शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धानवड ते चिंचोली रस्त्याची दुरूस्ती कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:27 IST

रस्त्याची मात्र साधी डागडुजी देखील केली जात नसल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत

एकीकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांचा कायापालट होत असताना जळगाव तालुक्यातील धानवड ते चिंचोली रस्त्याची मात्र साधी डागडुजी देखील केली जात नसल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्याबाबत नेहमीच ओरड होत असते. या रस्त्यांवरून बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक आदी अवजड वाहने सातत्याने ये-जा करत असल्याने रस्ता लवकर खराब होतो. प्रशासनाचे त्याकडे लवकर लक्ष जात नाही. मात्र तरीही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत समावेश झालेल्या रस्त्यांचे भाग्य बदलले आहे. मात्र काही रस्ते मात्र खराब होऊनही त्यांची दुरूस्ती केली जात नाही. लोकप्रतिनिधींनाही लक्ष द्यायला सवड नसल्याचे चित्र बघायला मिळते. धानवड ते चिंचोली रस्त्याचीही अशीच अत्यंत दूरवस्था झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची डागडुजीच झालेली नाही. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना हे खड्डे चुकविणेही अवघड होत आहे. हे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नातच अपघात होत आहेत. नागरिकांना अक्षरश: कसरत करत ये- जा करावी लागते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वृद्ध व्यक्ती तसेच गरोदर महिलांना या रस्त्यावरून वाहनातून नेणे धोकादायक ठरत आहे. तसेच कुसुंबा, चिंचोली येथे जाणाºया विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. या खराब रस्त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत असून वाहनांच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची गरज आहे. - भाऊसाहेब पाटील, धानवड ता.जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव