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.  
बालकवींच्या स्मृतिशताब्दी  वर्षाला 5 मे पासून सुरुवात झाली आहे. स्मृतिशताब्दी वर्षात तरी बालकवी स्मारकाची उपेक्षा थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
मराठी साहित्याला निसर्गकाव्याचा अमोल ठेवा देणा:या त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचा जन्म धरणगाव येथे 13 ऑगस्ट 1890 रोजी झाला. वयाच्या 12 व्यावर्षी त्यांनी ‘वनमुकुंद’ कविता लिहून आपली काव्यसाधना सुरू केली. बालवयातच त्यांनी विविध कविता लिहिल्या. 1907 ला जळगावच्या पहिल्या कवीसंमेलनात डॉ.कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी ‘बालकवी’ ही उपाधी त्यांना दिली. बालकवींनी 28 वर्षाच्या आयुष्यात सुमारे 163 कविता लिहिल्या. श्रावणमास, फुलराणी, निर्झरास, औदुंबर, संध्यारजनी आदी कविता लिहून त्यांनी मराठी काव्यरसिकांना मोहून टाकले.
निसर्गकवीचा 5 मे 1918 रोजी नशिराबादजवळ असलेल्या भादली रेल्वे स्टेशन येथे अपघाती मृत्यू झाला. बालकवी ठोंबरे यांच्या जन्मशताब्दी दरम्यान 1990 मध्ये भादली रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार झाला. 
बालकवी ठोंबरेंचे अपघाती निधन याच रेल्वे स्थानकावर झाले. त्यामुळे त्यांचे येथे स्मारक असावे, असा विचार जिल्ह्यातील साहित्यिक व ग्रामस्थांनी मांडला. तत्कालीन रेल्वे स्थानक मास्तर एम.जी.चौबे व सुधाकर पाटील यांनी रेल्वे विभागाची परवानगी घेऊन आपल्या सहकार्याच्या मदतीने तिकीट कार्यालयाजवळ चबुतरा उभारला. या चबुतरावर ‘निर्झरास’ ही बालकवींची कविता कोरण्यात आली. चबुतरावर पुस्तक, दौत, टाक असे स्मारकाचे स्वरुप आहे. त्यावर शेड उभारुन बालकवींचे स्मारक आजही त्याच रुपात उभे आहे. त्यात कुठलाही बदल नाही.