शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

एका निधीतून नियोजन होत नसताना, दुसऱ्या निधीला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -मनपातील सत्ताधाऱ्यांकडून आतापर्यंत केवळ कोटींचे उड्डाणे केली जात आहेत. मात्र, कोणत्याही निधीचे नियोजन देखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव -मनपातील सत्ताधाऱ्यांकडून आतापर्यंत केवळ कोटींचे उड्डाणे केली जात आहेत. मात्र, कोणत्याही निधीचे नियोजन देखील होत नसताना, दुसऱ्या निधीतील कामांची घोषणा करून त्याबाबतचे ठराव केले जात आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी शहरातील नवीन रस्त्यांचा कामासाठी ४५ कोटींच्या कामांच्या नियोजनाचा ठराव केला होता. या निधीतून होणाऱ्या कामांसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु असतानाच ते काम रद्द करुन नव्या कामाचे नियोजन सुरु केले आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांचा या भूमिकेमुळे केवळ कोटींची उड्डाणे दाखविली जात असून, प्रत्यक्ष काम केव्हा ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शुक्रवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने पुर्वी केलेल्या ४५ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामांचा ठराव रद्द करून, त्यात २३ कोटींची भर टाकत एकूण ६८ कोटी रुपयांचा कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे आधी ज्या निधीवर मनपा बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु होते. ते काम पुन्हा थांबले आहे. तसेच आता पुन्हा नव्याने ६८ कोटींच्या कामांचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे नेमके कोणते कामे करायची आहेत हे अजूनही सत्ताधाऱ्यांना समजलेले दिसून येत नाही.

रस्त्यांचा प्रश्नावर कचाटीत सापडल्यानंतर कोटींची घोषणा

सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केवळ कोट्यवधींच्या निधीची घोषणा केली असून, काम मात्र शुन्य केले आहे. रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर शासनाकडून मिळालेल्या १०० कोटींचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले. हा निधी आला मात्र वर्षभर नियोजन करता आले नाही. या निधीपैकी ५० कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली मात्र त्यात ही आठ कोटींची प्रस्ताव चुकीचे पाठविल्याने ते अंदाजपत्रक शासनाने रद्द केले. अनेक महिने निविदा प्रक्रिया काढली नाही, त्यात राज्यात सत्तांतरानंतर या निधीवर स्थगिती आली. पावसाळ्यात रस्त्यांचा प्रश्नावर नागरिकांकडून संताप व्यक्त होवू लागल्यानंतर पुन्हा ३० कोटींच्या रस्त्यांचे नियोजन केले. मात्र, त्यातुनही कामाला सुरुवात केली नाही.

आता पुन्हा ६८ कोटी, पुढील महिन्यात १०० कोटींचे नियोजन

सत्ताधाऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत पुन्हा ६८ कोटींच्या कामातून होणाऱ्या कामांचा ठराव केला आहे. तसेच एप्रिल महिन्यात पुन्हा १०० कोटींची तरतूद करून एकूण १७० कोटींच्या मनपा फंडातून रस्त्यांचे कामांचे नियोजन सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. मात्र, ही घोषणा केवळ घोषणाच ठरू नये अशी अपेक्षा जळगावकरांना आहे. त्यातच मनपा फंडातून कोट्यवधीच्या निधीतील कामांची घोषणा केली जात असताना, महापालिका हा निधी आणणार तरी कोठून असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.