शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

बालकवी स्मारकाची उपेक्षा थांबणार कधी?

By admin | Updated: May 25, 2017 11:11 IST

भादली रेल्वे स्थानकावरील स्मारक हटणार : नवीन जागेत उभारणीचे नियोजन

ऑनलाईन लोकमत/प्रसाद धर्माधिकारी 

नशिराबाद, ता.जळगाव, दि.25- मराठी साहित्याला निसर्ग कवितांचे अमोल लेणं बहाल करणा:या आणि मराठी काव्यसृष्टीत अजरामर झालेल्या बालकवी कै.त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे भादली रेल्वे स्टेशनवर असलेले स्मारक अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. आता रेल्वे लाईन विस्तारीकरण होत आहे. त्यात स्मारकाचे स्थलांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता तरी बालकवींच्या स्मारकाचे विस्तारीकरण होऊन कायापालट  व्हावे, स्मारकाचे सौंदर्य वाढावे, निसर्गरम्य बगिचा असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.  
बालकवींच्या स्मृतिशताब्दी  वर्षाला 5 मे पासून सुरुवात झाली आहे. स्मृतिशताब्दी वर्षात तरी बालकवी स्मारकाची उपेक्षा थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
मराठी साहित्याला निसर्गकाव्याचा अमोल ठेवा देणा:या त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचा जन्म धरणगाव येथे 13 ऑगस्ट 1890 रोजी झाला. वयाच्या 12 व्यावर्षी त्यांनी ‘वनमुकुंद’ कविता लिहून आपली काव्यसाधना सुरू केली. बालवयातच त्यांनी विविध कविता लिहिल्या. 1907 ला जळगावच्या पहिल्या कवीसंमेलनात डॉ.कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी ‘बालकवी’ ही उपाधी त्यांना दिली. बालकवींनी 28 वर्षाच्या आयुष्यात सुमारे 163 कविता लिहिल्या. श्रावणमास, फुलराणी, निर्झरास, औदुंबर, संध्यारजनी आदी कविता लिहून त्यांनी मराठी काव्यरसिकांना मोहून टाकले.
निसर्गकवीचा 5 मे 1918 रोजी नशिराबादजवळ असलेल्या भादली रेल्वे स्टेशन येथे अपघाती मृत्यू झाला. बालकवी ठोंबरे यांच्या जन्मशताब्दी दरम्यान 1990 मध्ये भादली रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार झाला. 
बालकवी ठोंबरेंचे अपघाती निधन याच रेल्वे स्थानकावर झाले. त्यामुळे त्यांचे येथे स्मारक असावे, असा विचार जिल्ह्यातील साहित्यिक व ग्रामस्थांनी मांडला. तत्कालीन रेल्वे स्थानक मास्तर एम.जी.चौबे व सुधाकर पाटील यांनी रेल्वे विभागाची परवानगी घेऊन आपल्या सहकार्याच्या मदतीने तिकीट कार्यालयाजवळ चबुतरा उभारला. या चबुतरावर ‘निर्झरास’ ही बालकवींची कविता कोरण्यात आली. चबुतरावर पुस्तक, दौत, टाक असे स्मारकाचे स्वरुप आहे. त्यावर शेड उभारुन बालकवींचे स्मारक आजही त्याच रुपात उभे आहे. त्यात कुठलाही बदल नाही.