शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

एका निधीतून नियोजन होत नसताना, दुसऱ्या निधीला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -मनपातील सत्ताधाऱ्यांकडून आतापर्यंत केवळ कोटींचे उड्डाणे केली जात आहेत. मात्र, कोणत्याही निधीचे नियोजन देखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव -मनपातील सत्ताधाऱ्यांकडून आतापर्यंत केवळ कोटींचे उड्डाणे केली जात आहेत. मात्र, कोणत्याही निधीचे नियोजन देखील होत नसताना, दुसऱ्या निधीतील कामांची घोषणा करून त्याबाबतचे ठराव केले जात आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी शहरातील नवीन रस्त्यांचा कामासाठी ४५ कोटींच्या कामांच्या नियोजनाचा ठराव केला होता. या निधीतून होणाऱ्या कामांसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु असतानाच ते काम रद्द करुन नव्या कामाचे नियोजन सुरु केले आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांचा या भूमिकेमुळे केवळ कोटींची उड्डाणे दाखविली जात असून, प्रत्यक्ष काम केव्हा ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शुक्रवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने पुर्वी केलेल्या ४५ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामांचा ठराव रद्द करून, त्यात २३ कोटींची भर टाकत एकूण ६८ कोटी रुपयांचा कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे आधी ज्या निधीवर मनपा बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु होते. ते काम पुन्हा थांबले आहे. तसेच आता पुन्हा नव्याने ६८ कोटींच्या कामांचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे नेमके कोणते कामे करायची आहेत हे अजूनही सत्ताधाऱ्यांना समजलेले दिसून येत नाही.

रस्त्यांचा प्रश्नावर कचाटीत सापडल्यानंतर कोटींची घोषणा

सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केवळ कोट्यवधींच्या निधीची घोषणा केली असून, काम मात्र शुन्य केले आहे. रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर शासनाकडून मिळालेल्या १०० कोटींचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले. हा निधी आला मात्र वर्षभर नियोजन करता आले नाही. या निधीपैकी ५० कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली मात्र त्यात ही आठ कोटींची प्रस्ताव चुकीचे पाठविल्याने ते अंदाजपत्रक शासनाने रद्द केले. अनेक महिने निविदा प्रक्रिया काढली नाही, त्यात राज्यात सत्तांतरानंतर या निधीवर स्थगिती आली. पावसाळ्यात रस्त्यांचा प्रश्नावर नागरिकांकडून संताप व्यक्त होवू लागल्यानंतर पुन्हा ३० कोटींच्या रस्त्यांचे नियोजन केले. मात्र, त्यातुनही कामाला सुरुवात केली नाही.

आता पुन्हा ६८ कोटी, पुढील महिन्यात १०० कोटींचे नियोजन

सत्ताधाऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत पुन्हा ६८ कोटींच्या कामातून होणाऱ्या कामांचा ठराव केला आहे. तसेच एप्रिल महिन्यात पुन्हा १०० कोटींची तरतूद करून एकूण १७० कोटींच्या मनपा फंडातून रस्त्यांचे कामांचे नियोजन सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. मात्र, ही घोषणा केवळ घोषणाच ठरू नये अशी अपेक्षा जळगावकरांना आहे. त्यातच मनपा फंडातून कोट्यवधीच्या निधीतील कामांची घोषणा केली जात असताना, महापालिका हा निधी आणणार तरी कोठून असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.