शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

बालकवी स्मारकाची उपेक्षा थांबणार कधी?

By admin | Updated: May 25, 2017 11:11 IST

भादली रेल्वे स्थानकावरील स्मारक हटणार : नवीन जागेत उभारणीचे नियोजन

ऑनलाईन लोकमत/प्रसाद धर्माधिकारी 

नशिराबाद, ता.जळगाव, दि.25- मराठी साहित्याला निसर्ग कवितांचे अमोल लेणं बहाल करणा:या आणि मराठी काव्यसृष्टीत अजरामर झालेल्या बालकवी कै.त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे भादली रेल्वे स्टेशनवर असलेले स्मारक अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. आता रेल्वे लाईन विस्तारीकरण होत आहे. त्यात स्मारकाचे स्थलांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता तरी बालकवींच्या स्मारकाचे विस्तारीकरण होऊन कायापालट  व्हावे, स्मारकाचे सौंदर्य वाढावे, निसर्गरम्य बगिचा असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.  
बालकवींच्या स्मृतिशताब्दी  वर्षाला 5 मे पासून सुरुवात झाली आहे. स्मृतिशताब्दी वर्षात तरी बालकवी स्मारकाची उपेक्षा थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
मराठी साहित्याला निसर्गकाव्याचा अमोल ठेवा देणा:या त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचा जन्म धरणगाव येथे 13 ऑगस्ट 1890 रोजी झाला. वयाच्या 12 व्यावर्षी त्यांनी ‘वनमुकुंद’ कविता लिहून आपली काव्यसाधना सुरू केली. बालवयातच त्यांनी विविध कविता लिहिल्या. 1907 ला जळगावच्या पहिल्या कवीसंमेलनात डॉ.कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी ‘बालकवी’ ही उपाधी त्यांना दिली. बालकवींनी 28 वर्षाच्या आयुष्यात सुमारे 163 कविता लिहिल्या. श्रावणमास, फुलराणी, निर्झरास, औदुंबर, संध्यारजनी आदी कविता लिहून त्यांनी मराठी काव्यरसिकांना मोहून टाकले.
निसर्गकवीचा 5 मे 1918 रोजी नशिराबादजवळ असलेल्या भादली रेल्वे स्टेशन येथे अपघाती मृत्यू झाला. बालकवी ठोंबरे यांच्या जन्मशताब्दी दरम्यान 1990 मध्ये भादली रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार झाला. 
बालकवी ठोंबरेंचे अपघाती निधन याच रेल्वे स्थानकावर झाले. त्यामुळे त्यांचे येथे स्मारक असावे, असा विचार जिल्ह्यातील साहित्यिक व ग्रामस्थांनी मांडला. तत्कालीन रेल्वे स्थानक मास्तर एम.जी.चौबे व सुधाकर पाटील यांनी रेल्वे विभागाची परवानगी घेऊन आपल्या सहकार्याच्या मदतीने तिकीट कार्यालयाजवळ चबुतरा उभारला. या चबुतरावर ‘निर्झरास’ ही बालकवींची कविता कोरण्यात आली. चबुतरावर पुस्तक, दौत, टाक असे स्मारकाचे स्वरुप आहे. त्यावर शेड उभारुन बालकवींचे स्मारक आजही त्याच रुपात उभे आहे. त्यात कुठलाही बदल नाही.