शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
15
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
16
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
17
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
18
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
19
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
20
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

बालकवी स्मारकाची उपेक्षा थांबणार कधी?

By admin | Updated: May 25, 2017 11:11 IST

भादली रेल्वे स्थानकावरील स्मारक हटणार : नवीन जागेत उभारणीचे नियोजन

ऑनलाईन लोकमत/प्रसाद धर्माधिकारी 

नशिराबाद, ता.जळगाव, दि.25- मराठी साहित्याला निसर्ग कवितांचे अमोल लेणं बहाल करणा:या आणि मराठी काव्यसृष्टीत अजरामर झालेल्या बालकवी कै.त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे भादली रेल्वे स्टेशनवर असलेले स्मारक अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. आता रेल्वे लाईन विस्तारीकरण होत आहे. त्यात स्मारकाचे स्थलांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता तरी बालकवींच्या स्मारकाचे विस्तारीकरण होऊन कायापालट  व्हावे, स्मारकाचे सौंदर्य वाढावे, निसर्गरम्य बगिचा असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.  
बालकवींच्या स्मृतिशताब्दी  वर्षाला 5 मे पासून सुरुवात झाली आहे. स्मृतिशताब्दी वर्षात तरी बालकवी स्मारकाची उपेक्षा थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
मराठी साहित्याला निसर्गकाव्याचा अमोल ठेवा देणा:या त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचा जन्म धरणगाव येथे 13 ऑगस्ट 1890 रोजी झाला. वयाच्या 12 व्यावर्षी त्यांनी ‘वनमुकुंद’ कविता लिहून आपली काव्यसाधना सुरू केली. बालवयातच त्यांनी विविध कविता लिहिल्या. 1907 ला जळगावच्या पहिल्या कवीसंमेलनात डॉ.कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी ‘बालकवी’ ही उपाधी त्यांना दिली. बालकवींनी 28 वर्षाच्या आयुष्यात सुमारे 163 कविता लिहिल्या. श्रावणमास, फुलराणी, निर्झरास, औदुंबर, संध्यारजनी आदी कविता लिहून त्यांनी मराठी काव्यरसिकांना मोहून टाकले.
निसर्गकवीचा 5 मे 1918 रोजी नशिराबादजवळ असलेल्या भादली रेल्वे स्टेशन येथे अपघाती मृत्यू झाला. बालकवी ठोंबरे यांच्या जन्मशताब्दी दरम्यान 1990 मध्ये भादली रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार झाला. 
बालकवी ठोंबरेंचे अपघाती निधन याच रेल्वे स्थानकावर झाले. त्यामुळे त्यांचे येथे स्मारक असावे, असा विचार जिल्ह्यातील साहित्यिक व ग्रामस्थांनी मांडला. तत्कालीन रेल्वे स्थानक मास्तर एम.जी.चौबे व सुधाकर पाटील यांनी रेल्वे विभागाची परवानगी घेऊन आपल्या सहकार्याच्या मदतीने तिकीट कार्यालयाजवळ चबुतरा उभारला. या चबुतरावर ‘निर्झरास’ ही बालकवींची कविता कोरण्यात आली. चबुतरावर पुस्तक, दौत, टाक असे स्मारकाचे स्वरुप आहे. त्यावर शेड उभारुन बालकवींचे स्मारक आजही त्याच रुपात उभे आहे. त्यात कुठलाही बदल नाही.