शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

एका निधीतून नियोजन होत नसताना, दुसऱ्या निधीला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -मनपातील सत्ताधाऱ्यांकडून आतापर्यंत केवळ कोटींचे उड्डाणे केली जात आहेत. मात्र, कोणत्याही निधीचे नियोजन देखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव -मनपातील सत्ताधाऱ्यांकडून आतापर्यंत केवळ कोटींचे उड्डाणे केली जात आहेत. मात्र, कोणत्याही निधीचे नियोजन देखील होत नसताना, दुसऱ्या निधीतील कामांची घोषणा करून त्याबाबतचे ठराव केले जात आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी शहरातील नवीन रस्त्यांचा कामासाठी ४५ कोटींच्या कामांच्या नियोजनाचा ठराव केला होता. या निधीतून होणाऱ्या कामांसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु असतानाच ते काम रद्द करुन नव्या कामाचे नियोजन सुरु केले आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांचा या भूमिकेमुळे केवळ कोटींची उड्डाणे दाखविली जात असून, प्रत्यक्ष काम केव्हा ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शुक्रवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने पुर्वी केलेल्या ४५ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामांचा ठराव रद्द करून, त्यात २३ कोटींची भर टाकत एकूण ६८ कोटी रुपयांचा कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे आधी ज्या निधीवर मनपा बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु होते. ते काम पुन्हा थांबले आहे. तसेच आता पुन्हा नव्याने ६८ कोटींच्या कामांचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे नेमके कोणते कामे करायची आहेत हे अजूनही सत्ताधाऱ्यांना समजलेले दिसून येत नाही.

रस्त्यांचा प्रश्नावर कचाटीत सापडल्यानंतर कोटींची घोषणा

सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केवळ कोट्यवधींच्या निधीची घोषणा केली असून, काम मात्र शुन्य केले आहे. रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर शासनाकडून मिळालेल्या १०० कोटींचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले. हा निधी आला मात्र वर्षभर नियोजन करता आले नाही. या निधीपैकी ५० कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली मात्र त्यात ही आठ कोटींची प्रस्ताव चुकीचे पाठविल्याने ते अंदाजपत्रक शासनाने रद्द केले. अनेक महिने निविदा प्रक्रिया काढली नाही, त्यात राज्यात सत्तांतरानंतर या निधीवर स्थगिती आली. पावसाळ्यात रस्त्यांचा प्रश्नावर नागरिकांकडून संताप व्यक्त होवू लागल्यानंतर पुन्हा ३० कोटींच्या रस्त्यांचे नियोजन केले. मात्र, त्यातुनही कामाला सुरुवात केली नाही.

आता पुन्हा ६८ कोटी, पुढील महिन्यात १०० कोटींचे नियोजन

सत्ताधाऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत पुन्हा ६८ कोटींच्या कामातून होणाऱ्या कामांचा ठराव केला आहे. तसेच एप्रिल महिन्यात पुन्हा १०० कोटींची तरतूद करून एकूण १७० कोटींच्या मनपा फंडातून रस्त्यांचे कामांचे नियोजन सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. मात्र, ही घोषणा केवळ घोषणाच ठरू नये अशी अपेक्षा जळगावकरांना आहे. त्यातच मनपा फंडातून कोट्यवधीच्या निधीतील कामांची घोषणा केली जात असताना, महापालिका हा निधी आणणार तरी कोठून असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.