शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिले, त्यावेळी अनेकांची झोप उडाली - एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 16:56 IST

निवडणुकीच्या तोंडावर भुसावळ येथे वक्तव्य

ठळक मुद्देपुस्तक लिहिले पाहिजे आणि राजकीय जीवनातील प्रसंग टिपले पाहिजेविद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरणास हजेरी

भुसावळ, जि. जळगाव - निबंध स्पर्धेमध्ये एका विद्यार्थ्याने निबंधात लिहिले आहे की, ‘स्वप्न असे पहावे, की दुसऱ्याची झोप उडावी, मीही मुख्यमंत्री पदाचे असेच स्वप्न पाहिले, त्यावेळी अनेकांची झोप उडाली’, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.भुसावळ येथे नाहाटा महाविद्यालयात आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून खडसे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, कुलगुरू पी.पी.पाटील, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.सुनील नेवे ताप्ती, एज्युकेशन सोसण्याचे चेअरमन मोहन फालक, सचिव विष्णू चौधरी, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, पंचायत समितीच्या सभापती प्रीती पाटील, प्राचार्या मीनाक्षी वायकोळे, संजय नाहाटा, महेश पालक, देवा वाणी, मुन्ना तेली आदी उपस्थित होते.यावेळी खडसे म्हणाले की, निबंध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील साहित्याच्या स्वरूपात सुप्त कला असल्याचे दिसून आले. पुस्तक लिहिले पाहिजे आणि राजकीय जीवनातील प्रसंग टिपले पाहिजे, असे मलाही वाटते. मात्र ते जमले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली, तर एका विद्यार्थ्याने रक्षा खडसे यांच्यावरही निबंध लिहिला आहे. खरे तर हा निबंध या स्पर्धेसाठी दिला नव्हता, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आजूबाजूला काय आहे, या घटनेसंदर्भातही विद्यार्थ्यांनी लिखाण केल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. लिखाणाचा विषय आपण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना दिला. मात्र विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले आहे, असे त्यांनी नमूद केले, तर या स्पर्धेत मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असल्याचे दिसून आले.या स्पर्धेत जळगाव, बुलढाणा, धुळे , नंदुरबार या जिल्ह्यातील महाविद्यालयातील तब्बल सात हजार ८९१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रसंगी खासदार रक्षा खडसे, कुलगुरू पाटील, आमदार सावकारे आदींनी मनोगत व्यक्त केले, तर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वालन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. नेवे यांनी केले. विद्यार्थ्यांसह संस्थेचे मोहन फालक यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव