शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात चोरीस गेलेली वाळू रात्रीतून परत येते तेव्हा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:08 IST

महसूल विभागाकडे संशयाची सुई : शासनाचे २० लाखांचे नुकसान

ठळक मुद्देतक्रार होताच रात्रीतून आणून टाकली वाळूनिविदेच्या पद्धतीमुळे वाढला संशयखनिकर्म अधिकाºयांनी केला घटनास्थळाचा पंचनामा

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.८ : पिंप्राळ्यातील मयूर कॉलनी व नवसाचा गणपती मंदिर परिसरात जप्त केलेल्या ६५० ब्रास वाळूसाठ्याचा लिलाव होऊनही तो घेण्यास संबंधित मक्तेदाराने नकार दिल्यानंतर पडून असलेली वाळू चोरीस गेली. मात्र याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार प्राप्त होताच रात्रीतून या ठिकाणी काही प्रमाणात वाळू आणून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.जिल्हाधिकाºयांच्या सूचनेवरून जिल्हा खनिकर्म अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन चारही वाळूसाठ्यांचा पंचनामा केला असता जेमतेम २५० ते ३०० ब्रास वाळू असल्याचे आढळून आले, त्यातही बहुतांश साठा हा ओल्या वाळूचा असल्याने रात्रीतूनच ती वाळू आणून टाकल्याचे स्पष्ट झाले. यामुळे महसूल विभागाकडे संशयाची सुई वळली आहे.निविदेच्या पद्धतीमुळे वाढला संशयया वाळूसाठ्याचा लिलाव करण्यासाठी तहसीलदारांनी वृत्तपत्रातून निविदा प्रसिद्ध करून लिलाव करणे अपेक्षित असताना केवळ तहसीलदार कार्यालयात एक नोटीस लावण्यात आली. त्यानुसार सोयीच्या माणसांनाच त्याची माहिती मिळाली व लिलावही झाला. त्यामुळे या प्रक्रियेबाबत व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला.लिलावात भाग घेणाºया व्यावसायिकाने वाळू गटांसाठीही अर्ज भरला होता. मात्र त्यासाठीची २० टक्के रक्कम आरटीजीएसने भरल्याने ती विहित वेळेपेक्षा उशिराने जमा झाल्याने त्यास अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे या व्यावसायिकाने हा लिलावाचा वाळूसाठा खरेदीस नकार दिला. त्यानंतर मात्र हा वाळूसाठा चोरीस गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.तक्रार होताच रात्रीतून आणून टाकली वाळूवाळूसाठा चोरीस गेल्याने शासनाचे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार धनराज निंबाळकर नामक व्यक्तीने बुधवारी केली. विशेष म्हणजे या तक्रारीची माहिती लगोलग वाळू चोरून नेणाºयापर्यंतही पोहोचली. संबंधिताने बुधवारी रात्रीच या साठ्याच्या ठिकाणी वाळूसाठा चोरीस गेलेला नाही, जैसे-थे आहे, असे भासविण्यासाठी सुमारे १५० ब्रास वाळू रात्रीतून या ठिकाणी आणून टाकली. तक्रारीची दखल घेऊन पंचनाम्यासाठी गेलेल्या जिल्हा खनिकर्म अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी यांना या चारही ठिकाणांवर मिळून जेमतेम २५० ते ३०० ब्रास वाळू आढळून आल्याचे समजते. तसेच त्यातील बहुतांश वाळू ओली असल्याने रात्रीतून आणून टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव